शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याच्या सूचनांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष

By admin | Updated: February 3, 2016 02:22 IST

सोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

जयंत धुळप/आविष्कार देसाई,  अलिबागसोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सारा महाराष्ट्र हादरून गेला आणि कोकणातील समुद्रात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या पर्यटकांची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. कोकणात आणि विशेषत: रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीत आजवर समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्यामागे किनाऱ्यावर उपस्थित स्थानिकांच्या धोकाविषयक सूचना नाकारणे, बेफिकिरीने समुद्राच्या पाण्यात जाणे आणि दुर्दैवी मृत्यू ओढावून घेणे ही एकमेव समान परिस्थिती असल्याचे स्थानिक कोळी बांधव आणि पोलीस यांच्या निरीक्षण आणि नोंदीतून सातत्याने स्पष्ट झाले आहे. सोमवारी मुरुडमध्ये घडलेल्या घटनेच्यावेळीदेखील हीच परिस्थिती अनुभवास आली. मुले-मुली समुद्रात जात असताना स्थानिक नागरिक व जीवरक्षक यांनी आता समुद्राला ओहोटी आहे, असे अनेकदा आवर्जून सांगितले होते. मुलांनी ही धोक्याची सूचना नाकारून समुद्रात प्रवेश केल्याने ही दुघटना झाली. समुद्रात थोड्या अंतरावर एक खांब होता. त्याला हात लावण्याची स्पर्धा या मुलांमध्ये लागली होती. त्या स्पर्धेपोटी ही मुले समुद्रात गेली, अशीही परिस्थिती प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी सांगितली आणि अखेर नको तेच दुर्दैवी घडले. भरती-ओहोटीच्या वेळची ही तत्कालिक घळ निर्मिती व पुनर्भरणाची नैसर्गिक प्रक्रिया अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला, अलिबागचा किनारा येथे अनेकदा अनुभवास येते.> पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘गोवा पॅटर्न’ची गरजपर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर : पर्यटनाच्या सुरक्षिततेसाठी सुस्पष्ट धोरण नसल्याने रायगड जिल्ह्यातील बहुतांश समुद्रकिनारे पर्यटकांच्या जीवावर उठले आहेत. मांडव्यापासून थेट श्रीवर्धनपर्यंतच्या समुद्रकिनारी पर्यटकांची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दिसून येते. पर्यटनात अग्रेसर असणाऱ्या गोवा राज्याचे अनुकरण केल्यास यातील बरेचसे प्रश्न सुटण्यास निश्चितच मदत मिळणार आहे.जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, कर्जत माथेरान, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांचा प्रामुख्याने वाटा मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्यक्ष रोजगाराबरोबरच अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मितीही येथे मोठ्या संख्येने होत असल्याचे दिसून येते. वीकेंडला तर पर्यटकांच्या गाड्यांचा ताफाच या पर्यटनस्थळांकडे चाल करून येत असतो. उपलब्ध आकडेवारीनुसार पर्यटनाच्या हंगामात या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये सुमारे ६० हजार पर्यटक हे विविध पर्यटनस्थळांना भेट देतात. यातील निम्म्यापेक्षा जास्त पर्यटक हे समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक वेळ घालवित असतात. सुरक्षिततेसाठी अलिबागच्या मेन बीचशिवाय कोठेच सुरक्षा पुरवलेली नाही.अलिबाग नगरपालिकेने लाइफ गार्ड, स्पीड बोट, त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्यामध्ये बॅरेकेटिंग केले आहे. सूचना फलक, डेंजर झोन यांची माहिती दिली आहे. परंतु हे फक्त अलिबागच्या मेन बीचसाठीच मर्यादित आहे. मांडवा, सासवणे, किहीम, थळ, वरसोली, आक्षी, नागाव, रेवदंडा, बोर्ली-मांडला, काशिद, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन ही सर्व पर्यटनस्थळे विविध नगरपालिका अथवा वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या अखत्यारित येतात. त्यामुळे पर्यटकांना येथे सुरक्षा व्यवस्था पुरविण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘गोवा पॅटर्न’ची गरज आहे.