शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

फुले-आंबेडकर साहित्य मुख्य प्रवाहात येणे गरजेचे

By admin | Updated: April 10, 2017 06:12 IST

फुले-आंबेडकरी साहित्य चळवळ ही मुख्य साहित्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, त्याची फार मोठी जबाबदारी

नवी मुंबई : फुले-आंबेडकरी साहित्य चळवळ ही मुख्य साहित्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, त्याची फार मोठी जबाबदारी नवे साहित्यकारांवर आहे, असे मत प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी वाशी येथील बुद्ध प्रतिष्ठान सभागृहात आयोजित फुले-आंबेडकर साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले. फुले-आंबेडकर साहित्यकारांनी साहित्य चळवळ अधिक लोकाभिमुख करत बौद्धिक विचारवंत यांना एकत्र करणे गरजेच असल्याचे विचारही डॉ. डोंगरगावकर यांनी व्यक्त केले.वाशी शिवाजी चौक येथून साहित्य दिंडीने या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. १९६१ सालापासून देशातील नवं बुद्ध यांना घटनेच्या कोणत्याच कायद्यात समाविष्ट केले गेले नसल्याची खंत या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. राजकारण्यांकडून मोठी फसवणूक झाली असून त्यामुळे नोकरी, शिक्षण आणि विविध शासकीय योजना यापासून वंचित राहावे लागत असल्याची नाराजी डोंगरगावकर यांनी व्यक्त केली. भगवा दहशतवाद देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खरा धोका आपणास देशांतर्गत वाढत चाललेल्या धर्मांध शक्तीपासून असल्याचे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. संमेलनातील आंबेडकरी वाद साहित्य आणि समाज या विषयावरील परिसंवादात बोलताना परिवर्तन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दत्ता हेगडे यांनी लोकशाहीला सुसंगत आंबेडकरी वाद असल्याचे सांगितले, तर प्रा. शुक्राचारी गायकवाड यांनी साहित्यकार, विचारवंत या समाजातील प्रबोधन करणाऱ्या घटकांनी फुले-आंबेडकर विचारधारा सांगत असताना जुन्या रूढी, अनिष्ट प्रथा यावर आसूड उभारले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. प्रसिद्ध कवियत्री विद्या शिर्के-बाळदकर यांनी सदर संमेलनाचे सूत्रसंचालन काव्यात्मय शैलीत करून रसिकांची दाद मिळवली. दुसऱ्या सत्रात प्रा. रेखा मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली फुले आंबेडकरी साहित्यात महिलांचे योगदान या विषयावर शारदा नवले, उषा आंबोरे, शीला जाधव आणि शोभा कांबळे यांनी आपले विचार मांडले. या वेळी शाहीर कुंदन कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. सायंकाळी बहारदार कवी संमेलन झाले.