शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचा स्थलांतराला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:16 IST

विमानतळबाधितांचा सिडकोसमोर पेच : १५ डिसेंबरची अंतिम मुदतही संपली

नवी मुंबई : विमानतळबाधित दहा गांवातील जवळपास ९० टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. मात्र, उर्वरित दहा टक्के ग्रामस्थ अद्यापि प्रलंबित मागण्यांवर अडून आहेत. त्यामुळे त्यांनी स्थलांतराला विरोध दर्शविला आहे. या ग्रामस्थांना सिडकोने १५ डिसेंबरची अंतिम मुदत दिली होती. मात्र, ही मुदत उलटून गेली तरी ग्रामस्थ स्थलांतर न करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सिडकोसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळप्रकल्पासाठी स्थलांतरित होणाऱ्या दहापैकी सहा गावांनी १०० टक्के स्थलांतर केले आहे. उर्वरित गणेशपुरी, उलवे व कोंबडभुजे या गावांतील काही ग्रामस्थ अद्यापि आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेल तालुक्यातील दहा गावांतील ११६० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या संपादित जमिनीच्या बदल्यात येथील ग्रामस्थांना भरीव पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. या ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी पुष्पकनगर या नव्या नोडची उभारणी करण्यात येत आहे. या नोडमध्ये अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सिडकोच्या आवाहनाला प्रतिसाद देत दहा गावांतील जवळपास ९० टक्के ग्रामस्थ आपली बांधकामे पाडून स्थलांतरित झाले आहेत. दहापैकी सहा गावांनी १०० टक्के स्थलांतर केले आहे. उर्वरित गणेशपुरी, उलवे व कोंबडभुजे या गावांतील काही ग्रामस्थ अद्यापि आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे विमानतळ प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे.

यापूर्वी स्थलांतर करण्यासाठी सिडकोच्या वतीने अनेकदा मुदत देण्यात आली होती. मुदतीत स्थलांतर करणाºया ग्रामस्थांना पुनर्वसन पॅकेजमधील तरतुदीनुसार १८ महिन्यांचे घरभाडे, १००० रुपये प्रति चौरस फूट बांधकाम खर्च त्याशिवाय प्रति चौरस फूट ५०० रुपयांचा अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता देण्यात आला. मात्र, स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना पुनर्वसनाच्या लाभापासून वंचित राहवे लागले होते. यासंदर्भात प्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात अलीकडेच झालेल्या चर्चेनंतर या ग्रामस्थांना पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थलांतरासाठी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत स्थलांतर करणाºया ग्रामस्थांना पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आर्थिक लाभांसह पुनर्वसन पॅकेजचे सर्व लाभ मिळतील, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे; परंतु स्थलांतराला या वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. या मुदतीत स्थलांतर केलेल्या ग्रामस्थांची संख्या अत्यल्प असल्याने हा पेच कसा सोडवायचा, असा प्रश्न आता सिडकोला भेडसावत आहे.