शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

फुले-आंबेडकर साहित्य मुख्य प्रवाहात येणे गरजेचे

By admin | Updated: April 10, 2017 06:12 IST

फुले-आंबेडकरी साहित्य चळवळ ही मुख्य साहित्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, त्याची फार मोठी जबाबदारी

नवी मुंबई : फुले-आंबेडकरी साहित्य चळवळ ही मुख्य साहित्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, त्याची फार मोठी जबाबदारी नवे साहित्यकारांवर आहे, असे मत प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी वाशी येथील बुद्ध प्रतिष्ठान सभागृहात आयोजित फुले-आंबेडकर साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले. फुले-आंबेडकर साहित्यकारांनी साहित्य चळवळ अधिक लोकाभिमुख करत बौद्धिक विचारवंत यांना एकत्र करणे गरजेच असल्याचे विचारही डॉ. डोंगरगावकर यांनी व्यक्त केले.वाशी शिवाजी चौक येथून साहित्य दिंडीने या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. १९६१ सालापासून देशातील नवं बुद्ध यांना घटनेच्या कोणत्याच कायद्यात समाविष्ट केले गेले नसल्याची खंत या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. राजकारण्यांकडून मोठी फसवणूक झाली असून त्यामुळे नोकरी, शिक्षण आणि विविध शासकीय योजना यापासून वंचित राहावे लागत असल्याची नाराजी डोंगरगावकर यांनी व्यक्त केली. भगवा दहशतवाद देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खरा धोका आपणास देशांतर्गत वाढत चाललेल्या धर्मांध शक्तीपासून असल्याचे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. संमेलनातील आंबेडकरी वाद साहित्य आणि समाज या विषयावरील परिसंवादात बोलताना परिवर्तन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दत्ता हेगडे यांनी लोकशाहीला सुसंगत आंबेडकरी वाद असल्याचे सांगितले, तर प्रा. शुक्राचारी गायकवाड यांनी साहित्यकार, विचारवंत या समाजातील प्रबोधन करणाऱ्या घटकांनी फुले-आंबेडकर विचारधारा सांगत असताना जुन्या रूढी, अनिष्ट प्रथा यावर आसूड उभारले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. प्रसिद्ध कवियत्री विद्या शिर्के-बाळदकर यांनी सदर संमेलनाचे सूत्रसंचालन काव्यात्मय शैलीत करून रसिकांची दाद मिळवली. दुसऱ्या सत्रात प्रा. रेखा मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली फुले आंबेडकरी साहित्यात महिलांचे योगदान या विषयावर शारदा नवले, उषा आंबोरे, शीला जाधव आणि शोभा कांबळे यांनी आपले विचार मांडले. या वेळी शाहीर कुंदन कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. सायंकाळी बहारदार कवी संमेलन झाले.