शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकऱ्यांंचे बँक खातेही नाही

By admin | Updated: May 2, 2016 02:21 IST

मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यामधील तब्बल ११ लाख ८९ हजार कुटुंबीयांकडे बँक खातेही नसल्याचे निदर्शनास आले आहे. रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना या कष्टकऱ्यांना

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यामधील तब्बल ११ लाख ८९ हजार कुटुंबीयांकडे बँक खातेही नसल्याचे निदर्शनास आले आहे. रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना या कष्टकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बँक खातेही नसल्याने बचतीचाही प्रश्न येत नसून, महानगरांमध्ये राहूनही सर्वांचे भवितव्य अंधारमय बनले आहे.मुंबई, ठाणे व नवी मुंबई हा परिसर देशातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून ओळखला जात आहे. परंतु याच महानगरांमध्ये लाखो कामगारांचे अद्याप बँकेमध्ये खातेही नाही. नाका कामगार, दगडखाण मजूर, बांधकाम क्षेत्र व इतर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार दिवसभर कष्ट करुन मिळतील त्या पैशामध्ये संसाराचा गाडा चालवत आहेत. झोपडपट्टी परिसरामध्येच बहुतांश रोजंदारी कामगारांचे वास्तव्य असल्याचेही स्पष्ट झाले आहे. शहरांमधील गगनचुंबी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राबणाऱ्या कामगारांना बिल्डरने बांधून दिलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. दगडखाणींमध्येही तात्पुरत्या स्वरुपात काम करणारे कामगार त्याच धुळीत कुटुंबासहित वास्तव्य करतात. बँकेमध्ये खाते असेल व त्याचा नियमित वापर केल्यास आर्थिक शिस्त येण्यास मदत होते. बचतीची सवय असते परंतु हजारो कामगारांमध्ये याविषयी जागृती करण्यात शासकीय यंत्रणा व सामाजिक कार्यक्रर्त्यांनाही अपयश आले आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये चार वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले असताना २६ लाख ६५ हजार ४८१ कुटुंबीयांपैकी २३ लाख ५ हजार १३० नागरिकांचे बँकेत खाते असल्याचे निदर्शनास आले. १७ टक्के नागरिकांचे बँकेत खाते नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये २५ टक्के व रायगड जिल्ह्यामध्ये ३५ टक्के नागरिकांकडे बँक खाते नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये काही सामाजिक संस्थांनी नाका कामगार, बांधकाम मजूर व दगडखाण कामगारांना बचतीचे महत्त्व समजावून बँकेत खाते उघडून दिले होते.केंद्र शासनाने जनधन योजना व इतर योजनांसाठी बँकेत खाते उघडणे बंधनकारक केले आहे. यामुळे अनेकांनी बँकेत पहिल्यांदाच खाते उघडले आहे. परंतु बचत करण्याचा हेतू नसून शासनाकडून सवलती मिळाव्या एवढाच हेतू आहे. कामगारांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन करण्याची सवय लावणेही महत्त्वाचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. सामाजिक संस्थांचे उल्लेखनीय कार्यनवी मुंबई, मुंबई परिसरातील झोपडपट्टी विभागात अन्नपूर्णा महिला मंडळाने मायक्रो फायनान्स संकल्पना यशस्वीपणे राबविली आहे. त्याच धर्तीवर इतरही सामाजिक संस्था काम करीत आहेत.महिला बचत गटांच्या माध्यमातूनही अनेक महिला कामगार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये आर्थिक नियोजनाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये २६,६५,४८१ कुटुंबियांपैकी २३,०५,१३० नागरिकांचे बँकेत खाते आहे. गावाकडे दुष्काळामुळे पिण्यासाठी पाणी नाही व हाताला कामही मिळेना. यामुळे नवी मुंबईत आलो. नाक्यावर उभे राहून मिळेल ते काम करत असून रोज मिळणाऱ्या पगारातून दोन वेळचे जेवण करत आहे. पैसेच नाहीत तर बँकेत खाते कसे उघडणार? - संपत चव्हाण,नाका कामगारबांधकाम मजूर म्हणून पतीसोबत काम करते. रोजच हाताला काम मिळेल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे जगण्यासाठी धडपड करावी लागते. झोपडपट्टीमध्ये भाड्याने घर घेतले आहे. बँकेत खाते काढायला पैसेही नाहीत व लागणारे पुरावेही.- सावित्री शिंदे, बांधकाम मजूर तुर्भे नाका.