शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

धोक्याच्या सूचनांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष

By admin | Updated: February 3, 2016 02:22 IST

सोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

जयंत धुळप/आविष्कार देसाई,  अलिबागसोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सारा महाराष्ट्र हादरून गेला आणि कोकणातील समुद्रात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या पर्यटकांची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. कोकणात आणि विशेषत: रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीत आजवर समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्यामागे किनाऱ्यावर उपस्थित स्थानिकांच्या धोकाविषयक सूचना नाकारणे, बेफिकिरीने समुद्राच्या पाण्यात जाणे आणि दुर्दैवी मृत्यू ओढावून घेणे ही एकमेव समान परिस्थिती असल्याचे स्थानिक कोळी बांधव आणि पोलीस यांच्या निरीक्षण आणि नोंदीतून सातत्याने स्पष्ट झाले आहे. सोमवारी मुरुडमध्ये घडलेल्या घटनेच्यावेळीदेखील हीच परिस्थिती अनुभवास आली. मुले-मुली समुद्रात जात असताना स्थानिक नागरिक व जीवरक्षक यांनी आता समुद्राला ओहोटी आहे, असे अनेकदा आवर्जून सांगितले होते. मुलांनी ही धोक्याची सूचना नाकारून समुद्रात प्रवेश केल्याने ही दुघटना झाली. समुद्रात थोड्या अंतरावर एक खांब होता. त्याला हात लावण्याची स्पर्धा या मुलांमध्ये लागली होती. त्या स्पर्धेपोटी ही मुले समुद्रात गेली, अशीही परिस्थिती प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी सांगितली आणि अखेर नको तेच दुर्दैवी घडले. भरती-ओहोटीच्या वेळची ही तत्कालिक घळ निर्मिती व पुनर्भरणाची नैसर्गिक प्रक्रिया अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला, अलिबागचा किनारा येथे अनेकदा अनुभवास येते.> पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘गोवा पॅटर्न’ची गरजपर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर : पर्यटनाच्या सुरक्षिततेसाठी सुस्पष्ट धोरण नसल्याने रायगड जिल्ह्यातील बहुतांश समुद्रकिनारे पर्यटकांच्या जीवावर उठले आहेत. मांडव्यापासून थेट श्रीवर्धनपर्यंतच्या समुद्रकिनारी पर्यटकांची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दिसून येते. पर्यटनात अग्रेसर असणाऱ्या गोवा राज्याचे अनुकरण केल्यास यातील बरेचसे प्रश्न सुटण्यास निश्चितच मदत मिळणार आहे.जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, कर्जत माथेरान, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांचा प्रामुख्याने वाटा मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्यक्ष रोजगाराबरोबरच अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मितीही येथे मोठ्या संख्येने होत असल्याचे दिसून येते. वीकेंडला तर पर्यटकांच्या गाड्यांचा ताफाच या पर्यटनस्थळांकडे चाल करून येत असतो. उपलब्ध आकडेवारीनुसार पर्यटनाच्या हंगामात या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये सुमारे ६० हजार पर्यटक हे विविध पर्यटनस्थळांना भेट देतात. यातील निम्म्यापेक्षा जास्त पर्यटक हे समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक वेळ घालवित असतात. सुरक्षिततेसाठी अलिबागच्या मेन बीचशिवाय कोठेच सुरक्षा पुरवलेली नाही.अलिबाग नगरपालिकेने लाइफ गार्ड, स्पीड बोट, त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्यामध्ये बॅरेकेटिंग केले आहे. सूचना फलक, डेंजर झोन यांची माहिती दिली आहे. परंतु हे फक्त अलिबागच्या मेन बीचसाठीच मर्यादित आहे. मांडवा, सासवणे, किहीम, थळ, वरसोली, आक्षी, नागाव, रेवदंडा, बोर्ली-मांडला, काशिद, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन ही सर्व पर्यटनस्थळे विविध नगरपालिका अथवा वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या अखत्यारित येतात. त्यामुळे पर्यटकांना येथे सुरक्षा व्यवस्था पुरविण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘गोवा पॅटर्न’ची गरज आहे.