शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

ढगाळ वातावरणामुळे आंबा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 02:08 IST

कोकणातील शेतकऱ्यांचे भातपीक, कडधान्य तसेच आंबा पीक एकमेव व्यवसाय आहे. मात्र ही तीनही पिके निसर्गावरच अवलंबून आहेत. अवेळी पाऊस लागणे

दासगाव : कोकणातील शेतकऱ्यांचे भातपीक, कडधान्य तसेच आंबा पीक एकमेव व्यवसाय आहे. मात्र ही तीनही पिके निसर्गावरच अवलंबून आहेत. अवेळी पाऊस लागणे, कमी प्रमाणात लागणे तसेच हवामानामध्ये वेळोवेळी बदल होत कोरडे ढगाळ वातावरण तयार होणे या कारणामुळे ही सर्व पिके धोक्यात येतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लागली होती. परंतु या पावसाचा कडधान्य पिकावर काही परिणाम झाला नसून उलट चांगले पीक मिळाले. नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणे मे महिन्यात मिळणारे आंबा पीक सध्या दोन दिवस पडलेल्या ढगाळ कोरड्या वातावरणामुळे धोक्यात आले आहे. कोकणात आंबा पीक घेणारे जवळपास ४० टक्के शेतकरी आहेत. यांचा व्यवसाय एकच आंबा पीक. वर्षभर झाडांची मशागत करायची व मे महिन्यात येणारा आंबा चांगल्या पध्दतीने काढून बाजारात विक्री करून पैसा मिळून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र फेब्रुवारीमध्ये महाड तालुक्यात अवेळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी आंबा मोहोर येण्यास सुरुवात असल्याने यावर काही परिणाम झाला नव्हता. सध्याच्या परिस्थितीत मे महिन्यात विक्रीसाठी मिळणारा आंबा आता जवळपास तीस ते चाळीस टक्के तयार होणार असताना अचानक ढगाळ व कोरडे वातावरण झाल्यामुळे या तयार झालेल्या आंब्याला गळती लागली असल्यामुळे मिळणारे पीक कमी प्रमाणात मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजारात अवेळी आंबा दिसत असला तरी तो औषधांची फवारणी करून पिकवण्यात येतो. मात्र मे, जून महिन्यातील येणारा आंबा या नैसर्गिकरीत्या पिकलेला असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकावर कीड पडण्याची शक्यता बागायतदारांकडून वर्तवण्यात येत आहे. अचानक झालेल्या हवामानाच्या बदलामुळे गेले दोन दिवसांत महाड तालुक्यातील बहुतेक ठिकाणी आंब्याला गळती सुरू झाली आहे. या पिकावर अवलंबून असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. काही शेतकरी या पिकांसाठी व वर्षभराच्या मशागतीसाठी कर्ज घेऊन ही कामे करतात. मात्र या ढगाळ कोरड्या वातावरणामुळे आंबा पीक धोक्यात आले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या समोर आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न पडला आहे, तरी आंबा पिकाच्या होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून करण्यात यावे व याची भरपाई मिळावी, अशी मागणी गरीब शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)