शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

ढगाळ वातावरणामुळे आंबा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 02:08 IST

कोकणातील शेतकऱ्यांचे भातपीक, कडधान्य तसेच आंबा पीक एकमेव व्यवसाय आहे. मात्र ही तीनही पिके निसर्गावरच अवलंबून आहेत. अवेळी पाऊस लागणे

दासगाव : कोकणातील शेतकऱ्यांचे भातपीक, कडधान्य तसेच आंबा पीक एकमेव व्यवसाय आहे. मात्र ही तीनही पिके निसर्गावरच अवलंबून आहेत. अवेळी पाऊस लागणे, कमी प्रमाणात लागणे तसेच हवामानामध्ये वेळोवेळी बदल होत कोरडे ढगाळ वातावरण तयार होणे या कारणामुळे ही सर्व पिके धोक्यात येतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लागली होती. परंतु या पावसाचा कडधान्य पिकावर काही परिणाम झाला नसून उलट चांगले पीक मिळाले. नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणे मे महिन्यात मिळणारे आंबा पीक सध्या दोन दिवस पडलेल्या ढगाळ कोरड्या वातावरणामुळे धोक्यात आले आहे. कोकणात आंबा पीक घेणारे जवळपास ४० टक्के शेतकरी आहेत. यांचा व्यवसाय एकच आंबा पीक. वर्षभर झाडांची मशागत करायची व मे महिन्यात येणारा आंबा चांगल्या पध्दतीने काढून बाजारात विक्री करून पैसा मिळून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र फेब्रुवारीमध्ये महाड तालुक्यात अवेळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी आंबा मोहोर येण्यास सुरुवात असल्याने यावर काही परिणाम झाला नव्हता. सध्याच्या परिस्थितीत मे महिन्यात विक्रीसाठी मिळणारा आंबा आता जवळपास तीस ते चाळीस टक्के तयार होणार असताना अचानक ढगाळ व कोरडे वातावरण झाल्यामुळे या तयार झालेल्या आंब्याला गळती लागली असल्यामुळे मिळणारे पीक कमी प्रमाणात मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजारात अवेळी आंबा दिसत असला तरी तो औषधांची फवारणी करून पिकवण्यात येतो. मात्र मे, जून महिन्यातील येणारा आंबा या नैसर्गिकरीत्या पिकलेला असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकावर कीड पडण्याची शक्यता बागायतदारांकडून वर्तवण्यात येत आहे. अचानक झालेल्या हवामानाच्या बदलामुळे गेले दोन दिवसांत महाड तालुक्यातील बहुतेक ठिकाणी आंब्याला गळती सुरू झाली आहे. या पिकावर अवलंबून असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. काही शेतकरी या पिकांसाठी व वर्षभराच्या मशागतीसाठी कर्ज घेऊन ही कामे करतात. मात्र या ढगाळ कोरड्या वातावरणामुळे आंबा पीक धोक्यात आले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या समोर आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न पडला आहे, तरी आंबा पिकाच्या होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून करण्यात यावे व याची भरपाई मिळावी, अशी मागणी गरीब शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)