शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

शहरात साथीचे आजार कमी होत असल्याचा महापालिकेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:20 IST

मलेरियाचे वर्षभरात फक्त ९२ रुग्ण । पाण्यामुळे उद्भवणाऱ्या रुग्णसंख्येतही घट

नवी मुंबई : पावसाळ्यामध्ये तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना महानगरपालिकेने मात्र शहरात प्रत्येक वर्षी साथीच्या आजाराचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा केला आहे. गत वर्षभरामध्ये मलेरियाचे फक्त ९२ व पाण्यामुळे उद्भवणाºया आजाराचे ९६ रुग्ण आढळले असल्याचे स्पष्ट केले आहे.

पावसाळा सुरू झाला की साथीचे आजारही वाढतात. नवी मुंबईमध्येही प्रत्येक वर्षी डेंग्यू, मलेरियाचे संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असतात. तापामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये महापालिका व खासगी रुग्णालयामधील रुग्णसंख्येत जवळपास दीडपट ते दुप्पट वाढ होत असते; परंतु महापालिका प्रशासनाने मात्र नवी मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याची माहिती पर्यावरण अहवालामध्ये दिली आहे. शहरामध्ये २०१४-१५ मध्ये मलेरियाचे ३५६ रुग्ण आढळले होते. गतवर्षी फक्त ९२ रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीमध्ये डेंग्यूचे रुग्ण ७६ वरून चारवर आले आहेत. महापालिकेने प्रत्येक नोडमध्ये डास अळी फवारणी सुरू केली आहे. पाणी साठणाºया ठिकाणी गप्पी मासे सोडण्यास सुरुवात केली आहे. डेंग्यू किंवा मलेरियाचा संशयित रुग्ण आढळल्यास रुग्ण राहत असलेल्या परिसरातील १०० घरांचीही तपासणी केली जात आहे. या उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नवी मुंबईला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. धरणातून येणाºया पाण्यावर प्रक्रिया करून ते नागरिकांपर्यंत पोहोचविले जात आहे. पिण्याचे पाणी चांगले असल्यामुळे पाण्यापासून उद्भवणाºया रुग्णांचे प्रमाणही कमी होत आहे. २०१५-१६ मध्ये पाण्यामुळे ३५१ जण आजारी पडले होते. गतवर्षी रुग्णांची संख्या ४० वर आली आहे.शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्यास त्याचे निदान व उपचार करण्यासाठी २७ पडताळणी केंद्र आहेत. २३ नागरी आरोग्य केंद्र, ३ सर्वसाधारण रुग्णालये व माताबाल रुग्णालयातही यासाठी सुविधा उपलब्ध करून दिले असून शहरातील कर्मचारी, मुख्याध्यापक, खासगी रुग्णालयातील कर्मचाºयांनाही आवश्यक प्रशिक्षण दिले आहे.