शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

मनपा रोज वाचविते १० दशलक्ष लिटर पाणी

By admin | Updated: March 30, 2016 01:54 IST

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून रोज वाया जाणारे १० दशलक्ष लिटर पाणी वाचविण्यात महापालिकेला यश आले आहे. अभियांत्रिकी विभागाच्या दक्षतेमुळे हे शक्य झाले असून यामुळे शहरातील

- नामदेव मोरे,  नवी मुंबई भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून रोज वाया जाणारे १० दशलक्ष लिटर पाणी वाचविण्यात महापालिकेला यश आले आहे. अभियांत्रिकी विभागाच्या दक्षतेमुळे हे शक्य झाले असून यामुळे शहरातील ५० हजार नागरिकांना पाणी पुरविणे शक्य झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे स्वत:चे धरण असतानाही शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाऊस कमी पडल्यामुळे धरणातील साठा कमी झाला असल्याचे सांगितले जात असले तरी ते वास्तव नाही. पाणीपुरवठा विभागाने पाणी वाटपाचे योग्य नियोजन न केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. पाण्याच्या उधळपट्टीवरून टीका होत असताना शहर अभियंता विभागाने दूरदृष्टी दाखवून रोज १० दशलक्ष लिटर पाणी वाचविले आहे याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. मोरबे धरणातून येणाऱ्या पाण्यावर भोकरपाडा येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्रामध्ये पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर गाळ असलेले १० एमएलडी पाणी रोज सोडून द्यावे लागत होते. ५० हजार नागरिकांना पुरेल एवढे पाणी वाया जात असल्याने आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता मोहन डगावकर व मोरबे धरणाचे कार्यकारी अभियंता जसवंत मिस्त्री यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून या केंद्रात येणाऱ्या १०० टक्के पाण्याचा वापर पिण्यासाठी करणे शक्य झाले आहे. राज्यात दुष्काळ असल्याने अनेक नागरिकांना एक घागर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. अशा स्थितीमध्ये पालिकेने रोज १० एमएलडी पाणी वाचविण्याची यंत्रणा कार्यान्वित केल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. अभियांत्रिकी विभागाने भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा पुनर्वापर केला आहे. अशाप्रकारे यंत्रणा राबविणारी व प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारी पहिलीच पालिका आहे. याशिवाय महापालिकेच्या मुख्यालयामध्येही पाणी बचतीसाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. मुख्यालयामध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा परिसरातील उद्यान, वृक्ष व कारंजासाठी वापर केला जात आहे. याशिवाय मुख्यालयातील वॉश रूममध्ये फ्लशसाठीही याच पाण्याचा उपयोग केला जात आहे. यामुळे अनावश्यक गोष्टींसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळता येवू लागला आहे. याशिवाय येथे बायोगॅस प्रकल्पही सुरू केला आहे. मुख्यालयाच्या कँटीनमधील कचरा व सांडपाण्यापासून बायोगॅस तयार होत आहे. हा गॅस कँटीनमध्ये स्वयंपाकासाठी उपयोगात येवू लागला आहे. मुख्यालयात कचऱ्याचे प्रमाण कमी असल्यामुळे रोज दोन ते अडीच तास पुरेल एवढी गॅसनिर्मिती होत आहे. अभियांत्रिकी विभागाने राबविलेल्या या उपक्रमांचे इतर महापालिकांनी व शहरातील मॉल्स, हॉटेलचालकांनी अंमलबजावणी केली तर मोठ्या प्रमाणात पाणी बचत शक्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मॉल्ससह हॉटेलना सक्ती करावीपालिका मुख्यालयात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. बायोगॅस प्रकल्पही उभारला आहे. मुख्यालयापेक्षा कित्येक पट जास्त पाणी मॉल्स व मोठ्या हॉटेलना लागत आहे. कचराही मोठ्या प्रमाणात निघत असून पालिकेप्रमाणे बायोगॅस प्रकल्प व प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वॉशरूम, गार्डन व इतर गोष्टींसाठी वापर करावा, अन्यथा संबंधितांचा पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे. महापालिका मुख्यालयातील सांडपाण्यावर याच ठिकाणी प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उद्यान, वॉशरूमसाठीही याच पाण्याचा वापर केला जात आहे. याशिवाय येथे उभारलेल्या बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणारा गॅस कँटीनला दिला जात आहे. - मोहन डगावकर, शहर अभियंता, महापालिकाभोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून रोज १० एमएलडी पाणी सोडून द्यावे लागत होते. आधुनिक तंत्राचा वापर करून या पाण्यावरही प्रक्रिया करून त्याचा वापर सुरू केला आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी ६ कोटी रूपये खर्च आला आहे. परंतु त्यामुळे पालिकेचे रोजचे ८० हजार रूपये वाचू लागले आहेत. रोज ५० हजार नागरिकांना पुरेल एवढे पाणी उपलब्ध झाले आहे. - जसवंत मिस्त्री, कार्यकारी अभियंता, मोरबे धरण