शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

भालचंद्र कुलकर्णी यांना पी. सावळाराम पुरस्कार प्रदान

By admin | Updated: December 26, 2016 06:56 IST

पुरस्कार हे आम्हा कलाकारांच्या जगण्याचे टॉनिक आहे. पुरस्कारामुळे प्रोत्साहन तर मिळतेच, परंतु रसिकांशी बातचीत करण्याची संधीही मिळते

ठाणे : पुरस्कार हे आम्हा कलाकारांच्या जगण्याचे टॉनिक आहे. पुरस्कारामुळे प्रोत्साहन तर मिळतेच, परंतु रसिकांशी बातचीत करण्याची संधीही मिळते, अशा भावना ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. जनकवी पी. सावळाराम पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समितीतर्फे रविवारी गडकरी रंगायतन येथे जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार सोहळा झाला. कुलकर्णी म्हणाले की, पी. सावळाराम यांची प्रतिभा दिसते; पण त्यांनी केलेला संघर्ष हा अनेकांना माहीत नाही. ते एक प्रेमकवी, भक्तिगीत लिहिणारे कवी होते; पण त्याचबरोबर बंडखोर कवीदेखील होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. याआधी जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार सुरेश वाडकर, यशवंत देव, शिवाजी साटम यासारख्या अनेक दिग्गजांना मिळाला आहे आणि आज हा पुरस्कार मला देऊन त्यांच्या पंक्तीत बसवले आहे. याबद्दल मी कृतार्थ आहे. शहर स्वच्छ ठेवण्याबरोबर शहराची सांस्कृतिक भूक भागवायची असते, हे अनेक महापौरांना माहीत नसते; पण ठाण्याचे महापौर हे मात्र चांगलेच जाणतात, अशा शब्दांत महापौरांचे कौतुकही त्यांनी केले. अभिनेत्री माया जाधव यांनी रसिक तर सगळीकडेच असतात; पण कलाप्रेमी असणे महत्त्वाचे असते आणि ठाणेकर हे कलाप्रेमी आहेत, अशा शब्दांत ठाणेकरांचे कौतुक केले. या वर्षीच्या गंगाजमुना पुरस्काराने माया जाधव यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अभिनेता मंगेश देसाई यांना लक्षवेधी कलाकार म्हणून, प्रसिद्ध कवी सतीश सोळांकूरकर, आदर्श शिक्षक ग.ह.पेंडसे यांनाही जनकवी पी. सावळाराम विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. महापौर संजय मोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कवी अशोक बागवे, जनकवी पी. सावळाराम कला समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पाठारे, विश्वस्त संजय पाटील, उपायुक्त संदीप माळवी उपस्थित होते. शेवटी कला सरगम, सातारा प्रस्तुत ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ हा कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)