शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

निवडणुकीत ‘आघाड्यां’ची चलती

By admin | Updated: October 24, 2016 03:01 IST

महापालिका निवडणुकीकरिता प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहेच. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या स्वतंत्र निवडणूक लढविण्यास सज्ज होऊ लागल्या आहेत.

वैभव गायकर, पनवेलमहापालिका निवडणुकीकरिता प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहेच. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या स्वतंत्र निवडणूक लढविण्यास सज्ज होऊ लागल्या आहेत. कळंबोलीत रोडपाली-कळंबोली विकास आघाडीची स्थापना झाली असून त्याचे सर्व राजकीय पक्षासमोर मोठे आव्हान आहे. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये ग्राम विकास आघाडीचा उदय होण्याचे चिन्ह आहे. याशिवाय खारघर फोरम सुध्दा डोकेवर काढू लागली आहे.भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना या तीन प्रमुख पक्षांच्या नियमित बैठका सुरू आहेत. त्याचबरोबर महापौरपदासाठीही जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून सामाजिक उपक्र माचा धडाका लावण्यात आला आहे. नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी शहरात होर्डिंग्ज व बॅनरबाजीवर जोर दिला आहे. भाजपाच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तर शेकापकडून माजी आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेतल्या जात आहेत. शिवसेनेकडून सुध्दा जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसकडून ‘एकला चलो रे’चा सूर निघाला आहे. राष्ट्रवादीने शेकापला आपल्या सोबत घेतले आहे. कळंबोलीत अशी अनोखी आघाडी स्थानिक नेते आत्माराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते पाटील गेल्या काही वर्षांपासून घड्याळापासून दूर असून त्यांनी आपले काम स्वतंत्ररीत्या सुरू ठेवले आहे. पनवेल महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. कळंबोली जिल्हा परिषदेत गटात गत निवडणुकीचा अपवाद वगळता, त्यांनी पाच वेळा आपल्या समर्थकाला निवडून आणले होते. त्यांचे बंधू महादेव पाटील त्याचबरोबर पत्नी अनिता पाटील हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. खारघरमध्ये कॉलनी फोरम सक्रिय!खारघरमध्ये मागील ग्रामपंचायत निवडणुकीत खारघर कॉलनी फोरम स्थापन करण्यात आली होती. वसाहतीमधील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य खारघर ग्रामपंचायतीमध्ये बसावेत हा या मागचा उद्देश होता. सर्वपक्षीय विरु द्ध फोरम असे चित्र खारघरमध्ये निर्माण झाले होते. आपली छाप पाडणाऱ्या फोरमला यावेळी यश मिळाले नव्हते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भाजपा प्रवेशानंतर खारघर कॉलनी फोरमचे सदस्य भाजपात सहभागी झाले होते. मात्र खारघरमधील पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा एकदा फोरमला सक्रिय करण्यास कारणीभूत ठरत असून फोरममधील मंडळी पुन्हा एक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वच पक्षांतून सर्वांनाच तिकीट देणे अशक्य आहे. त्यामुळे नाराज सुध्दा फोरमची वाट धरू शकतात.कळंबोलीत विकास आघाडी महत्त्वाचीरोडपाली-कळंबोली विकास आघाडीची स्थापना करणारे आत्माराम पाटील यांनी कळंबोली वसाहत समुद्रसपाटीपासून साडेतीन मीटर खाली असल्याचे पाणी साचत असल्याचे उघड केले. सिडको कोट्यवधीं खर्च करून पावसाचे पाणी जाण्याकरिता नियोजन केले. त्याचबरोबर मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्न आत्माराम पाटील यांनी तडीस नेला, त्याकरिता पंधरा वर्षे पाठपुरावा केला. पेट्रोलपंपापासून रस्ते, पाण्याच्या सुविधेकरिता सिडकोविरोधात आंदोलन केले.रोडपालीत डासांच्या निर्मिती करणाऱ्या भूखंडावर साडेसातशे डम्पर माती स्वखर्चाने टाकली. विकास आघाडीच्या या जमेचा बाजू असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली आहे.