शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

शहरात साथीचे आजार कमी होत असल्याचा महापालिकेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:20 IST

मलेरियाचे वर्षभरात फक्त ९२ रुग्ण । पाण्यामुळे उद्भवणाऱ्या रुग्णसंख्येतही घट

नवी मुंबई : पावसाळ्यामध्ये तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना महानगरपालिकेने मात्र शहरात प्रत्येक वर्षी साथीच्या आजाराचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा केला आहे. गत वर्षभरामध्ये मलेरियाचे फक्त ९२ व पाण्यामुळे उद्भवणाºया आजाराचे ९६ रुग्ण आढळले असल्याचे स्पष्ट केले आहे.

पावसाळा सुरू झाला की साथीचे आजारही वाढतात. नवी मुंबईमध्येही प्रत्येक वर्षी डेंग्यू, मलेरियाचे संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असतात. तापामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये महापालिका व खासगी रुग्णालयामधील रुग्णसंख्येत जवळपास दीडपट ते दुप्पट वाढ होत असते; परंतु महापालिका प्रशासनाने मात्र नवी मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याची माहिती पर्यावरण अहवालामध्ये दिली आहे. शहरामध्ये २०१४-१५ मध्ये मलेरियाचे ३५६ रुग्ण आढळले होते. गतवर्षी फक्त ९२ रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीमध्ये डेंग्यूचे रुग्ण ७६ वरून चारवर आले आहेत. महापालिकेने प्रत्येक नोडमध्ये डास अळी फवारणी सुरू केली आहे. पाणी साठणाºया ठिकाणी गप्पी मासे सोडण्यास सुरुवात केली आहे. डेंग्यू किंवा मलेरियाचा संशयित रुग्ण आढळल्यास रुग्ण राहत असलेल्या परिसरातील १०० घरांचीही तपासणी केली जात आहे. या उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नवी मुंबईला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. धरणातून येणाºया पाण्यावर प्रक्रिया करून ते नागरिकांपर्यंत पोहोचविले जात आहे. पिण्याचे पाणी चांगले असल्यामुळे पाण्यापासून उद्भवणाºया रुग्णांचे प्रमाणही कमी होत आहे. २०१५-१६ मध्ये पाण्यामुळे ३५१ जण आजारी पडले होते. गतवर्षी रुग्णांची संख्या ४० वर आली आहे.शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्यास त्याचे निदान व उपचार करण्यासाठी २७ पडताळणी केंद्र आहेत. २३ नागरी आरोग्य केंद्र, ३ सर्वसाधारण रुग्णालये व माताबाल रुग्णालयातही यासाठी सुविधा उपलब्ध करून दिले असून शहरातील कर्मचारी, मुख्याध्यापक, खासगी रुग्णालयातील कर्मचाºयांनाही आवश्यक प्रशिक्षण दिले आहे.