शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

दुकानांत पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या

By admin | Updated: December 12, 2015 00:50 IST

नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर निर्बंध असतानाही शहरात ठिकठिकाणी या नियमाचे उल्लंघन करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे पाहायला मिळते.

नवी मुंबई : नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर निर्बंध असतानाही शहरात ठिकठिकाणी या नियमाचे उल्लंघन करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे पाहायला मिळते. दुकारदार, व्यावसायिकांबरोबरच फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या पाहायला मिळत असून, या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर फक्त नावापुरतीच कारवाई होत असल्याने यावर अजूनही गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याचे चिन्ह दिसून येते. प्लास्टिक पिशव्यांच्या वापराचा मानवी आरोग्य तसेच पर्यावरणावर घातक परिणाम होत असून, या पातळ पिशव्यांचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नसल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. या पिशव्या सांडपाण्याचे नाले, गटारांमध्ये अडकून राहिल्याने पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. व्यावसायिक, दुकानदार, कारखानदार, फेरीवाल्यांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दंड वसूल केला जातो. परंतु महानगरपालिका क्षेत्रात या पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर ठोस उपाययोजना न राबविल्याने या पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे पाहायला मिळते. सीबीडी, नेरूळ, सानपाडा, वाशी, तुर्भे, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणेतील फेरीवाले, चायनीज विक्रेते, किरकोळ व्यापारी, मटण विक्रेते ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करीत आहेत. (प्रतिनिधी)