शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमनविषयी उदासीनता कायम

By admin | Updated: March 27, 2016 02:40 IST

पनवेल नगरपालिकेने १८८४मध्येच अग्निशमन यंत्रणा सुरू केली. कर्जतपर्यंतच्या आगी विझवण्याचे काम या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केले. पण सध्या तळोजा एमआयडीसी

- नामदेव मोरे,  नवी मुंबई पनवेल नगरपालिकेने १८८४मध्येच अग्निशमन यंत्रणा सुरू केली. कर्जतपर्यंतच्या आगी विझवण्याचे काम या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केले. पण सध्या तळोजा एमआयडीसी, सिडको नोडसह पालिका क्षेत्रातील अग्निशमन यंत्रणा कोलमडली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कारखान्यांतील कामगारांसह नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील डांबर प्लांटमध्ये नुकतीच आग लागली. यात चार कामगारांचा मृत्यू झाला. या कंपनीत आग विझवणारी यंत्रणा बंद असल्याचे नंतर निदर्शनास आले आहे. परंतु एमआयडीसीतील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याची ही एकच कंपनी आहे. अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र असलेल्या कंपन्यांमध्येही ती यंत्रणा बंद आहे. ८६३ हेक्टर जमिनीवर औद्योगिक वसाहत आहे. ९७० कारखाने व इतर उद्योग सुरू असून, ७६ हजार नागरिकांना प्रत्यक्ष व ५० हजार नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे. वर्षाला ६० हजार कोटींची उलाढाल येथेन होते. परंतु एवढ्या मोठ्या वसाहतीच्या सुरक्षेसाठी अग्निशमन केंद्रामध्ये फक्त दोन फायर इंजिन सुरू आहेत. उर्वरित सर्व बंद झाली आहेत. परिसराची व्याप्ती पाहून ३४ कर्मचारी असणे आवश्यक आहे. परंतु सद्य:स्थितीमध्ये फक्त १७ कर्मचारीच आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने येथील कर्मचाऱ्यांना २४ तास केंद्रामध्येच राहावे लागते. १२ तासांची ड्युटी संपली तरी केंद्राच्या बाहेर जाता येत नाही. अनेकवेळा साप्ताहिक सुटीही मिळत नाही. अग्निशमन केंद्र म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी कोंडवाडा झाला आहे. एमआयडीसीप्रमाणेच नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्राची स्थिती आहे. झोपडीमध्ये एक टेबल व तीन खुर्च्या टाकून मुख्य कार्यालय सुरू केले आहे. १३० वर्षांपूर्वी स्वत:च सक्षमपणे आग विझविणारी यंत्रणा असणाऱ्या नगरपालिकेकडे आता फक्त एकच वाहन आहे. दुसरे फायर इंजिन बंदच आहे. सफाई कामगारांवर आग विझवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. वास्तविक शहरात आग लागली तर विझविण्याची क्षमताच पालिकेच्या केंद्रामध्ये नाही. यामुळे साप पकडणे, पक्षी व प्राणी अडकले असतील तर त्यांची सुटका करणे ही कामे करावी लागत आहेत. सिडकोने खारघर, कळंबोली व नवीन पनवेलमध्ये अग्निशमन केंदे्र सुरू केली आहेत. मनुष्यबळही भरपूर आहे; परंतु सहा माळ्यांपेक्षा उंच इमारतीत आग लागल्यास ती विझवण्यासाठी यंत्रणाच नाही. सिडको क्षेत्रामध्ये २० ते २४ मजली इमारती बांधण्यास परवानगी दिली जाते. परंतु अग्निशमन यंत्रणा सक्षम नाही. यामुळे औद्योगिक वसाहतीतील कामगारांसह सिडको नोड व पालिका क्षेत्रातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणाऱ्य पनवेलमध्येही उंच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. मात्र तेथे बसविण्यात येणाऱ्या अग्निरोधक यंत्रणांचे आॅडिट होत नसल्याचे उघड झाले आहे. अजून किती बळी हवेतकळंबोलीमध्ये वखार महामंडळाच्या गोडाऊनला आग लागल्याने अग्निशमन जवानाचा मृत्यू झाला होता. पनवेलमध्ये स्कूलबसला आग लागल्याने जवळपास २५ विद्यार्थी जखमी झाले होते. यामधील अनेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गत आठवड्यात तळोजामधील डांबर कंपनीत आग लागून चार जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत असून अजून किती बळी घेणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. शहरात सर्वत्र फायर हैड्रटनगरपालिकेने शहरात ३० ठिकाणी फायर हैड्रट बसविले होते. शिवाजी रोडवर ६, पोस्टाजवळ, धूतपापेश्वर कारखाना, कोळीवाडा, मार्केट, पांजरापोळ, उलवारोड, मिरची गल्ली, जोशी गल्ली व पालिकेच्या कार्यालयाजवळ प्रत्येकी १, महात्मा गांधी रोडवर ८, पाटील मोहल्लामध्ये २, टिळक रोडवर ५ ठिकाणी फायर हैड्रट बसविले होते. १३० वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एवढी तत्परता दाखविली होती. सद्य:स्थितीमध्ये मात्र प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशी होती पालिकेची यंत्रणा पनवेल ही राज्यातील पहिली नगरपालिका आहे, त्याचबरोबर सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारणारीही पहिली पालिका आहे. १८८४ मध्ये प्रथम आग विझविणारा बंब खरेदी करण्यात आला. या बंबाच्या साहाय्याने शहरातील मेघजी मनजी यांच्या घराला लागलेली आग व तक्का, पुराणिक बंगला, परस्पा मिल येथे लागलेल्या आगी विझविल्या होत्या. १९४६ मध्ये मिलट्रीमधील फायर इंजिन १,५०० रुपयांना विकत घेतले. कर्जतमध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये सायंकाळी आग लागली. ठाणे, कल्याण, लोणावळा, ठाणे, मुंबईमध्ये तार पाठवून फायर इंजिन मागविले. परंतु सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले ते पनवेल पालिकेचे फायर इंजिन त्यावेळच्या डीएसपींनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले होते.