शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

अस्तित्व टिकविण्यासाठी नाईक रस्त्यावर

By admin | Updated: March 11, 2017 02:28 IST

सत्ता असूनही स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न का नाही सोडवला, असा सवाल करून केवळ नैराश्यापोटी स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात

नवी मुंबई : सत्ता असूनही स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न का नाही सोडवला, असा सवाल करून केवळ नैराश्यापोटी स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. या वेळी बोलताना म्हात्रे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त यांची २०१५ पूर्वीची गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्याचा निर्णय घेतला. तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड हलवणे या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत झुणका भाकर केंद्र पूर्ववत ठेवणे, धोकादायक इमारतींचे पुनर्निर्माण आदी महत्त्वाचे प्रश्न निकाली काढण्यात आल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले. सिडकोने जेव्हा अतिक्रमणाची पहिली मोहीम हाती घेतली तेव्हा गावठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर पहिला हातोडा पडला, त्या वेळी हे नेते कुठे होते असा सवाल आ. मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला. शुक्रवारी झालेल्या निर्धार मोर्चात प्रकल्पग्रस्त नागरिकांचा सहभाग नव्हता, अशीही टीका या वेळी करण्यात आली. नवी मुंबईतील सिडको घरे फ्री होल्ड करणे, प्रकल्पग्रस्त, तुर्भे डम्पिंग ग्राउंड, सिडको विद्यावेतन आदी प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केला. लोकप्रतिनिधीच्या झोपड्यांवर कारवाई का केली जाते? या वेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, दीपक पवार, डॉ. राजेश पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तुर्भेतील डम्पिंगचा प्रश्न मार्गी येत्या आठवडाभरात तुर्भे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निकाली लावणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली. विटावा कळवा येथील गणपती पाडा मंदिराच्या मागे आणि बोनसरी अशा पर्यायी दोन जागांबाबत विचार केला जाणार आहे. वैभव नाईकांना पक्षाचे आमंत्रण नाही कोणत्याही कार्यक्रमाला, सभेला उपस्थित राहत नसल्याने पक्षाने वैभव नाईक यांना कोणत्याही कार्यक्रमाला न बोलाविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नगरसेवक रामचंद्र घरत यांनी दिली. पक्षाचा कोणताही कार्यक्रम अथवा सभेविषयी त्यांना कळविले जाणार नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.