शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

आंब्याचे उत्पादन वाढविण्यासाठी नियोजनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 02:15 IST

जीवन आरेकर यांचे मत : कृषी विभागाच्या वतीने पनवेल तालुक्यात आंबा मोहोर संरक्षण अभियान

पनवेल : आंब्याची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे व्यवस्थापन गरजेचे आहे. याकरिता बागायतदार शेतकऱ्यांना या फवारणीचे नियोजन केल्यास जास्तीतजास्त उत्पादन क्षमता वाढून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याचे मत कृषी विज्ञान शास्त्रज्ञ जीवन आरेकर यांनी व्यक्त केले. पळस्पे येथे आंबा मोहोर संरक्षण अभियानात ते बोलत होते.

कोकणातील काही पट्ट्यात आंबा पिकाची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आंब्याची उत्पादन क्षमता वाढवून शेतकºयांना त्याचा जास्तीतजास्त लाभ मिळावा या उद्देशाने पनवेल तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून आंबा मोहोर संरक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली जात असून, या अभियानांतर्गत माहिती दिली जात आहे. कृषी पर्यवेक्षक टी. एन. दोलतोडे यांच्या पुढाकाराने पनवेल तालुक्यात शासनाचा उपक्र म राबविला जात आहे. आंब्याला मोहोर आल्यावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कीटक, आळ्या आदींचा प्रादुर्भाव होत असतो. अशा वेळी या कीटकांचे योग्य वेळी व्यवस्थापन न केल्यास संपूर्ण मोहोर नष्ट होतो. त्यामुळे शेतकºयाचे मोठे नुकसान होते. अशा या कीटकांवर योग्य वेळी योग्य प्रमाणात कीटकनाशक औषधांची फवारणी केल्यास कीटक नष्ट होऊन आंब्याचा अधिक उत्पन्न घेता येऊ शकेल, या संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन आरेकर यांनी व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. आंब्याची लागवड केल्यानंतर मोहोर आल्यावर काय काळजी घ्यावी, या संदर्भात पूरक माहिती या उपक्रमात देण्यात आली. पनवेल तालुक्यात १२ ठिकाणी अशा प्रकारच्या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी नानोशी, नेरे, चिंचवन, पळस्पे या चार गावांमध्ये या मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.परतीच्या पावसामुळे बळीराजा संकटात आहे. मार्च महिन्यात साधारणत: आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. तत्पूर्वी तीन महिने आगोदरच शेतकºयांना यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी अभियान राबविला जात आहे. यावेळी कृषी पर्यवेक्षक टी. एन. दोलतोडे, कृषी सहायक डी. एस. लाड, पी. बोरहाडे, डी. एस. लवंडे, ए. डी. बुरकूल, व्ही. एच. पाटील, माजी सरपंच आर. गवंडी, कोंडीराम चोरघे, मारुती भगत चंद्रकांत भगत आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :panvelपनवेल