शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

अग्निशमन दल उघड्यावर

By admin | Updated: February 24, 2016 03:12 IST

आपत्काळात नागरिकांच्या मदतीला धावणारे वाशीचे अग्निशमन दलच उघड्यावर पडले आहे. जुनी इमारत मोडकळीस आल्याने त्याठिकाणी नवी इमारत उभारणीचे काम

नवी मुंबई : आपत्काळात नागरिकांच्या मदतीला धावणारे वाशीचे अग्निशमन दलच उघड्यावर पडले आहे. जुनी इमारत मोडकळीस आल्याने त्याठिकाणी नवी इमारत उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या दरम्यान अग्निशमन दलाच्या वाहनांसह कर्मचाऱ्यांची पर्यायी ठोस व्यवस्था होणे गरजेचे असतानाही केलेल्या पर्यायी सोयीमुळे कर्मचाऱ्यांची असुविधा होत आहे.महापालिका क्षेत्रात लागलेली आग विझवण्यास अनेक आपत्ती प्रसंगी अग्निशमन दलाने केलेले कार्य मोलाचे ठरत आहे. औद्योगिक क्षेत्राचे देखील स्वतंत्र अग्निशमन दल असतानाही त्याठिकाणच्या दुर्घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका महापालिकेच्याच अग्निशमन दलाला घ्यावी लागत आहे. महापालिकेच्या या महत्त्वाच्या अग्निशमन यंत्रणेचे वाशी येथे मुख्य केंद्र आहे. परंतु सध्या हेच अग्निशमन दलाचे केंद्र उघड्यावर पडले आहे. वाशी, ऐरोली व सीबीडी येथील अग्निशमन दलाच्या सिडकोकालीन इमारती जीर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून त्याठिकाणी राहावे लागत होते. अखेर सीबीडीपाठोपाठ वाशीच्या जुन्या इमारतीचे पुनर्बांधकाम पालिकेने हाती घेतले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या इमारत बांधकामाला सुरवात झाली आहे. यामुळे त्याच जागेवर विरुध्द दिशेला अग्निशमन दलाची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत कामगारांना नेरुळ किंवा इतर पर्यायी ठिकाणच्या इमारतींमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. यामध्ये कार्यालय मात्र पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. ज्याठिकाणी अग्निशमन दलाची वाहने उभी केली जात आहेत त्याठिकाणी सुरक्षा भिंतच नाही. यामुळे समोरच्या मार्गाने जाणारे कोणतेही वाहन थेट अग्निशमन दलाच्या जागेत प्रवेश करू शकते. याचाच गैरफायदा समाजकंटकांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायी सोय करतेवेळी त्याठिकाणची पूर्वीची भिंत पाडल्यानंतर पुन्हा ती बांधून फाटकही उभारलेले नाही. यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना वाहनांच्या सुरक्षेसाठी वाहनांसमोर बसून रात्र जागवावी लागत आहे. अग्निशमन दलात कोट्यवधी रुपये किमतीची वाहने असून नुकतेच एक नवे रेस्क्यू आॅपरेशन वाहन देखील सेवेत दाखल झाले आहे. ही सर्व वाहने त्याच ठिकाणी उभी असतात. कर्मचाऱ्यांसाठी बनवलेल्या तात्पुरत्या कार्यालयात पिण्याच्या पाण्यापासून ते इतर अनेक गैरसोयी होत आहेत. परंतु न्याय मागायचा तरी कोणाकडे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.वाशी अग्निशमन दलासाठी नवी इमारत उभारण्यासाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी आहे. या दरम्यान त्याच भूखंडाच्या मोकळ्या जागेत अग्निशमनची पर्यायी सोय केलेली आहे. तर कर्मचाऱ्यांसाठी नेरुळ व इतर उपलब्ध जागेत सोय केली जाणार आहे. सात ते आठ महिन्यांत कामाच्या पहिल्या टप्प्यात एक इमारत पूर्ण करून त्यामध्ये कार्यालयाची सोय केली जाईल. परिस्थितीची पाहणी करून लवकरच सुरक्षा भिंतही बांधली जाईल.- मोहन डगावकर, शहर अभियंता.