शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी देताना पक्षांची कसरत

By admin | Updated: May 5, 2017 06:22 IST

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रमुख पक्षात इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे पक्षाच्या जागा वाढण्याची शक्यता

मयूर तांबडे / पनवेलपनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रमुख पक्षात इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे पक्षाच्या जागा वाढण्याची शक्यता असली तरी या आयारामांमुळे निष्ठावान दुखावले जाण्याची व ऐनवेळी बंडखोरी होण्याची शक्यता वाढली आहे. प्रामुख्याने शिवसेना, भाजपा व शेकाप आघाडीची डोकेदुखी यामुळे वाढण्याची शक्यता आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारी देताना सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पनवेल शहरातील राजकीय वातावरण गेल्या महिनाभरात चांगलेच ढवळून निघाले आहे. तिकीट न मिळाल्यास अनेक इच्छुक पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत, तर काही अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना सर्वच पक्षांनी सावधगिरी बाळगली आहे. शनिवार, ६ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी सर्वच पक्षांत उमेदवारांची झुंबड उडणार आहे. प्रशासनानेही खबरदारी म्हणून जादा कर्मचारी नियुक्त केले आहेत. पनवेल महापालिकेत शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. काही प्रभागात एखाद्या पक्षाने ग्रामीण भागातील उमेदवार उभा केला असेल तर सर्वपक्षीय मतभेद बाजूला सारून गावातील उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निश्चयदेखील केला जात आहे. शेकाप, भाजपा, शिवसेना, काँग्रेस या साऱ्याच पक्षांकडे सध्या इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांतील दरी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. साऱ्याच पक्षांनाउमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसचे प्रभाग ९ मधून जमीर शेख, प्रभाग १९ मधून राकेश जाधव हे अपक्ष म्हणून अर्ज करण्याच्या तयारीत आहेत. तर राष्ट्रवादीचे आनंद भंडारी प्रभाग १६ मधून अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत. शेकापचे गणेश कडू यांना प्रभाग १७ मधून उमेदवारी मिळत नसल्याने ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली आहे. तर भाजपाचे गणेश पाटील यांना देखील प्रभाग १५ मधून उमेदवारी मिळत नसल्याने ते शेकापमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. एकंदरीतच साऱ्याच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागणार आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.