शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्बल घटकातील कुटुंबांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:24 IST

पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींपुढे शासकीय अटींची बाधा ठरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

सूर्यकांत वाघमारे  नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींपुढे शासकीय अटींची बाधा ठरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे तीन लाखापर्यंतचे उत्पन्न असणे आवश्यक आहे. परंतु ज्यांचे पोटच हातावर आहे, अशांपुढे वेतनाचा कागदोपत्री पुरावा नसल्याच्या कारणावरून त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींनाही घर मिळावे यासाठी २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर हे केंद्र सरकारने धोरण हाती घेतले आहे. त्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० चौ.मी. क्षेत्रफळाच्या घरांचे वाटप केले जात आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे तीन लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न आवश्यक आहे, तर या उत्पन्नाचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्रच ग्राह्य धरले जात आहे. परंतु प्रक्रियेतील जाचक अटींमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना उत्पन्नाचा दाखला मिळवण्यात अडचणी येत आहेत.फेरीवाले, भाजी विक्रेते अथवा मजुरी कामगार यांचा या घटकात समावेश होतो. हातावर पोट असणाºया या घटकाकडे उत्पन्नाचा कसलाही ठोस पुरावा नसतो. यामुळे उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी त्यांना एका कार्यालयातून दुसºया कार्यालयात चपला झिजवाव्या लागत आहेत. त्यानंतरही हाती काहीच लागत नसल्याने अनेकांना केवळ उत्पन्न दाखल्याअभावी योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.असाच प्रकार वाशीत राहणाºया सुशीला बबन साळुंखे यांच्यासोबत घडला आहे. मागील अनेक महिन्यांपासून शासन दरबारी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लढा देत आहेत. भाजीचा व्यवसाय करणाºया या कुटुंबाने प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळवण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही केवळ उत्पन्नाच्या दाखल्याअभावी त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या. भाजीचा व्यवसाय करणाºया साळुंखे यांच्याकडे रोजच्या उत्पन्नाचा कागदोपत्री पुरावा नाही. याच कारणावरून तलाठी कार्यालयातून त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्यास नकार देण्यात आला.यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला असता, तिथेही नियमांवर बोट ठेवून त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याचे सुचवण्यात आले. हीच परिस्थिती राज्यातल्या इतरही भागांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची असल्याची चिंता सुशीला यांचे पती बबन मारुती साळुंखे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वांसाठी घर ही केंद्र सरकारची भूलथाप असून लाभार्थींना जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यासाठीच जाचक अटी लावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे योजना जाहीर करण्यापूर्वी त्याची अंमलबजावणी करण्यातल्या त्रुटी दूर करणे आवश्यक होते. परंतु ही बाब योजनेची अंमलबजावणी करणाºयांच्या नजरेआड राहिल्याने उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सर्वसामान्यांची पायपीट होत असल्याचा संताप साळुंखे कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.