शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दल उघड्यावर

By admin | Updated: February 24, 2016 03:12 IST

आपत्काळात नागरिकांच्या मदतीला धावणारे वाशीचे अग्निशमन दलच उघड्यावर पडले आहे. जुनी इमारत मोडकळीस आल्याने त्याठिकाणी नवी इमारत उभारणीचे काम

नवी मुंबई : आपत्काळात नागरिकांच्या मदतीला धावणारे वाशीचे अग्निशमन दलच उघड्यावर पडले आहे. जुनी इमारत मोडकळीस आल्याने त्याठिकाणी नवी इमारत उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या दरम्यान अग्निशमन दलाच्या वाहनांसह कर्मचाऱ्यांची पर्यायी ठोस व्यवस्था होणे गरजेचे असतानाही केलेल्या पर्यायी सोयीमुळे कर्मचाऱ्यांची असुविधा होत आहे.महापालिका क्षेत्रात लागलेली आग विझवण्यास अनेक आपत्ती प्रसंगी अग्निशमन दलाने केलेले कार्य मोलाचे ठरत आहे. औद्योगिक क्षेत्राचे देखील स्वतंत्र अग्निशमन दल असतानाही त्याठिकाणच्या दुर्घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका महापालिकेच्याच अग्निशमन दलाला घ्यावी लागत आहे. महापालिकेच्या या महत्त्वाच्या अग्निशमन यंत्रणेचे वाशी येथे मुख्य केंद्र आहे. परंतु सध्या हेच अग्निशमन दलाचे केंद्र उघड्यावर पडले आहे. वाशी, ऐरोली व सीबीडी येथील अग्निशमन दलाच्या सिडकोकालीन इमारती जीर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून त्याठिकाणी राहावे लागत होते. अखेर सीबीडीपाठोपाठ वाशीच्या जुन्या इमारतीचे पुनर्बांधकाम पालिकेने हाती घेतले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या इमारत बांधकामाला सुरवात झाली आहे. यामुळे त्याच जागेवर विरुध्द दिशेला अग्निशमन दलाची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत कामगारांना नेरुळ किंवा इतर पर्यायी ठिकाणच्या इमारतींमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. यामध्ये कार्यालय मात्र पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. ज्याठिकाणी अग्निशमन दलाची वाहने उभी केली जात आहेत त्याठिकाणी सुरक्षा भिंतच नाही. यामुळे समोरच्या मार्गाने जाणारे कोणतेही वाहन थेट अग्निशमन दलाच्या जागेत प्रवेश करू शकते. याचाच गैरफायदा समाजकंटकांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायी सोय करतेवेळी त्याठिकाणची पूर्वीची भिंत पाडल्यानंतर पुन्हा ती बांधून फाटकही उभारलेले नाही. यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना वाहनांच्या सुरक्षेसाठी वाहनांसमोर बसून रात्र जागवावी लागत आहे. अग्निशमन दलात कोट्यवधी रुपये किमतीची वाहने असून नुकतेच एक नवे रेस्क्यू आॅपरेशन वाहन देखील सेवेत दाखल झाले आहे. ही सर्व वाहने त्याच ठिकाणी उभी असतात. कर्मचाऱ्यांसाठी बनवलेल्या तात्पुरत्या कार्यालयात पिण्याच्या पाण्यापासून ते इतर अनेक गैरसोयी होत आहेत. परंतु न्याय मागायचा तरी कोणाकडे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.वाशी अग्निशमन दलासाठी नवी इमारत उभारण्यासाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी आहे. या दरम्यान त्याच भूखंडाच्या मोकळ्या जागेत अग्निशमनची पर्यायी सोय केलेली आहे. तर कर्मचाऱ्यांसाठी नेरुळ व इतर उपलब्ध जागेत सोय केली जाणार आहे. सात ते आठ महिन्यांत कामाच्या पहिल्या टप्प्यात एक इमारत पूर्ण करून त्यामध्ये कार्यालयाची सोय केली जाईल. परिस्थितीची पाहणी करून लवकरच सुरक्षा भिंतही बांधली जाईल.- मोहन डगावकर, शहर अभियंता.