शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

सूड भावनेतून केली मित्राची हत्या

By admin | Updated: March 25, 2017 01:42 IST

घणसोली येथील मटणविक्रेत्याच्या हत्येप्रकरणी रबाळे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. केवळ हत्येच्या उद्देशाने तो मूळ गावावरून परत मुंबईला आला होता.

नवी मुंबई : घणसोली येथील मटणविक्रेत्याच्या हत्येप्रकरणी रबाळे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. केवळ हत्येच्या उद्देशाने तो मूळ गावावरून परत मुंबईला आला होता. काम करत असलेल्या मटणविक्रीच्या दुकानात मित्राने गल्ल्यापासून लांब केल्याच्या रागातून त्याने त्याची हत्या करून पळ काढला होता. ३ मार्च रोजी घणसोली येथे रईस रसूल बक्श (२५) याची अज्ञात कारणावरून हत्या झाली होती. तो मटणविक्रेते भगवान जाधव यांच्याकडे कामाला होता. रईस हा राहत्या घरात झोपला असता, साथीदाराने त्याची गळा चिरून हत्या करून पळ काढला होता. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक निरीक्षक संतोष कोतवाल यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. रबाळे पोलिसांच्या पथकाने २० दिवसांत गुन्हा उघड करून एकाला अटक केली आहे.मोहम्मद इरफान मोहम्मद जालीम कुरेशी (२५) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा उत्तरप्रदेशचा राहणारा आहे. मयत रईस व मोहम्मद दोघेही एकाच गावचे असल्याने त्यांची पूर्वीची ओळख होती. मोहम्मद हा नोकरीच्या शोधात असताना रईसनेच त्याला स्वत: काम करत असलेल्या ठिकाणी भगवान जाधव यांच्या दुकानावर नोकरी मिळवून दिली होती. घटनेच्या काही दिवसअगोदर ग्राहकाकडून आलेले शंभर रुपये ठेवण्यासाठी मोहम्मद गल्ल्याजवळ गेला होता. या वेळी रईस याने त्याला हटकून गल्ल्याजवळ न जाण्यास बजावले. त्यानंतर काही दिवसांतच दुकानमालक जाधव यांनी मोहम्मदला नोकरीवरून काढल्यानंतर तो मूळ गावी निघून गेला. परंतु गावी गेल्यानंतरही रईसचा बदला घेण्याची सूडभावना निर्माण झाली होती. त्याकरिता मुंबईला परत येऊन होळी करून परत जाणार असल्याचे रईसला सांगून त्याच्याकडेच राहिला. अवघ्या दोनच दिवसांत संधी साधून रात्रीच्या वेळी झोपलेले असताना त्याने रईसची गळा चिरून हत्या केली होती. अखेर तो वाराणसी येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच सहायक निरीक्षक कोतवाल यांच्या पथकाने त्याला अटक केली. (प्रतिनिधी)