शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ग्रामस्थांचा स्थलांतराला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:16 IST

विमानतळबाधितांचा सिडकोसमोर पेच : १५ डिसेंबरची अंतिम मुदतही संपली

नवी मुंबई : विमानतळबाधित दहा गांवातील जवळपास ९० टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. मात्र, उर्वरित दहा टक्के ग्रामस्थ अद्यापि प्रलंबित मागण्यांवर अडून आहेत. त्यामुळे त्यांनी स्थलांतराला विरोध दर्शविला आहे. या ग्रामस्थांना सिडकोने १५ डिसेंबरची अंतिम मुदत दिली होती. मात्र, ही मुदत उलटून गेली तरी ग्रामस्थ स्थलांतर न करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सिडकोसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळप्रकल्पासाठी स्थलांतरित होणाऱ्या दहापैकी सहा गावांनी १०० टक्के स्थलांतर केले आहे. उर्वरित गणेशपुरी, उलवे व कोंबडभुजे या गावांतील काही ग्रामस्थ अद्यापि आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेल तालुक्यातील दहा गावांतील ११६० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या संपादित जमिनीच्या बदल्यात येथील ग्रामस्थांना भरीव पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. या ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी पुष्पकनगर या नव्या नोडची उभारणी करण्यात येत आहे. या नोडमध्ये अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सिडकोच्या आवाहनाला प्रतिसाद देत दहा गावांतील जवळपास ९० टक्के ग्रामस्थ आपली बांधकामे पाडून स्थलांतरित झाले आहेत. दहापैकी सहा गावांनी १०० टक्के स्थलांतर केले आहे. उर्वरित गणेशपुरी, उलवे व कोंबडभुजे या गावांतील काही ग्रामस्थ अद्यापि आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे विमानतळ प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे.

यापूर्वी स्थलांतर करण्यासाठी सिडकोच्या वतीने अनेकदा मुदत देण्यात आली होती. मुदतीत स्थलांतर करणाºया ग्रामस्थांना पुनर्वसन पॅकेजमधील तरतुदीनुसार १८ महिन्यांचे घरभाडे, १००० रुपये प्रति चौरस फूट बांधकाम खर्च त्याशिवाय प्रति चौरस फूट ५०० रुपयांचा अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता देण्यात आला. मात्र, स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना पुनर्वसनाच्या लाभापासून वंचित राहवे लागले होते. यासंदर्भात प्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात अलीकडेच झालेल्या चर्चेनंतर या ग्रामस्थांना पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थलांतरासाठी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत स्थलांतर करणाºया ग्रामस्थांना पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आर्थिक लाभांसह पुनर्वसन पॅकेजचे सर्व लाभ मिळतील, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे; परंतु स्थलांतराला या वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. या मुदतीत स्थलांतर केलेल्या ग्रामस्थांची संख्या अत्यल्प असल्याने हा पेच कसा सोडवायचा, असा प्रश्न आता सिडकोला भेडसावत आहे.