शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

नगरपंचायतीचा जिल्हा परिषदेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 02:44 IST

जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे तेथून निर्माण होणारा कर रूपातील पैसा आता जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा

आविष्कार देसाई , अलिबागजिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे तेथून निर्माण होणारा कर रूपातील पैसा आता जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा न होता त्या त्या नगरपंचायतीच्या खात्यात जमा होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेला होणारी ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी एकतर ग्रामपंचायतींच्या इमारतीमध्ये थाटलेली नगर पंचायतींची कार्यालये काढून त्यांना भाडेतत्त्वावर द्यावी लागतील अथवा उत्पन्न वाढीसाठी अन्य बाबींचा विचार करावा लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेत याबाबत विचार करण्यात आला होता. जिल्हा परिषदेने खरोखरच असे पाऊल उचलले तर खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा आणि पोलादपूर या पाच नगरपंचायतींना आपापले कार्यालय थाटण्यासाठी नवीन जागेचा विचार करावा लागणार आहे. सध्या नगरपंचायतींकडे कार्यालयाबाबतचा कोणताच सेटअप नाही. रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प भले कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असला, तरी ग्रामपंचायत हे जिल्हा परिषदेचे प्रमुख अंग आहे. तेच नगरपंचायतींच्या रूपाने जिल्हा परिषदेपासून वेगळे झाले आहे. त्या त्या ग्रामपंचायतीमधून जिल्हा परिषदेला विविध करांच्या स्वरूपात पैसा मिळत होता. त्यावर काही प्रमाणात अंकुश लागला आहे. सध्या खालापूर, माणगाव, तळा, म्हसळा या ठिकाणी विकासकामे सुरू झाली आहेत. दिल्ली-मुंबई कॉरिडोर तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, दिघी पोर्ट, रेल्वेचा विस्तार, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गाचा विकास अशा विविध माध्यमांतून तेथे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प झपाट्याने उभे राहत आहेत. त्यामुळे तेथे रिअल इस्टेटच्या मार्केटला प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. येथे होणाऱ्या जमिनीच्या व्यवहारांवरचे मुद्रांक शुल्क जिल्हा परिषदेला प्राप्त व्हायचे, मात्र आता त्याला मुकावे लागणार आहे. त्याचप्रमाणे इतर कररूपाने मिळणाऱ्या महसुलावरही पाणी सोडावे लागणार आहे. निर्माण होणारी वित्तीय तूट भरून काढण्यासाठी जिल्हा परिषदेला उत्पन्नवाढीचे विविध मार्ग चोखाळावे लागणार आहेत.