शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

रायगडात कोळसा उतरवण्यास विरोध

By admin | Updated: January 26, 2016 02:04 IST

मुंबईतील शिवडी बंदर परिसरात असणारा सुमारे ७० हजार टन कोळसा आता रायगडच्या माथी मारण्यात येत आहे. महाजेनकोचा हा कोळसा

अलिबाग : मुंबईतील शिवडी बंदर परिसरात असणारा सुमारे ७० हजार टन कोळसा आता रायगडच्या माथी मारण्यात येत आहे. महाजेनकोचा हा कोळसा अलिबाग तालुक्यातील धरमतर जेट्टीवर उतरविण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन शहाबाज येथील शेतकरी द्वारकानाथ पाटील आणि दर्शन जुईकर यांनी नुकतेच जिल्हा प्रशासनाला दिले.मुंबई उच्च न्यायालयातील एका प्रकरणातील जनहित याचिकेमधील शिवडी येथील हाजी बंदर परिसरात उघड्यावर लाखो टन कोळसा ठेवण्यात आला आहे. या कोळशाच्या साठ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे येथील कोळशाचा साठा अन्यत्र हलविण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. महाजेनको आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी हा कोळसा धरमतर जेट्टीवर हलविण्यात येणार असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले.हजारो टन कोळशामुळे मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोचणार असल्याने तो घरमतर येथे हलविण्यात येणार आहे. परंतु धरमतर जेट्टीपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर शहाबाज हे गाव लागूनच आहे. मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याला होणारी हानी धरमतर परिसरातील नागरिकांनाही होणारच आहे. त्यामुळे हा कोळसा धरमतर बंदरावर उतरविण्याला विरोध असल्याचे द्वारकानाथ पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शहाबाजमध्ये ७०५ कुटुंबे राहतात, ज्यांची लोकसंख्या सुमारे साडेचार हजारांच्या घरात आहे. शहाबज, वडखळ, पोयनाड, पेझारी, तीनविरा, कामार्ले, धसवड, चरी, आंबेपूर, कुडूर्स, श्रीगाव, वाघाडे यासह अन्य गावांतील शेती आणि नागरिकांचे आरोग्यही या कोळाशामुळे धोक्यात येणार असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय महाजेनकोचा कोळसा धरमतर बंदरावर उतरवू देण्यास सक्त विरोध असल्याचे पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांची बाजू जिल्हाधिकारी यांनी मांडावी. यासाठी विधी व न्याय विभागाकडे याबाबतचा तत्काळ अहवाल पाठवावा, अशी विनंती निवेदनात केली आहे. प्रलंबित जनहित याचिकेमध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)