शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

उमेदवारीवर पुरुषांची मक्तेदारी

By admin | Updated: October 1, 2014 23:12 IST

रायगड जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकही सक्षम महिला उमेदवार सापडलेला नाही.

आविष्कार देसाई ल्ल अलिबाग
राजकारणात महिलांना 33 टक्के आरक्षण दिले असले, तरी रायगड जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकही सक्षम महिला उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळे राजकीय पक्ष महिला आरक्षणाच्या निव्वळ गप्पाच मारतात हे त्यानिमित्ताने अधोरेखित होते.
रायगड जिल्हय़ात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिवसेना, भाजपा असे प्रमुख राजकीय पक्ष आहेत. या पक्षांनी आपापल्या संघटनात  वाढ करताना पुरुषांना सुरुवातीला स्थान दिले होते. त्यानंतर अलिकडच्या काळामध्ये महिलांचेही संघटन वाढविण्यावर विशेष भर देण्यात आल्याचे  दिसून येते. महिलांची ताकद ओळखून प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांच्या विविध संघटना उभ्या केल्या आहेत. या संघटनांचा वापर व्होट बँकेसारखा केला जात आहे.  महिलांनी पुढे येण्यासाठी राजकीय पक्षांनी विविध उपाय योजना आखतानाच वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. 
सर्वच क्षेत्रमध्ये महिला आता पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. राजकारणातही महिलांनी पुढे यावे यासाठी महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदार संघातील  प्रमुख राजकीय पक्षांना सक्षम महिला उदेवार सापडला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या राजकीय पक्षांच्या भूमिकेवर महिलांनीच संशय निर्माण केल्यास काहीच वावगे ठरणारे नाही.
 
राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाच महिलांना पुढे आणण्याची आहे. आताच्या होणा:या निवडणुका या महत्त्वपूर्ण असून अटीतटीच्या आहेत. राजकारणात पक्षहितासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. स्ट्राँग आणि सिनियर उमेदवारांची गरज आहे. येत्या काळात महिलांना निश्चितच संधी मिळेल याबाबत आशावादी आहोत.
-आदिती तटकरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, कोकण संघटक
 
महिला उमेदवारीचा राजकीय इतिहास 
मनोरमा भिडे( काँग्रेस,अलिबाग -1957), शांता कांडकर ( संयुक्त महाराष्ट्र समिती,माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन-1962), मीनाक्षी पाटील (शेकाप, अलिबाग-1995 ते 2क्क्9) रेहाना उंडीरे ( शेकाप,श्रीवर्धन- 1995), मनीषा पळसकर ( राष्ट्रीय समाज,2क्क्4-पनवेल), उषाताई कांबळे (भारीप बहुजन महासंघ-2क्क्9-उरण)
 
राजकारणात महिला पुढे येत आहेत. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी याची चुणूक दाखविली आहे. त्यामुळे महिलांना एक संधी दिली पाहिजे होती. परंतु पक्षहितासाठी असे निर्णय घ्यावे लागतात.
- वासंती उमरोटकर, काँग्रेस, महिला जिल्हाध्यक्ष