शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

चारा नाही, पाणी नाही, दापचरी सुरु होणार कसा?

By admin | Updated: August 19, 2015 23:32 IST

पुरेसा पाऊस नाही, सिंचनासाठीचे वॉटरपंप जळालेले ते दुरुस्त करण्यासाठी निधीचा अभाव अशा कात्रीत दापचरी येथील शेतकरी अडकला असून त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर झाला आहे

तलासरी : पुरेसा पाऊस नाही, सिंचनासाठीचे वॉटरपंप जळालेले ते दुरुस्त करण्यासाठी निधीचा अभाव अशा कात्रीत दापचरी येथील शेतकरी अडकला असून त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर झाला आहे. येथील शासकीय प्रकल्प भ्रष्टाचारामुळे बंद पडलेला आहे. दुग्धव्यवसाय वाचविण्यासाठी येथील शेतकऱ्यांना कसरत करवी लागते आहे. जनावरांनासाठी लागणारा चारा पिकविण्यासाठी सिंचन सुविधा नाही, पाऊस पडत नाही त्यामुळे व्यवसाय करायचा कसा, हा प्रश्न आहे. एका बाजूला दूध उत्पादन करा, चारा पिकवा, याचा तगादा तर दुसऱ्या बाजूला चारा उत्पादनासाठी व जनावरांसाठी पाण्याचा पुरवठाच नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना (कृषी क्षेत्रधारकांना) प्रवाह व उपजल सिंचनाद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. सध्या उपजल सिंचन क्र. ४, ५ व १५८ वरील शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. तसेच उपजल सिंचन क्र. ५ वरील चारी क्र. २८ वरून होणारा पाणीपुरवठा गेल्या २० वर्षांपासून बंद आहे. तर उपजलसा सिंचन क्र. ४ धामणीनाला येथील विद्युत मोटारी जळाल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून कृषी सिंचन बंद आहे. उपजलसा क्र. ५ वर तीन मोटारी (विद्युत) असून त्यापैकी एकच मोटार गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. परंतु, तीही विद्युत मोटार जून २०१५ पासून बंद पडल्याने दापचरेतील कृषी क्षेत्राचा पाणीपुरवठा पूर्णत: बंद पडला आहे. त्यामुळे पावसाळा असूनसुद्धा शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा आहे. जून महिन्यापासून बंद पडलेल्या मोटारीची बेअरिंग जळाली आहे. परंतु, दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या विद्युत विभागाकडे बेअरिंग टाकून मोटार दुरुस्त करण्यासाठी निधीच उपलब्ध नाही. प्रकल्प बंद पडल्यापासून दापचरी प्रकल्पाच्या विद्युत विभागाला फारसे कामही नाही, तरीही अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर लाखो रुपये खर्च होतात. परंतु, बेअरिंगसाठी नाममात्र रक्कम खर्च करावयास असू नये, यासारखे दुर्दैव तरी कोणते. (वार्ताहर)