शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

नवी मुंबई बनले प्रमुख शैक्षणिक हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:50 IST

नवी मुंबईमध्ये दळणवळणाच्या सर्वोत्तम सुविधा आहेत. प्रत्येक शाळा व महाविद्यालयाला स्वतंत्र मैदान, सुसज्ज इमारत व इतर सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत. यामुळे मुंबई, ठाणे या शहरांतून नवी मुंबईमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

- नामदेव मोरेदेशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. केजी टू पीजीपर्यंत सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या संस्थांनी त्यांची केंद्रे शहरात सुरू केली आहेत. वैद्यकीय, व्यवस्थापन व इतर उच्च शिक्षणासाठी देशभरातील विद्यार्थी नवी मुंबईला पसंती देऊ लागले आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळात झाडाखाली जमिनीवर रेघोट्या मारून नवी मुंबईमधील शैक्षणिक पर्वाला सुरुवात झाली. शिरवणे व इतर काही गावांमध्ये धुळापाटीची शाळा प्रसिद्ध होती. शंभर वर्षांच्या काळामध्ये अनेक परिवर्तन होत गेली व नवी मुंबईची ओळख प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून देशभर झाली. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाºया ५०० पेक्षा जास्त शाळा आहेत. राज्य बोर्डाप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळाही येथे सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये जवळपास साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चार वैद्यकीय महाविद्यालये, दंतवैद्यकीय, आयुर्वेदिक महाविद्यालये, दहा हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयेही शहरात आहेत. उच्च शिक्षणासाठी देशभरातील विद्यार्थी येत आहेत. कनिष्ठ ते पदव्युत्तर महाविद्यालयांमध्येही हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशातील सर्व प्रमुख शैक्षणिक संस्थांनी त्यांची केंदे्र येथे सुरू करण्यास पसंती दिली आहे.नवी मुंबईमध्ये दळणवळणाच्या सर्वोत्तम सुविधा आहेत. प्रत्येक शाळा व महाविद्यालयाला स्वतंत्र मैदान, सुसज्ज इमारत व इतर सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत. यामुळे मुंबई, ठाणे या शहरांतून नवी मुंबईमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बस चालविणाºयांपासून स्टेशनरी पुरविण्यापर्यंत अनेक व्यवसायांना गती मिळत आहे. प्रत्येक वर्षी हजारो पदवीधर, डॉक्टर, अभियंते, व्यवस्थापन तज्ज्ञ घडविणारे शहर म्हणूनही नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. टी. एस. चाणक्य ही मरिन क्षेत्रातील सर्र्वोत्तम संस्था, खारघरमध्ये फॅशन विश्वातील सर्वोत्तम निफ्ट संस्थेची कार्यालयेही आहेत.सरकारी शाळांमध्येही आधुनिक शिक्षणनवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्येही आधुनिक शिक्षण दिले जात आहे. देशभर सर्वत्र सरकारी शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत आहे. परंतु नवी मुंबईमधील विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महानगरपालिकेने डिजिटल क्लास रूमसुरू केले आहेत.सीबीएससी बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. प्रत्येक नोडमध्ये माध्यमिक शाळाही सुरू केल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरू केल्या असून, मनपाच्या शाळांमध्ये ३० हजारपेक्षा जास्त विद्यार्थीशिक्षण घेत आहेत.सर्वोत्तम भौतिक सुविधा : नवी मुंबई, पनवेल परिसरामधील शाळांमध्ये सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रत्येक शाळा व महाविद्यालयाला मैदान राखीव असलेले नवी मुंबई हे एकमेव शहर आहे. सिडकोने सर्व शाळांना मैदान उपलब्ध करून दिले आहे. इमारतींसाठी भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. बहुतांश सर्व शाळांनी सर्व सुविधा असलेल्या इमारती उभ्या केल्या आहेत. यामुळे शहराबाहेरूनही विद्यार्थी शिक्षणासाठी नवी मुंबईमध्ये येऊ लागलेत.