शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

दुर्बल घटकातील कुटुंबांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:24 IST

पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींपुढे शासकीय अटींची बाधा ठरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

सूर्यकांत वाघमारे  नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींपुढे शासकीय अटींची बाधा ठरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे तीन लाखापर्यंतचे उत्पन्न असणे आवश्यक आहे. परंतु ज्यांचे पोटच हातावर आहे, अशांपुढे वेतनाचा कागदोपत्री पुरावा नसल्याच्या कारणावरून त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींनाही घर मिळावे यासाठी २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर हे केंद्र सरकारने धोरण हाती घेतले आहे. त्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० चौ.मी. क्षेत्रफळाच्या घरांचे वाटप केले जात आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे तीन लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न आवश्यक आहे, तर या उत्पन्नाचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्रच ग्राह्य धरले जात आहे. परंतु प्रक्रियेतील जाचक अटींमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना उत्पन्नाचा दाखला मिळवण्यात अडचणी येत आहेत.फेरीवाले, भाजी विक्रेते अथवा मजुरी कामगार यांचा या घटकात समावेश होतो. हातावर पोट असणाºया या घटकाकडे उत्पन्नाचा कसलाही ठोस पुरावा नसतो. यामुळे उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी त्यांना एका कार्यालयातून दुसºया कार्यालयात चपला झिजवाव्या लागत आहेत. त्यानंतरही हाती काहीच लागत नसल्याने अनेकांना केवळ उत्पन्न दाखल्याअभावी योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.असाच प्रकार वाशीत राहणाºया सुशीला बबन साळुंखे यांच्यासोबत घडला आहे. मागील अनेक महिन्यांपासून शासन दरबारी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लढा देत आहेत. भाजीचा व्यवसाय करणाºया या कुटुंबाने प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळवण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही केवळ उत्पन्नाच्या दाखल्याअभावी त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या. भाजीचा व्यवसाय करणाºया साळुंखे यांच्याकडे रोजच्या उत्पन्नाचा कागदोपत्री पुरावा नाही. याच कारणावरून तलाठी कार्यालयातून त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्यास नकार देण्यात आला.यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला असता, तिथेही नियमांवर बोट ठेवून त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याचे सुचवण्यात आले. हीच परिस्थिती राज्यातल्या इतरही भागांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची असल्याची चिंता सुशीला यांचे पती बबन मारुती साळुंखे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वांसाठी घर ही केंद्र सरकारची भूलथाप असून लाभार्थींना जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यासाठीच जाचक अटी लावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे योजना जाहीर करण्यापूर्वी त्याची अंमलबजावणी करण्यातल्या त्रुटी दूर करणे आवश्यक होते. परंतु ही बाब योजनेची अंमलबजावणी करणाºयांच्या नजरेआड राहिल्याने उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सर्वसामान्यांची पायपीट होत असल्याचा संताप साळुंखे कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.