शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

फुले-आंबेडकर साहित्य मुख्य प्रवाहात येणे गरजेचे

By admin | Updated: April 10, 2017 06:12 IST

फुले-आंबेडकरी साहित्य चळवळ ही मुख्य साहित्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, त्याची फार मोठी जबाबदारी

नवी मुंबई : फुले-आंबेडकरी साहित्य चळवळ ही मुख्य साहित्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, त्याची फार मोठी जबाबदारी नवे साहित्यकारांवर आहे, असे मत प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी वाशी येथील बुद्ध प्रतिष्ठान सभागृहात आयोजित फुले-आंबेडकर साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले. फुले-आंबेडकर साहित्यकारांनी साहित्य चळवळ अधिक लोकाभिमुख करत बौद्धिक विचारवंत यांना एकत्र करणे गरजेच असल्याचे विचारही डॉ. डोंगरगावकर यांनी व्यक्त केले.वाशी शिवाजी चौक येथून साहित्य दिंडीने या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. १९६१ सालापासून देशातील नवं बुद्ध यांना घटनेच्या कोणत्याच कायद्यात समाविष्ट केले गेले नसल्याची खंत या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. राजकारण्यांकडून मोठी फसवणूक झाली असून त्यामुळे नोकरी, शिक्षण आणि विविध शासकीय योजना यापासून वंचित राहावे लागत असल्याची नाराजी डोंगरगावकर यांनी व्यक्त केली. भगवा दहशतवाद देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खरा धोका आपणास देशांतर्गत वाढत चाललेल्या धर्मांध शक्तीपासून असल्याचे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. संमेलनातील आंबेडकरी वाद साहित्य आणि समाज या विषयावरील परिसंवादात बोलताना परिवर्तन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दत्ता हेगडे यांनी लोकशाहीला सुसंगत आंबेडकरी वाद असल्याचे सांगितले, तर प्रा. शुक्राचारी गायकवाड यांनी साहित्यकार, विचारवंत या समाजातील प्रबोधन करणाऱ्या घटकांनी फुले-आंबेडकर विचारधारा सांगत असताना जुन्या रूढी, अनिष्ट प्रथा यावर आसूड उभारले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. प्रसिद्ध कवियत्री विद्या शिर्के-बाळदकर यांनी सदर संमेलनाचे सूत्रसंचालन काव्यात्मय शैलीत करून रसिकांची दाद मिळवली. दुसऱ्या सत्रात प्रा. रेखा मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली फुले आंबेडकरी साहित्यात महिलांचे योगदान या विषयावर शारदा नवले, उषा आंबोरे, शीला जाधव आणि शोभा कांबळे यांनी आपले विचार मांडले. या वेळी शाहीर कुंदन कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. सायंकाळी बहारदार कवी संमेलन झाले.