शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
3
जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 
4
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
5
Stock Market Today: सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी
6
२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये
7
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
8
अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की
9
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
10
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
11
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
12
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
13
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
14
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
15
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
17
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
18
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
19
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
20
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील

पालिका शाळांची शोकांतिका

By admin | Updated: February 2, 2016 02:12 IST

नवी मुंबईमधील झोपडपट्टी परिसरातील शाळांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पत्र्याचे शेड, समाजमंदिर व झोपडीमध्ये तीन शाळा भरविण्यात येत असून त्यामध्ये २२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत

नामदेव मोरे, नवी मुंबई नवी मुंबईमधील झोपडपट्टी परिसरातील शाळांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पत्र्याचे शेड, समाजमंदिर व झोपडीमध्ये तीन शाळा भरविण्यात येत असून त्यामध्ये २२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका शाळेत विद्यार्थ्यांना शौचालयही नसून इतर दोन शाळांमध्ये प्रत्येकी एकच शौचालय आहे. बसण्यासाठी पुरेशी जागाही नसून शाळांचे कोंडवाडे झाले असतानाही प्रशासन या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. नवी मुंबई महानगरपालिकेने स्कूल व्हिजनच्या माध्यमातून जिल्हा परिषद काळातील जुन्या इमारती पाडून बहुमजली इमारती उभ्या केल्या आहेत. परंतु या शाळा सिडको नोड व गावठाण परिसरात झाल्या आहेत. तुर्भे स्टोअर व राबाडा झोपडपट्टी वगळता इतर झोपडपट्ट्यांमधील शाळांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सर्वात गंभीर स्थिती यादवनगरमधील हिंदी माध्यमाच्या शाळा क्रमांक ७७ ची झाली आहे. पहिली ते आठवीपर्यंत तब्बल १८०० विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत. वाहने उभी करण्यासाठी तयार केलेल्या शेडमध्ये शाळा भरविण्यात आली आहे. पावसाळ्यात वर्गात पाणी साचते. उन्हाळ्यात पत्र्यामुळे प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने माजी नगरसेवक रामअशिष यादव यांच्या कार्यालयात शाळा भरविली जात आहे. दोन ठिकाणी शाळा भरत असून १८०० विद्यार्थ्यांसाठी एकच शौचालय आहे. शाळेमध्ये वीजपुरवठाही लोकप्रतिनिधींनीच उपलब्ध करून दिला आहे. मनपा प्रशासन एमआयडीसीकडून जागा देत नसल्याचे कारण सांगून जबाबदारी झटकत आहे. यादवनगरपासून काही अंतरावर सुभाषनगरमध्ये पालिकेची शाळा क्रमांक ७९ आहे. रोडला लागून एक झोपडी व समाजमंदिरात शाळा भरत आहे. पाचवीपर्यंतचे वर्ग अपुऱ्या जागेत बसविले जात आहेत. याशिवाय बालवाडी व खेळवाडीही याच ठिकाणी सुरू आहे. जवळपास २०० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी फक्त एकच शौचालय आहे. शौचालयाला लागून एक नळजोडणी आहे. शौचालय व पिण्यासाठी त्याच ठिकाणावरून पाणी घ्यावे लागत आहे. अशीच स्थिती इलठाणपाडा शाळा क्रमांक ५६ मध्ये आहे. येथे समाजमंदिर व बाजूच्या खोलीत शाळा भरते. वर्गखोल्या पुरेशा नसल्याने त्यांची गैरसोय होत असून प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. स्वच्छतेचा पुरस्कार कसा मिळाला ?महापालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये दोन वेळा प्रथम क्रमांक मिळाला आहे. परंतु वास्तवामध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालयही नाही. विद्यार्थिनी व शिक्षिकांचीही प्रचंड गैरसोय होत असून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गरीब वस्तीमधील शाळांची दुरवस्था झाली असताना मनपाला स्वच्छतेसाठीचा पुरस्कार मिळालाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एमआयडीसीच्या जागेवर ५० हजारपेक्षा जास्त झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. शहरामध्ये तबेल्यांसाठीही फुकटची जागा दिली असून त्यांच्यावर कधीच कारवाई झालेली नाही. परंतु शाळेसाठी जागा मागितल्यास एमआयडीसी प्रशासन शाळेसाठी जागा देता येत नसल्याचे कारण सांगत आहे. यादवनगरमधील शाळेसाठी जागा देण्याचे निश्चित केले. परंतु वर्षाला १ कोटीपेक्षा जास्त भाडे आकारले होते. भूमाफियांनी बिनधास्तपणे अतिक्रमण केले तरी चालते परंतु महापालिकेने गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जागा मागितली तर दिली जात नसल्याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.