शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

सायबर सिटी प्रदूषणाच्या विळख्यात, वायुप्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:21 IST

माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई या सायबर सिटीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे.

नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई या सायबर सिटीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. हवेतील धुलीकणांत वाढ झाली असून वायुप्रदूषणानेसुद्धा धोक्याची पातळी ओलांडल्याचे दिसून आले आहे. हवेतील धुलीकणांत वाढ झाल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याचे मोठे आव्हान शहरवासीयांसमोर उभे ठाकले आहे.केंद्र शासनाशी संलग्न असलेल्या सफर इंडिया एअर क्लॉलिटी सर्व्हिस या संस्थेने गेल्या महिन्यात केलेल्या सर्वेक्षणातून नवी मुंबईतील वायुप्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचे नमूद केले आहे. सायन-पनवेल व ठाणे-बेलापूर मार्गावरील वाढलेली वाहतूक, टीटीसी औद्योगिक वसाहत व तळोजा एमआयडीसीतील कारखानदारांकडून केला जाणारा हलगर्जीपणा तसेच जेएनपीटीकडे जाणाºया अवजड वाहनांची धडधड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व मेट्रो प्रकल्पासाठी सुरू असलेले खोदकाम आदी कारणांमुळे शहरातील वायू व ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याचे समोर आले आहे.नवी मुंबईतील प्रदूषणाची पातळी वाढल्याचे हरित लवादाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. असे असतानाही या वर्षीच्या पर्यावरण अहवालात नवी मुंबई महापालिकेने मात्र प्रदूषणाची पातळी खालावल्याचे नमूद केले आहे. तसेच आरोग्य निर्देशांकातही सुधारणा दिसत असल्याचे म्हटले आहे. मात्र रहिवासी क्षेत्रात ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, वातावरणातील बदलाचासुद्धा प्रदूषणावर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. सकाळी थंड आणि दुपारी उष्णता यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी आदी आजार बळावल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.>वाहनांच्या वाढत्या संख्येचा फटकामागील दोन दशकांत नवी मुंबई शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. त्यामुळे येथील उद्योगधंदे वाढीस लागले आहेत. आयटी उद्योगाचे जाळे पसरल्याने रोजगार वाढले आहेत. शहरवासीयांचे दरडोई उत्पन्नसुद्धा वाढल्याने येथील रहिवाशांचे जीवनमानसुद्धा उंचावले आहे. त्यामुळे इतर सुविधांसह वाहन ही चैनीची बाब बनली आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरात वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये कृषी मालाच्या दिवसाला शेकडो गाड्या येतात. जेएनपीटी येथे जाणाºया कंटेनरचा मार्ग नवी मुंबईतूनच जातो. सायन-पनवेल महामार्गावर दिवसाला लाखो वाहने ये-जा करतात. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून प्रक्रिया न करता खाडीत सोडले जाणारे सांडपाणी आदी प्रकारामुळे शहराच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष पर्यावरणप्रेमींकडून काढला जात आहे.>ध्वनिप्रदूषणाचीही धोकादायक पातळीशांतता क्षेत्रातील सर्व ठिकाणांची ध्वनिप्रदूषण मर्यादा ५० डेसिबल असताना ती सर्व ठिकाणी ओलांडताना दिसत आहे. घणसोली गाव, ऐरोली सेक्टर १८ व १९ येथे ६१ डेसिबल, नेरूळ सेक्टर ९ येथे ६०, वाशी विभागात ५९ डेसिबल ध्वनिप्रदूषण नोंदविण्यात आले आहे. मागील वर्षी ध्वनिप्रदूषण पातळी ही ६५ ते ६९ डेसिबलइतकी होती.वाहतुकीच्या ठिकाणांवर सरासरी ध्वनिप्रदूषण पातळी ही ६१ ते ६७ डेसिबल एवढी नोंदवण्यात आली आहे. यात महापे पुलावर सर्वाधिक ध्वनिप्रदूषण ६७ डेसिबल, बेलापूर, दिघा, वाशी, जुहूगाव या ठिकाणी ६५ डेसिबल इतकी नोंद झालेली आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठ नेरूळ सेक्टर ७ येथे ६१ डेसिबलएवढे ध्वनिप्रदूषण नोंदविले आहे.>पनवेल परिसर प्रदूषणाच्या विळख्यातपनवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची समस्या डोकेदुखी ठरत आहे. तळोजा एमआयडीसीतील कारखाने हे प्रदूषणकारी असल्याने त्याचा त्रास थेट सिडको वसाहतींना होत आहे. सकाळी, सायंकाळी सोडण्यात येणाºया या विषारी वायूमुळे शहरवासीयांचा जीव गुदमरत आहे.वायुप्रदूषणाबरोबरच जलप्रदूषणाची समस्याही गंभीर असून कासाडी नदीत परिसरातील कारखान्यांमधून सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पात्र दूषित झाले आहे. तळोजातील रासायनिक कारखान्यांतून मोठ्या प्रमाणात विषारी वायू हवेत सोडले जात असल्याने त्याचा त्रास परिसरातील ग्रामस्थांना होतो. नावडे, पेंधर, पडघा, नेवाळी, चिध्रण, घोट, घोटकॅम्प, तळोजा, कळंबोली शहर, नावडे नवीन सिडको वसाहत येथील रहिवाशांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.