शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

कर्जत स्थानकात ईएमयूजवळ पादचारी पूल!

By admin | Updated: December 26, 2016 07:05 IST

कर्जत रेल्वे स्थानकात मुंबई एन्डकडे नवीन पादचारी पूल उभारण्याचे काम पूर्ण होऊन आता हा पूल प्रवाशांच्या वापरासाठी

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकात मुंबई एन्डकडे नवीन पादचारी पूल उभारण्याचे काम पूर्ण होऊन आता हा पूल प्रवाशांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे. परंतु हा पूल कर्जतकरांसाठी अयोग्य असल्याने कर्जतचे पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना ई-मेल पाठवून कर्जतकरांना त्रास होईल असा पूल का बांधला गेला, अशी विचारणा केली होती. याबाबत चक्क दिल्ली रेल्वे बोर्डाने पंकज ओसवाल यांना ई-मेल पाठविले आहे व तसेच याबाबतीत माहितीच्या अधिकारात सुध्दा विचारणा केली असल्याचे ओसवाल यांनी सांगितले.कर्जत रेल्वे स्थानकात ईएमयूच्या एकदमच जवळ जिना बांधला असल्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता हा जिना हा फलाट क्र मांक दोन व ईएमयूच्या मधोमध न बांधता तो ईएमयूच्या एकदमच जवळ का बांधला? असा प्रश्न पंकज मांगीलाल ओसवाल यांनी माहितीच्या अधिकारात उपस्थित केला होता यावर रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे. जर का या पुलाचा जिना हा ईएमयू व दोन नंबर फलाटाच्या मधोमध बांधला असता तर रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन झाले असते असे खळबजनक उत्तर मध्य रेल्वे प्रशासनाने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाना दिले आहे. खरे पाहिले तर या पुलाच्या जिन्याचे तोंड पुणे एन्डकडे केले असते तर जास्त उपयोगी ठरले असते, कारण मुंबई एन्डकडे जिन्याचे तोंड केल्यामुळे प्रवाशांना वळसा घालून जिन्याचा वापर करणे फार अवघड होउन बसले आहे. सगळ्याच रेल्वे स्थानकात पुलाचे तोंड लोकल गाडीच्या तोंडाकडे असते तर मग कर्जतला पुलाचे तोंड विरुध्द दिशेने का बांधले गेले. सगळे नियम कर्जत रेल्वे स्थानकालाच लागू आहेत का? असा प्रश्न पंकज ओसवाल यांनी उपस्थित के ला आहे.रेल्वेचे नियम प्रवाशांना हानिकारक ठरत असतील तर मग अशा नियमांचा काय उपयोग? प्रवाशांच्या सोईनुसारच नियमांमध्ये बदल करणे आवश्यक असताना रेल्वे तसे न करता कर्जतकरांना वेठीस धरत आहे. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊनच सुविधा पुरविणे गरजेचे असताना कर्जत रेल्वे स्थानकात त्रासदायक ठरेल असा पूल बांधला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुविधा पुरविण्यापूर्वी प्रवाशांना विश्वासात घेऊनच सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. एखादी सुविधा देऊन प्रवाशांना त्याचा फायदा होण्यापेक्षा धोकादायक असेल तर अशा सुविधांचा काहीही उपयोग नाही, असे ओसवाल म्हणाले. (वार्ताहर)