शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

कष्टकऱ्यांंचे बँक खातेही नाही

By admin | Updated: May 2, 2016 02:21 IST

मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यामधील तब्बल ११ लाख ८९ हजार कुटुंबीयांकडे बँक खातेही नसल्याचे निदर्शनास आले आहे. रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना या कष्टकऱ्यांना

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यामधील तब्बल ११ लाख ८९ हजार कुटुंबीयांकडे बँक खातेही नसल्याचे निदर्शनास आले आहे. रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना या कष्टकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बँक खातेही नसल्याने बचतीचाही प्रश्न येत नसून, महानगरांमध्ये राहूनही सर्वांचे भवितव्य अंधारमय बनले आहे.मुंबई, ठाणे व नवी मुंबई हा परिसर देशातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून ओळखला जात आहे. परंतु याच महानगरांमध्ये लाखो कामगारांचे अद्याप बँकेमध्ये खातेही नाही. नाका कामगार, दगडखाण मजूर, बांधकाम क्षेत्र व इतर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार दिवसभर कष्ट करुन मिळतील त्या पैशामध्ये संसाराचा गाडा चालवत आहेत. झोपडपट्टी परिसरामध्येच बहुतांश रोजंदारी कामगारांचे वास्तव्य असल्याचेही स्पष्ट झाले आहे. शहरांमधील गगनचुंबी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राबणाऱ्या कामगारांना बिल्डरने बांधून दिलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. दगडखाणींमध्येही तात्पुरत्या स्वरुपात काम करणारे कामगार त्याच धुळीत कुटुंबासहित वास्तव्य करतात. बँकेमध्ये खाते असेल व त्याचा नियमित वापर केल्यास आर्थिक शिस्त येण्यास मदत होते. बचतीची सवय असते परंतु हजारो कामगारांमध्ये याविषयी जागृती करण्यात शासकीय यंत्रणा व सामाजिक कार्यक्रर्त्यांनाही अपयश आले आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये चार वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले असताना २६ लाख ६५ हजार ४८१ कुटुंबीयांपैकी २३ लाख ५ हजार १३० नागरिकांचे बँकेत खाते असल्याचे निदर्शनास आले. १७ टक्के नागरिकांचे बँकेत खाते नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये २५ टक्के व रायगड जिल्ह्यामध्ये ३५ टक्के नागरिकांकडे बँक खाते नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये काही सामाजिक संस्थांनी नाका कामगार, बांधकाम मजूर व दगडखाण कामगारांना बचतीचे महत्त्व समजावून बँकेत खाते उघडून दिले होते.केंद्र शासनाने जनधन योजना व इतर योजनांसाठी बँकेत खाते उघडणे बंधनकारक केले आहे. यामुळे अनेकांनी बँकेत पहिल्यांदाच खाते उघडले आहे. परंतु बचत करण्याचा हेतू नसून शासनाकडून सवलती मिळाव्या एवढाच हेतू आहे. कामगारांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन करण्याची सवय लावणेही महत्त्वाचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. सामाजिक संस्थांचे उल्लेखनीय कार्यनवी मुंबई, मुंबई परिसरातील झोपडपट्टी विभागात अन्नपूर्णा महिला मंडळाने मायक्रो फायनान्स संकल्पना यशस्वीपणे राबविली आहे. त्याच धर्तीवर इतरही सामाजिक संस्था काम करीत आहेत.महिला बचत गटांच्या माध्यमातूनही अनेक महिला कामगार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये आर्थिक नियोजनाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये २६,६५,४८१ कुटुंबियांपैकी २३,०५,१३० नागरिकांचे बँकेत खाते आहे. गावाकडे दुष्काळामुळे पिण्यासाठी पाणी नाही व हाताला कामही मिळेना. यामुळे नवी मुंबईत आलो. नाक्यावर उभे राहून मिळेल ते काम करत असून रोज मिळणाऱ्या पगारातून दोन वेळचे जेवण करत आहे. पैसेच नाहीत तर बँकेत खाते कसे उघडणार? - संपत चव्हाण,नाका कामगारबांधकाम मजूर म्हणून पतीसोबत काम करते. रोजच हाताला काम मिळेल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे जगण्यासाठी धडपड करावी लागते. झोपडपट्टीमध्ये भाड्याने घर घेतले आहे. बँकेत खाते काढायला पैसेही नाहीत व लागणारे पुरावेही.- सावित्री शिंदे, बांधकाम मजूर तुर्भे नाका.