शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

धोक्याच्या सूचनांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष

By admin | Updated: February 3, 2016 02:22 IST

सोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

जयंत धुळप/आविष्कार देसाई,  अलिबागसोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सारा महाराष्ट्र हादरून गेला आणि कोकणातील समुद्रात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या पर्यटकांची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. कोकणात आणि विशेषत: रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीत आजवर समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्यामागे किनाऱ्यावर उपस्थित स्थानिकांच्या धोकाविषयक सूचना नाकारणे, बेफिकिरीने समुद्राच्या पाण्यात जाणे आणि दुर्दैवी मृत्यू ओढावून घेणे ही एकमेव समान परिस्थिती असल्याचे स्थानिक कोळी बांधव आणि पोलीस यांच्या निरीक्षण आणि नोंदीतून सातत्याने स्पष्ट झाले आहे. सोमवारी मुरुडमध्ये घडलेल्या घटनेच्यावेळीदेखील हीच परिस्थिती अनुभवास आली. मुले-मुली समुद्रात जात असताना स्थानिक नागरिक व जीवरक्षक यांनी आता समुद्राला ओहोटी आहे, असे अनेकदा आवर्जून सांगितले होते. मुलांनी ही धोक्याची सूचना नाकारून समुद्रात प्रवेश केल्याने ही दुघटना झाली. समुद्रात थोड्या अंतरावर एक खांब होता. त्याला हात लावण्याची स्पर्धा या मुलांमध्ये लागली होती. त्या स्पर्धेपोटी ही मुले समुद्रात गेली, अशीही परिस्थिती प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी सांगितली आणि अखेर नको तेच दुर्दैवी घडले. भरती-ओहोटीच्या वेळची ही तत्कालिक घळ निर्मिती व पुनर्भरणाची नैसर्गिक प्रक्रिया अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला, अलिबागचा किनारा येथे अनेकदा अनुभवास येते.> पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘गोवा पॅटर्न’ची गरजपर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर : पर्यटनाच्या सुरक्षिततेसाठी सुस्पष्ट धोरण नसल्याने रायगड जिल्ह्यातील बहुतांश समुद्रकिनारे पर्यटकांच्या जीवावर उठले आहेत. मांडव्यापासून थेट श्रीवर्धनपर्यंतच्या समुद्रकिनारी पर्यटकांची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दिसून येते. पर्यटनात अग्रेसर असणाऱ्या गोवा राज्याचे अनुकरण केल्यास यातील बरेचसे प्रश्न सुटण्यास निश्चितच मदत मिळणार आहे.जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, कर्जत माथेरान, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांचा प्रामुख्याने वाटा मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्यक्ष रोजगाराबरोबरच अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मितीही येथे मोठ्या संख्येने होत असल्याचे दिसून येते. वीकेंडला तर पर्यटकांच्या गाड्यांचा ताफाच या पर्यटनस्थळांकडे चाल करून येत असतो. उपलब्ध आकडेवारीनुसार पर्यटनाच्या हंगामात या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये सुमारे ६० हजार पर्यटक हे विविध पर्यटनस्थळांना भेट देतात. यातील निम्म्यापेक्षा जास्त पर्यटक हे समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक वेळ घालवित असतात. सुरक्षिततेसाठी अलिबागच्या मेन बीचशिवाय कोठेच सुरक्षा पुरवलेली नाही.अलिबाग नगरपालिकेने लाइफ गार्ड, स्पीड बोट, त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्यामध्ये बॅरेकेटिंग केले आहे. सूचना फलक, डेंजर झोन यांची माहिती दिली आहे. परंतु हे फक्त अलिबागच्या मेन बीचसाठीच मर्यादित आहे. मांडवा, सासवणे, किहीम, थळ, वरसोली, आक्षी, नागाव, रेवदंडा, बोर्ली-मांडला, काशिद, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन ही सर्व पर्यटनस्थळे विविध नगरपालिका अथवा वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या अखत्यारित येतात. त्यामुळे पर्यटकांना येथे सुरक्षा व्यवस्था पुरविण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘गोवा पॅटर्न’ची गरज आहे.