शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

शहरात साथीचे आजार कमी होत असल्याचा महापालिकेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:20 IST

मलेरियाचे वर्षभरात फक्त ९२ रुग्ण । पाण्यामुळे उद्भवणाऱ्या रुग्णसंख्येतही घट

नवी मुंबई : पावसाळ्यामध्ये तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना महानगरपालिकेने मात्र शहरात प्रत्येक वर्षी साथीच्या आजाराचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा केला आहे. गत वर्षभरामध्ये मलेरियाचे फक्त ९२ व पाण्यामुळे उद्भवणाºया आजाराचे ९६ रुग्ण आढळले असल्याचे स्पष्ट केले आहे.

पावसाळा सुरू झाला की साथीचे आजारही वाढतात. नवी मुंबईमध्येही प्रत्येक वर्षी डेंग्यू, मलेरियाचे संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असतात. तापामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये महापालिका व खासगी रुग्णालयामधील रुग्णसंख्येत जवळपास दीडपट ते दुप्पट वाढ होत असते; परंतु महापालिका प्रशासनाने मात्र नवी मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याची माहिती पर्यावरण अहवालामध्ये दिली आहे. शहरामध्ये २०१४-१५ मध्ये मलेरियाचे ३५६ रुग्ण आढळले होते. गतवर्षी फक्त ९२ रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीमध्ये डेंग्यूचे रुग्ण ७६ वरून चारवर आले आहेत. महापालिकेने प्रत्येक नोडमध्ये डास अळी फवारणी सुरू केली आहे. पाणी साठणाºया ठिकाणी गप्पी मासे सोडण्यास सुरुवात केली आहे. डेंग्यू किंवा मलेरियाचा संशयित रुग्ण आढळल्यास रुग्ण राहत असलेल्या परिसरातील १०० घरांचीही तपासणी केली जात आहे. या उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नवी मुंबईला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. धरणातून येणाºया पाण्यावर प्रक्रिया करून ते नागरिकांपर्यंत पोहोचविले जात आहे. पिण्याचे पाणी चांगले असल्यामुळे पाण्यापासून उद्भवणाºया रुग्णांचे प्रमाणही कमी होत आहे. २०१५-१६ मध्ये पाण्यामुळे ३५१ जण आजारी पडले होते. गतवर्षी रुग्णांची संख्या ४० वर आली आहे.शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्यास त्याचे निदान व उपचार करण्यासाठी २७ पडताळणी केंद्र आहेत. २३ नागरी आरोग्य केंद्र, ३ सर्वसाधारण रुग्णालये व माताबाल रुग्णालयातही यासाठी सुविधा उपलब्ध करून दिले असून शहरातील कर्मचारी, मुख्याध्यापक, खासगी रुग्णालयातील कर्मचाºयांनाही आवश्यक प्रशिक्षण दिले आहे.