शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीचा जिल्हा परिषदेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 02:44 IST

जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे तेथून निर्माण होणारा कर रूपातील पैसा आता जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा

आविष्कार देसाई , अलिबागजिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे तेथून निर्माण होणारा कर रूपातील पैसा आता जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा न होता त्या त्या नगरपंचायतीच्या खात्यात जमा होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेला होणारी ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी एकतर ग्रामपंचायतींच्या इमारतीमध्ये थाटलेली नगर पंचायतींची कार्यालये काढून त्यांना भाडेतत्त्वावर द्यावी लागतील अथवा उत्पन्न वाढीसाठी अन्य बाबींचा विचार करावा लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेत याबाबत विचार करण्यात आला होता. जिल्हा परिषदेने खरोखरच असे पाऊल उचलले तर खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा आणि पोलादपूर या पाच नगरपंचायतींना आपापले कार्यालय थाटण्यासाठी नवीन जागेचा विचार करावा लागणार आहे. सध्या नगरपंचायतींकडे कार्यालयाबाबतचा कोणताच सेटअप नाही. रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प भले कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असला, तरी ग्रामपंचायत हे जिल्हा परिषदेचे प्रमुख अंग आहे. तेच नगरपंचायतींच्या रूपाने जिल्हा परिषदेपासून वेगळे झाले आहे. त्या त्या ग्रामपंचायतीमधून जिल्हा परिषदेला विविध करांच्या स्वरूपात पैसा मिळत होता. त्यावर काही प्रमाणात अंकुश लागला आहे. सध्या खालापूर, माणगाव, तळा, म्हसळा या ठिकाणी विकासकामे सुरू झाली आहेत. दिल्ली-मुंबई कॉरिडोर तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, दिघी पोर्ट, रेल्वेचा विस्तार, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गाचा विकास अशा विविध माध्यमांतून तेथे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प झपाट्याने उभे राहत आहेत. त्यामुळे तेथे रिअल इस्टेटच्या मार्केटला प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. येथे होणाऱ्या जमिनीच्या व्यवहारांवरचे मुद्रांक शुल्क जिल्हा परिषदेला प्राप्त व्हायचे, मात्र आता त्याला मुकावे लागणार आहे. त्याचप्रमाणे इतर कररूपाने मिळणाऱ्या महसुलावरही पाणी सोडावे लागणार आहे. निर्माण होणारी वित्तीय तूट भरून काढण्यासाठी जिल्हा परिषदेला उत्पन्नवाढीचे विविध मार्ग चोखाळावे लागणार आहेत.