शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

स्मशानातील धुरामुळे तुर्भेवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 23:33 IST

आयुक्तांना निवेदन : प्रश्न न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : तुर्भे स्मशानभूमीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. शेडमधील स्मशानभूमीला धुरांडेही नसल्यामुळे सर्व धूर वसाहतीमध्ये जाऊन नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्रस्त झालेल्या रहिवाशांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले असून प्रश्न तत्काळ मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नवी मुंबईमधील मध्यवर्ती स्मशानभूमीमध्ये तुर्भेचाही समावेश आहे. या ठिकाणी सर्वाधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. परंतु मुख्य स्मशानभूमीची दुरुस्ती सुरू असल्यामुळे ती बंद करण्यात आली असून, बाजूलाच पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्मशानभूमी तयार केली आहे.वास्तविक, तुर्भे परिसरासाठी ही तात्पुरती सोय उपलब्ध केली आहे. परंतु, सद्य:स्थितीमध्ये मध्यवर्ती स्मशानभूमीप्रमाणेच त्याचा वापर होत असून, दिवसभर अंत्यसंस्कार सुरूच असतात. अनेकवेळा अंत्यसंस्कारासाठी तासन्तास वाट पाहावी लागतआहे.स्मशानभूमीला धुरांडे नसल्यामुळे सर्व धूर तुर्भे सेक्टर २१, एपीएमसीचे फळ मार्केट व परिसरात जात आहे. वसाहतीमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. मृतदेह जळत असतानाचा वासही घरांमध्ये येत आहे. यामुळे स्थायी समितीच्या माजी सभापती शुभांगी पाटील यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास ही समस्या आणून दिली आहे.सदर ठिकाणी पीएनजी शवदाहिनी व धूर जाण्यासाठी धुरांडे तत्काळ बसविण्यात यावे. सर्व मृतदेह याच ठिकाणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.पाटील यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी आयुक्तांना याविषयी निवेदनही दिले असून, तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे.मध्यवर्ती स्मशानभूमीची दुरुस्ती सुरू असल्यामुळे जवळच तात्पुरती स्मशानभूमी तयार केली आहे. तेथे धुरांडे नसल्यामुळे व क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह इतर विभागांतूनही तेथे पाठविले जात असल्यामुळे परिसरातील रहिवाशांना धुराचा त्रास होत आहे. ही समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली आहे.- शुभांगी पाटील,माजी स्थायी समिती सभापती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई