शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांत नवे वसतिगृह नाही, विद्यार्थ्यांची परवड

By admin | Updated: August 29, 2016 04:37 IST

एकीकडे उत्तीर्ण होणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी होणारी प्रचंड वाढ आणि दुसरीकडे गेल्या दहा वर्षांत एकही नवीन वसतीगृह उघडले न

शौकत शेख,  डहाणूएकीकडे उत्तीर्ण होणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी होणारी प्रचंड वाढ आणि दुसरीकडे गेल्या दहा वर्षांत एकही नवीन वसतीगृह उघडले न जाणे व अस्तित्वातील वसतीगृहे आणि आश्रमशाळा यांच्या इमारती मोडकळीस येणे. तुटपुंज्या दरामुळे भाड्याने इमारती न मिळणे यामुळे आदीवासी विद्यार्थ्यांची सध्या प्रचंड परवड होते आहे. विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अपुऱ्या आश्रमशाळा, तसेच निवासी वसतीगृहामुळे दरवर्षी हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापसून वंचित राहण्याची वेळ येत असून यावर्षी देखिल डहाणू, तलासरी, पालघर, वसई येथे एकही नवीन वस्तीगृह नवीन इमारत, किं वा विद्यमान वसतीगृहातील क्षमता वाढविली नसल्याचा फटका आदिवासी विद्यार्थ्यांना बसला आहे. दरवर्षी आदिवासी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण एकीकडे मोठ्या प्रमाणात वाढते आहे तर वस्तीगृहे आणि आश्रमशाळा यांच्या क्षमतेत मात्र वाढ होत नाही. जिल्हयाचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी वसतीगृहाची संख्या व क्षमता तातडीने वाढवावी अशी मागणी विविध आदिवासी संघटनांकडून होते आहे.शासनाने डहाणू, तलासरी, पालघर, वसई सारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात १७ निवासी वस्तीगृहे तसेच ३५ आश्रमशाळा याबरोबरच अनुदानित शाळा सुरू केल्या. त्यात सुमारे १६ हजार आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थीनी निवासी शिक्षण घेत असतात. त्यांना दररोज नाश्ता, दूध, फळांबरोबरच दोन वेळच्या भोजनाची देखिल शासनाने व्यवस्था केली आहे. शिवाय शहरीभागात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर अनुदान, शिष्यवृत्ती तसेच इतर खर्च दिला जात असल्याने ते मोठ्या प्रमाणात शिक्षणाकडे वळू लागल्याने डहाणू, पलघर, तलासरी, वसई सारख्या ठिकाणच्या वस्तीगृह तसेच आश्रमशाळा कमी पडू लागल्या आहेत. दरम्यान पालघर जिल्हयातील डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गावात गेल्या दहा वर्षात उत्तीर्ण होणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या हजारोच्या वर गेली आहे. मात्र शासन तसेच प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे आश्रमशाळा तसेच वसतीगृहाची संख्या जैसे थे असल्याने तालूक्याच्या ठिकाणी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, परिणामी दर वर्षी हाजारो गोर-गरीब विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून आपल्या कुटुंबियासोब रोजगारासाठी स्थलांतर करीत असतात. एकीकडे आदीवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करायचे आणि त्याचवेळी त्यांना प्राथमिक व माध्यमिक क्षणापासून वंचितही ठेवायचे असा दुतोंडी कारभार सध्या आदिवासी विकासखाते करते आहे.