शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

रायगडात कोळसा उतरवण्यास विरोध

By admin | Updated: January 26, 2016 02:04 IST

मुंबईतील शिवडी बंदर परिसरात असणारा सुमारे ७० हजार टन कोळसा आता रायगडच्या माथी मारण्यात येत आहे. महाजेनकोचा हा कोळसा

अलिबाग : मुंबईतील शिवडी बंदर परिसरात असणारा सुमारे ७० हजार टन कोळसा आता रायगडच्या माथी मारण्यात येत आहे. महाजेनकोचा हा कोळसा अलिबाग तालुक्यातील धरमतर जेट्टीवर उतरविण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन शहाबाज येथील शेतकरी द्वारकानाथ पाटील आणि दर्शन जुईकर यांनी नुकतेच जिल्हा प्रशासनाला दिले.मुंबई उच्च न्यायालयातील एका प्रकरणातील जनहित याचिकेमधील शिवडी येथील हाजी बंदर परिसरात उघड्यावर लाखो टन कोळसा ठेवण्यात आला आहे. या कोळशाच्या साठ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे येथील कोळशाचा साठा अन्यत्र हलविण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. महाजेनको आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी हा कोळसा धरमतर जेट्टीवर हलविण्यात येणार असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले.हजारो टन कोळशामुळे मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोचणार असल्याने तो घरमतर येथे हलविण्यात येणार आहे. परंतु धरमतर जेट्टीपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर शहाबाज हे गाव लागूनच आहे. मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याला होणारी हानी धरमतर परिसरातील नागरिकांनाही होणारच आहे. त्यामुळे हा कोळसा धरमतर बंदरावर उतरविण्याला विरोध असल्याचे द्वारकानाथ पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शहाबाजमध्ये ७०५ कुटुंबे राहतात, ज्यांची लोकसंख्या सुमारे साडेचार हजारांच्या घरात आहे. शहाबज, वडखळ, पोयनाड, पेझारी, तीनविरा, कामार्ले, धसवड, चरी, आंबेपूर, कुडूर्स, श्रीगाव, वाघाडे यासह अन्य गावांतील शेती आणि नागरिकांचे आरोग्यही या कोळाशामुळे धोक्यात येणार असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय महाजेनकोचा कोळसा धरमतर बंदरावर उतरवू देण्यास सक्त विरोध असल्याचे पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांची बाजू जिल्हाधिकारी यांनी मांडावी. यासाठी विधी व न्याय विभागाकडे याबाबतचा तत्काळ अहवाल पाठवावा, अशी विनंती निवेदनात केली आहे. प्रलंबित जनहित याचिकेमध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)