शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

उमेदवारी देताना पक्षांची कसरत

By admin | Updated: May 5, 2017 06:22 IST

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रमुख पक्षात इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे पक्षाच्या जागा वाढण्याची शक्यता

मयूर तांबडे / पनवेलपनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रमुख पक्षात इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे पक्षाच्या जागा वाढण्याची शक्यता असली तरी या आयारामांमुळे निष्ठावान दुखावले जाण्याची व ऐनवेळी बंडखोरी होण्याची शक्यता वाढली आहे. प्रामुख्याने शिवसेना, भाजपा व शेकाप आघाडीची डोकेदुखी यामुळे वाढण्याची शक्यता आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारी देताना सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पनवेल शहरातील राजकीय वातावरण गेल्या महिनाभरात चांगलेच ढवळून निघाले आहे. तिकीट न मिळाल्यास अनेक इच्छुक पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत, तर काही अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना सर्वच पक्षांनी सावधगिरी बाळगली आहे. शनिवार, ६ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी सर्वच पक्षांत उमेदवारांची झुंबड उडणार आहे. प्रशासनानेही खबरदारी म्हणून जादा कर्मचारी नियुक्त केले आहेत. पनवेल महापालिकेत शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. काही प्रभागात एखाद्या पक्षाने ग्रामीण भागातील उमेदवार उभा केला असेल तर सर्वपक्षीय मतभेद बाजूला सारून गावातील उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निश्चयदेखील केला जात आहे. शेकाप, भाजपा, शिवसेना, काँग्रेस या साऱ्याच पक्षांकडे सध्या इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांतील दरी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. साऱ्याच पक्षांनाउमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसचे प्रभाग ९ मधून जमीर शेख, प्रभाग १९ मधून राकेश जाधव हे अपक्ष म्हणून अर्ज करण्याच्या तयारीत आहेत. तर राष्ट्रवादीचे आनंद भंडारी प्रभाग १६ मधून अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत. शेकापचे गणेश कडू यांना प्रभाग १७ मधून उमेदवारी मिळत नसल्याने ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली आहे. तर भाजपाचे गणेश पाटील यांना देखील प्रभाग १५ मधून उमेदवारी मिळत नसल्याने ते शेकापमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. एकंदरीतच साऱ्याच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागणार आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.