शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अग्निशमनविषयी उदासीनता कायम

By admin | Updated: March 27, 2016 02:40 IST

पनवेल नगरपालिकेने १८८४मध्येच अग्निशमन यंत्रणा सुरू केली. कर्जतपर्यंतच्या आगी विझवण्याचे काम या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केले. पण सध्या तळोजा एमआयडीसी

- नामदेव मोरे,  नवी मुंबई पनवेल नगरपालिकेने १८८४मध्येच अग्निशमन यंत्रणा सुरू केली. कर्जतपर्यंतच्या आगी विझवण्याचे काम या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केले. पण सध्या तळोजा एमआयडीसी, सिडको नोडसह पालिका क्षेत्रातील अग्निशमन यंत्रणा कोलमडली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कारखान्यांतील कामगारांसह नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील डांबर प्लांटमध्ये नुकतीच आग लागली. यात चार कामगारांचा मृत्यू झाला. या कंपनीत आग विझवणारी यंत्रणा बंद असल्याचे नंतर निदर्शनास आले आहे. परंतु एमआयडीसीतील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याची ही एकच कंपनी आहे. अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र असलेल्या कंपन्यांमध्येही ती यंत्रणा बंद आहे. ८६३ हेक्टर जमिनीवर औद्योगिक वसाहत आहे. ९७० कारखाने व इतर उद्योग सुरू असून, ७६ हजार नागरिकांना प्रत्यक्ष व ५० हजार नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे. वर्षाला ६० हजार कोटींची उलाढाल येथेन होते. परंतु एवढ्या मोठ्या वसाहतीच्या सुरक्षेसाठी अग्निशमन केंद्रामध्ये फक्त दोन फायर इंजिन सुरू आहेत. उर्वरित सर्व बंद झाली आहेत. परिसराची व्याप्ती पाहून ३४ कर्मचारी असणे आवश्यक आहे. परंतु सद्य:स्थितीमध्ये फक्त १७ कर्मचारीच आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने येथील कर्मचाऱ्यांना २४ तास केंद्रामध्येच राहावे लागते. १२ तासांची ड्युटी संपली तरी केंद्राच्या बाहेर जाता येत नाही. अनेकवेळा साप्ताहिक सुटीही मिळत नाही. अग्निशमन केंद्र म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी कोंडवाडा झाला आहे. एमआयडीसीप्रमाणेच नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्राची स्थिती आहे. झोपडीमध्ये एक टेबल व तीन खुर्च्या टाकून मुख्य कार्यालय सुरू केले आहे. १३० वर्षांपूर्वी स्वत:च सक्षमपणे आग विझविणारी यंत्रणा असणाऱ्या नगरपालिकेकडे आता फक्त एकच वाहन आहे. दुसरे फायर इंजिन बंदच आहे. सफाई कामगारांवर आग विझवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. वास्तविक शहरात आग लागली तर विझविण्याची क्षमताच पालिकेच्या केंद्रामध्ये नाही. यामुळे साप पकडणे, पक्षी व प्राणी अडकले असतील तर त्यांची सुटका करणे ही कामे करावी लागत आहेत. सिडकोने खारघर, कळंबोली व नवीन पनवेलमध्ये अग्निशमन केंदे्र सुरू केली आहेत. मनुष्यबळही भरपूर आहे; परंतु सहा माळ्यांपेक्षा उंच इमारतीत आग लागल्यास ती विझवण्यासाठी यंत्रणाच नाही. सिडको क्षेत्रामध्ये २० ते २४ मजली इमारती बांधण्यास परवानगी दिली जाते. परंतु अग्निशमन यंत्रणा सक्षम नाही. यामुळे औद्योगिक वसाहतीतील कामगारांसह सिडको नोड व पालिका क्षेत्रातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणाऱ्य पनवेलमध्येही उंच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. मात्र तेथे बसविण्यात येणाऱ्या अग्निरोधक यंत्रणांचे आॅडिट होत नसल्याचे उघड झाले आहे. अजून किती बळी हवेतकळंबोलीमध्ये वखार महामंडळाच्या गोडाऊनला आग लागल्याने अग्निशमन जवानाचा मृत्यू झाला होता. पनवेलमध्ये स्कूलबसला आग लागल्याने जवळपास २५ विद्यार्थी जखमी झाले होते. यामधील अनेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गत आठवड्यात तळोजामधील डांबर कंपनीत आग लागून चार जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत असून अजून किती बळी घेणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. शहरात सर्वत्र फायर हैड्रटनगरपालिकेने शहरात ३० ठिकाणी फायर हैड्रट बसविले होते. शिवाजी रोडवर ६, पोस्टाजवळ, धूतपापेश्वर कारखाना, कोळीवाडा, मार्केट, पांजरापोळ, उलवारोड, मिरची गल्ली, जोशी गल्ली व पालिकेच्या कार्यालयाजवळ प्रत्येकी १, महात्मा गांधी रोडवर ८, पाटील मोहल्लामध्ये २, टिळक रोडवर ५ ठिकाणी फायर हैड्रट बसविले होते. १३० वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एवढी तत्परता दाखविली होती. सद्य:स्थितीमध्ये मात्र प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशी होती पालिकेची यंत्रणा पनवेल ही राज्यातील पहिली नगरपालिका आहे, त्याचबरोबर सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारणारीही पहिली पालिका आहे. १८८४ मध्ये प्रथम आग विझविणारा बंब खरेदी करण्यात आला. या बंबाच्या साहाय्याने शहरातील मेघजी मनजी यांच्या घराला लागलेली आग व तक्का, पुराणिक बंगला, परस्पा मिल येथे लागलेल्या आगी विझविल्या होत्या. १९४६ मध्ये मिलट्रीमधील फायर इंजिन १,५०० रुपयांना विकत घेतले. कर्जतमध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये सायंकाळी आग लागली. ठाणे, कल्याण, लोणावळा, ठाणे, मुंबईमध्ये तार पाठवून फायर इंजिन मागविले. परंतु सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले ते पनवेल पालिकेचे फायर इंजिन त्यावेळच्या डीएसपींनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले होते.