शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

सूड भावनेतून केली मित्राची हत्या

By admin | Updated: March 25, 2017 01:42 IST

घणसोली येथील मटणविक्रेत्याच्या हत्येप्रकरणी रबाळे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. केवळ हत्येच्या उद्देशाने तो मूळ गावावरून परत मुंबईला आला होता.

नवी मुंबई : घणसोली येथील मटणविक्रेत्याच्या हत्येप्रकरणी रबाळे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. केवळ हत्येच्या उद्देशाने तो मूळ गावावरून परत मुंबईला आला होता. काम करत असलेल्या मटणविक्रीच्या दुकानात मित्राने गल्ल्यापासून लांब केल्याच्या रागातून त्याने त्याची हत्या करून पळ काढला होता. ३ मार्च रोजी घणसोली येथे रईस रसूल बक्श (२५) याची अज्ञात कारणावरून हत्या झाली होती. तो मटणविक्रेते भगवान जाधव यांच्याकडे कामाला होता. रईस हा राहत्या घरात झोपला असता, साथीदाराने त्याची गळा चिरून हत्या करून पळ काढला होता. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक निरीक्षक संतोष कोतवाल यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. रबाळे पोलिसांच्या पथकाने २० दिवसांत गुन्हा उघड करून एकाला अटक केली आहे.मोहम्मद इरफान मोहम्मद जालीम कुरेशी (२५) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा उत्तरप्रदेशचा राहणारा आहे. मयत रईस व मोहम्मद दोघेही एकाच गावचे असल्याने त्यांची पूर्वीची ओळख होती. मोहम्मद हा नोकरीच्या शोधात असताना रईसनेच त्याला स्वत: काम करत असलेल्या ठिकाणी भगवान जाधव यांच्या दुकानावर नोकरी मिळवून दिली होती. घटनेच्या काही दिवसअगोदर ग्राहकाकडून आलेले शंभर रुपये ठेवण्यासाठी मोहम्मद गल्ल्याजवळ गेला होता. या वेळी रईस याने त्याला हटकून गल्ल्याजवळ न जाण्यास बजावले. त्यानंतर काही दिवसांतच दुकानमालक जाधव यांनी मोहम्मदला नोकरीवरून काढल्यानंतर तो मूळ गावी निघून गेला. परंतु गावी गेल्यानंतरही रईसचा बदला घेण्याची सूडभावना निर्माण झाली होती. त्याकरिता मुंबईला परत येऊन होळी करून परत जाणार असल्याचे रईसला सांगून त्याच्याकडेच राहिला. अवघ्या दोनच दिवसांत संधी साधून रात्रीच्या वेळी झोपलेले असताना त्याने रईसची गळा चिरून हत्या केली होती. अखेर तो वाराणसी येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच सहायक निरीक्षक कोतवाल यांच्या पथकाने त्याला अटक केली. (प्रतिनिधी)