शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

कामाबाबत ठेकेदाराला नोटीस

By admin | Updated: March 4, 2016 01:50 IST

रेल्वे स्थानकावर जुना पादचारी पूल तोडून त्या ठिकाणी जास्त उंचीचा नवीन पादचारी पूल बांधण्यात आला. जुन्या पुलाच्या पायऱ्या मुंबईच्या दिशेकडे होत्या.

कर्जत : रेल्वे स्थानकावर जुना पादचारी पूल तोडून त्या ठिकाणी जास्त उंचीचा नवीन पादचारी पूल बांधण्यात आला. जुन्या पुलाच्या पायऱ्या मुंबईच्या दिशेकडे होत्या. मात्र नवीन पुलाच्या पायऱ्या ठेकेदाराने लोणावळ्याच्या दिशेने उतरवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत अनेक वेळा आवाज उठविण्यात आला, मात्र रेल्वे प्रशासन गप्प आहे. याबाबत कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे सदस्य पंकज ओसवाल यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होेती. त्यामध्ये पुलाच्या जिन्याचे काम ठेकेदार करीत नसल्यामुळे ठेकेदाराला नोटीस काढण्यात आली आहे, असे रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना लेखी स्वरूपात कळविले आहे. म्हणजे कर्जतकरांना मुंबईच्या दिशेकडील पायऱ्यांसाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार, अशी संतप्त प्रतिक्रिया कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे सदस्य पंकज ओसवाल यांनी व्यक्त केली आहे.कर्जत रेल्वे स्थानकावरील काही वर्षांपूर्वी जुना पादचारी पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पादचारी पूल बांधण्यात आला. नवीन पुलाची उंची जुन्या पुलापेक्षा जास्त करण्यात आली. त्यावेळी फलाट क्र मांक दोन व तीनकडे जाण्यासाठी लोणावळा बाजूकडे पायऱ्या तयार करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही वर्षांपूर्वी तांत्रिक कारणासाठी जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात आला. त्यावरून वृद्ध किंवा आजारी प्रवासी जाणे शक्य नाही. जुन्या पुलाच्या पायऱ्या मुंबईच्या दिशेला होत्या. नवीन पुलाच्या पायऱ्या विरुद्ध दिशेला म्हणजे लोणावळा दिशेला करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना वळसा घालून दोन व तीन क्र मांकाच्या तसेच ईएमयू फलाटावरील गाड्या पकडण्यासाठी धावपळ करावी लागते. याबाबत कर्जतकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली.कर्जतकरांच्या रेल्वे समस्यांविषयी आवाज उठवणारे पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाला याबाबतीत जाब विचारला असता, कर्जतकरांची गैरसोय होऊ नये म्हणूनच पुलाच्या पायऱ्या लोणावळ्याच्या दिशेकडे बांधण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. रेल्वे प्रशानाने या बाबतीत खुलासा देताना असे म्हटले आहे, की नव्याने बांधण्यात येणारा पादचारी पूल आधी बांधण्यात आला. त्यामुळे जुन्या पुलाच्या पायऱ्या मुंबई दिशेकडे होत्या. त्या आधी काढल्या असत्या तर प्रवाशांना दोन क्र मांकाच्या फलाटावरून जाणे शक्य झाले नसते. जुना व नवीन दोन्ही पुलांची उंची वेगळी असल्यामुळे जुन्या पुलाच्या पायऱ्या नवीन पुलाला जोडणे शक्य नव्हते, असे रेल्वे प्रशासनाने पंकज ओसवाल यांच्याकडे खुलासा केला आहे.हे काम १ नोहेंबर २०१५ ला सुरू होण्याची शक्यता आहे, असे ओसवाल यांना कळविले होते. मात्र फेबु्रवारी २०१६ उजाडला तरीही कामाचा पत्ता नसल्याने याबाबतीत पुन्हा विचारण केली असता रेल्वे प्रशासनाने ठेकेदारानेच तसे लिहून दिल्यामुळे आम्ही तुम्हाला असे कळविले होते, असे सांगितले. मात्र ठेकेदार कामच करीत नसल्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने त्या ठेकेदारास ८ डिसेंबर २०१५ ला नोटीस बजावली आहे. ठेकेदाराच्या झालेल्या कराराप्रमाणे कारवाई केली आहे, असे रेल्वे प्रशासनाने कळविले.