शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रानसईमधील आदिवासींना बनविले भूमिहीन

By admin | Updated: October 5, 2016 03:07 IST

रानसईमधील आदिवासींची बहुतांश जमीन धरण बांधण्यासाठी संपादित करण्यात आली. उर्वरित जमीनही सावकाराच्या नावावर असून मूळ निवासींना भूमिहीन बनविण्यात आले आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबई रानसईमधील आदिवासींची बहुतांश जमीन धरण बांधण्यासाठी संपादित करण्यात आली. उर्वरित जमीनही सावकाराच्या नावावर असून मूळ निवासींना भूमिहीन बनविण्यात आले आहे. सहाही पाड्यांसाठी अद्याप गावठाण मंजूर झालेले नसून त्यांचे वास्तव्य असलेल्या गावची जमीनही खाजगी व्यक्तीच्या नावावर आहे. शासनाने २०११ मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये रानसई गावामध्ये १२७६ लोकसंख्या असल्याचे निदर्शनास आले आहे. यामधील १२६७ रहिवासी आदिवासी व उरलेले अनुसूचित जातीमधील आहेत. ९९.२९ टक्के आदिवासी नागरिक असूनही येथील जमिनीवर मात्र त्यांचा अधिकार नाही. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे धरणासाठी जमीन संपादित केल्यानंतर १० ते १२ जणांनाच जमिनीचा अत्यंत तुटपुंजा मोबदला मिळाला. उर्वरित आदिवासींना मोबदला मिळाला नाही. सद्यस्थितीमध्ये गावच्या परिसरात जवळपास १६३१ हेक्टर जमीन शिल्लक आहे. बहुतांश जमीन एमआयडीसी, वनविभागाच्या व सावकाराच्या नावावर आहे. ज्याचा गावाशी काहीही संबंध नाही त्यांच्या नावावर एक हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन कशी असा प्रश्न आदिवासी बांधव उपस्थित करत आहेत. सहा पाड्यांमध्ये रानसई गाव वसले आहे. परंतु गावातील घरे असलेली जमीनही आदिवासींच्या नावावर नाही. गावाला गावठाणच नसल्याने गावठाण विस्तार योजनाही राबविता येत नाही. कोणत्याही सुविधा देता येत नाहीत. शेकडो वर्षांपासून या ठिकाणी आमचे वास्तव्य आहे. या जमिनीवर भाजीपाला पिकवून आम्ही उदरनिर्वाह करत आहोत. परंतु त्या जमिनी मात्र आमच्या नावावर नाहीत. या जमिनीवर आदिवासींचाच हक्क असून त्याचे वाटप आम्हाला करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. परंतु या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही. महसूल विभागाच्या संकेतस्थळावरून रानसई गावाविषयी माहिती घेतली असता एक टक्का जमीनही आदिवासींच्या नावावर नसल्याचे समोर आले आहे. देशातील सर्वात स्वस्त भूसंपादनउरण व परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने रानसई धरण बांधले. धरण बांधण्यासाठी शासनाने अत्यंत अल्प मोबदला देवून जमीन संपादित केली. मुळात सातबारा उताऱ्यावर आदिवासींची नावेच नसल्याने हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या रहिवाशांनाच मोबदला मिळाला. मिळालेला मोबदला अत्यंत तुटपुंजा होता. संपादनाचा इतिहास पाहिल्यास देशातील सर्वात कमी मोबदल्यात संपादन झालेली जमीन रानसईचीच असेल असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. आमची जमीन आम्हाला द्या आमच्या गावात सर्व आदिवासी नागरिक रहात आहेत. कित्येक पिढ्या आम्ही याच जमिनीवर वास्तव्य करत आहोत. आदिवासींना जंगलाचे राजे म्हटले जाते. पण आम्हाला मात्र शासकीय यंत्रणांच्या उदासीनतेने भिकारी बनविले आहे. आमची घरेही आमच्या नावावर नाहीत. शेती करत असलेली जमीनही दुसऱ्यांच्याच नावावर आहे. आमच्या जमिनीचा हक्क आम्हाला मिळवून देण्यासाठी कोण लढा देणार असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करत आहेत.