शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

स्मशानातील धुरामुळे तुर्भेवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 23:33 IST

आयुक्तांना निवेदन : प्रश्न न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : तुर्भे स्मशानभूमीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. शेडमधील स्मशानभूमीला धुरांडेही नसल्यामुळे सर्व धूर वसाहतीमध्ये जाऊन नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्रस्त झालेल्या रहिवाशांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले असून प्रश्न तत्काळ मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नवी मुंबईमधील मध्यवर्ती स्मशानभूमीमध्ये तुर्भेचाही समावेश आहे. या ठिकाणी सर्वाधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. परंतु मुख्य स्मशानभूमीची दुरुस्ती सुरू असल्यामुळे ती बंद करण्यात आली असून, बाजूलाच पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्मशानभूमी तयार केली आहे.वास्तविक, तुर्भे परिसरासाठी ही तात्पुरती सोय उपलब्ध केली आहे. परंतु, सद्य:स्थितीमध्ये मध्यवर्ती स्मशानभूमीप्रमाणेच त्याचा वापर होत असून, दिवसभर अंत्यसंस्कार सुरूच असतात. अनेकवेळा अंत्यसंस्कारासाठी तासन्तास वाट पाहावी लागतआहे.स्मशानभूमीला धुरांडे नसल्यामुळे सर्व धूर तुर्भे सेक्टर २१, एपीएमसीचे फळ मार्केट व परिसरात जात आहे. वसाहतीमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. मृतदेह जळत असतानाचा वासही घरांमध्ये येत आहे. यामुळे स्थायी समितीच्या माजी सभापती शुभांगी पाटील यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास ही समस्या आणून दिली आहे.सदर ठिकाणी पीएनजी शवदाहिनी व धूर जाण्यासाठी धुरांडे तत्काळ बसविण्यात यावे. सर्व मृतदेह याच ठिकाणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.पाटील यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी आयुक्तांना याविषयी निवेदनही दिले असून, तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे.मध्यवर्ती स्मशानभूमीची दुरुस्ती सुरू असल्यामुळे जवळच तात्पुरती स्मशानभूमी तयार केली आहे. तेथे धुरांडे नसल्यामुळे व क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह इतर विभागांतूनही तेथे पाठविले जात असल्यामुळे परिसरातील रहिवाशांना धुराचा त्रास होत आहे. ही समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली आहे.- शुभांगी पाटील,माजी स्थायी समिती सभापती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई