शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

पनवेल परिसरातील १२५ बार होणार बंद!

By admin | Updated: December 30, 2016 04:18 IST

महामार्गालगत होणाऱ्या अपघातांना नजीक असलेले हॉटेल्स, बार जबाबदार असल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे. त्यामुळे महामार्गालगत ५०० मीटरपर्यंत

- वैभव गायकर,  पनवेलमहामार्गालगत होणाऱ्या अपघातांना नजीक असलेले हॉटेल्स, बार जबाबदार असल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे. त्यामुळे महामार्गालगत ५०० मीटरपर्यंत असलेल्या सर्वच हॉटेल्स, बारला टाळे ठोकण्यात येणार आहे. या आदेशाने पनवेल, उरणमधील बार मालकांना मोठा फटका बसणार असून, जवळजवळ ८० टक्के म्हणजेच १२५ बार बंद होणार आहेत. याकरिता मोजमाप व नोटीस बजावणीचे काम राज्य उत्पादन शुल्क विभाग पनवेलने हाती घेतले आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत यासंदर्भात सर्व प्रक्रि या सुरू करून सरकारकडे माहिती सादर करण्यात येणार आहे. पनवेल शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पुणे-मुंबईच्या केंद्रस्थानी असलेल्या या शहरातील बारमध्ये अगदी पुण्यापासून ग्राहक येतात. पनवेलमध्ये एकूण १४० बार आहेत. त्यापैकी २९ हे लेडीज सर्व्हिस बार आहेत. या १४0 बारपैकी १२५ बार बंद होण्याच्या मार्गावर आहेत. १ एप्रिल २०१७ पासून हे बार कायमस्वरूपी बंद होतील. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गासह महामार्ग क्र मांक ४ वर हे बार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित बार हॉटेल्स ना नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात मोजमाप सुरू असून जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ते पूर्ण होईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पनवेल येथील अधिकारी सुधीर पोकळे यांनी दिली. पनवेलमधील कोन गाव व कोळखे परिसरात असलेले बहुतांश बार बंद झाल्यानंतर बारसाठी कुप्रसिध्द असलेल्या पनवेलची ओळख काही प्रमाणात पुसली जाईल. मात्र यामुळे सरकारचा जवळजवळ ४२ कोटींचा महसूल बुडणार आहे. हे बार बंद झाल्यास याठिकाणी काम करणाऱ्या पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळ घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीची प्रक्रि या आम्ही सुरू केली आहे. महामार्गालगत ५०० मीटरपर्यंत येणाऱ्या बारमालकांना प्राथमिक माहिती स्वरूपात नोटिसा बजावल्या आहेत. यासंदर्भात मोजमाप प्रक्रिया सुरू आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रि या संपेल, त्यानंतर सरकारला अहवाल पाठविला जाईल. - सुधीर पोकळे, अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पनवेल