शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

मनपा रोज वाचविते १० दशलक्ष लिटर पाणी

By admin | Updated: March 30, 2016 01:54 IST

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून रोज वाया जाणारे १० दशलक्ष लिटर पाणी वाचविण्यात महापालिकेला यश आले आहे. अभियांत्रिकी विभागाच्या दक्षतेमुळे हे शक्य झाले असून यामुळे शहरातील

- नामदेव मोरे,  नवी मुंबई भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून रोज वाया जाणारे १० दशलक्ष लिटर पाणी वाचविण्यात महापालिकेला यश आले आहे. अभियांत्रिकी विभागाच्या दक्षतेमुळे हे शक्य झाले असून यामुळे शहरातील ५० हजार नागरिकांना पाणी पुरविणे शक्य झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे स्वत:चे धरण असतानाही शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाऊस कमी पडल्यामुळे धरणातील साठा कमी झाला असल्याचे सांगितले जात असले तरी ते वास्तव नाही. पाणीपुरवठा विभागाने पाणी वाटपाचे योग्य नियोजन न केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. पाण्याच्या उधळपट्टीवरून टीका होत असताना शहर अभियंता विभागाने दूरदृष्टी दाखवून रोज १० दशलक्ष लिटर पाणी वाचविले आहे याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. मोरबे धरणातून येणाऱ्या पाण्यावर भोकरपाडा येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्रामध्ये पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर गाळ असलेले १० एमएलडी पाणी रोज सोडून द्यावे लागत होते. ५० हजार नागरिकांना पुरेल एवढे पाणी वाया जात असल्याने आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता मोहन डगावकर व मोरबे धरणाचे कार्यकारी अभियंता जसवंत मिस्त्री यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून या केंद्रात येणाऱ्या १०० टक्के पाण्याचा वापर पिण्यासाठी करणे शक्य झाले आहे. राज्यात दुष्काळ असल्याने अनेक नागरिकांना एक घागर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. अशा स्थितीमध्ये पालिकेने रोज १० एमएलडी पाणी वाचविण्याची यंत्रणा कार्यान्वित केल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. अभियांत्रिकी विभागाने भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा पुनर्वापर केला आहे. अशाप्रकारे यंत्रणा राबविणारी व प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारी पहिलीच पालिका आहे. याशिवाय महापालिकेच्या मुख्यालयामध्येही पाणी बचतीसाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. मुख्यालयामध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा परिसरातील उद्यान, वृक्ष व कारंजासाठी वापर केला जात आहे. याशिवाय मुख्यालयातील वॉश रूममध्ये फ्लशसाठीही याच पाण्याचा उपयोग केला जात आहे. यामुळे अनावश्यक गोष्टींसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळता येवू लागला आहे. याशिवाय येथे बायोगॅस प्रकल्पही सुरू केला आहे. मुख्यालयाच्या कँटीनमधील कचरा व सांडपाण्यापासून बायोगॅस तयार होत आहे. हा गॅस कँटीनमध्ये स्वयंपाकासाठी उपयोगात येवू लागला आहे. मुख्यालयात कचऱ्याचे प्रमाण कमी असल्यामुळे रोज दोन ते अडीच तास पुरेल एवढी गॅसनिर्मिती होत आहे. अभियांत्रिकी विभागाने राबविलेल्या या उपक्रमांचे इतर महापालिकांनी व शहरातील मॉल्स, हॉटेलचालकांनी अंमलबजावणी केली तर मोठ्या प्रमाणात पाणी बचत शक्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मॉल्ससह हॉटेलना सक्ती करावीपालिका मुख्यालयात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. बायोगॅस प्रकल्पही उभारला आहे. मुख्यालयापेक्षा कित्येक पट जास्त पाणी मॉल्स व मोठ्या हॉटेलना लागत आहे. कचराही मोठ्या प्रमाणात निघत असून पालिकेप्रमाणे बायोगॅस प्रकल्प व प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वॉशरूम, गार्डन व इतर गोष्टींसाठी वापर करावा, अन्यथा संबंधितांचा पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे. महापालिका मुख्यालयातील सांडपाण्यावर याच ठिकाणी प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उद्यान, वॉशरूमसाठीही याच पाण्याचा वापर केला जात आहे. याशिवाय येथे उभारलेल्या बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणारा गॅस कँटीनला दिला जात आहे. - मोहन डगावकर, शहर अभियंता, महापालिकाभोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून रोज १० एमएलडी पाणी सोडून द्यावे लागत होते. आधुनिक तंत्राचा वापर करून या पाण्यावरही प्रक्रिया करून त्याचा वापर सुरू केला आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी ६ कोटी रूपये खर्च आला आहे. परंतु त्यामुळे पालिकेचे रोजचे ८० हजार रूपये वाचू लागले आहेत. रोज ५० हजार नागरिकांना पुरेल एवढे पाणी उपलब्ध झाले आहे. - जसवंत मिस्त्री, कार्यकारी अभियंता, मोरबे धरण