शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकऱ्यांंचे बँक खातेही नाही

By admin | Updated: May 2, 2016 02:21 IST

मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यामधील तब्बल ११ लाख ८९ हजार कुटुंबीयांकडे बँक खातेही नसल्याचे निदर्शनास आले आहे. रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना या कष्टकऱ्यांना

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यामधील तब्बल ११ लाख ८९ हजार कुटुंबीयांकडे बँक खातेही नसल्याचे निदर्शनास आले आहे. रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना या कष्टकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बँक खातेही नसल्याने बचतीचाही प्रश्न येत नसून, महानगरांमध्ये राहूनही सर्वांचे भवितव्य अंधारमय बनले आहे.मुंबई, ठाणे व नवी मुंबई हा परिसर देशातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून ओळखला जात आहे. परंतु याच महानगरांमध्ये लाखो कामगारांचे अद्याप बँकेमध्ये खातेही नाही. नाका कामगार, दगडखाण मजूर, बांधकाम क्षेत्र व इतर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार दिवसभर कष्ट करुन मिळतील त्या पैशामध्ये संसाराचा गाडा चालवत आहेत. झोपडपट्टी परिसरामध्येच बहुतांश रोजंदारी कामगारांचे वास्तव्य असल्याचेही स्पष्ट झाले आहे. शहरांमधील गगनचुंबी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राबणाऱ्या कामगारांना बिल्डरने बांधून दिलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. दगडखाणींमध्येही तात्पुरत्या स्वरुपात काम करणारे कामगार त्याच धुळीत कुटुंबासहित वास्तव्य करतात. बँकेमध्ये खाते असेल व त्याचा नियमित वापर केल्यास आर्थिक शिस्त येण्यास मदत होते. बचतीची सवय असते परंतु हजारो कामगारांमध्ये याविषयी जागृती करण्यात शासकीय यंत्रणा व सामाजिक कार्यक्रर्त्यांनाही अपयश आले आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये चार वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले असताना २६ लाख ६५ हजार ४८१ कुटुंबीयांपैकी २३ लाख ५ हजार १३० नागरिकांचे बँकेत खाते असल्याचे निदर्शनास आले. १७ टक्के नागरिकांचे बँकेत खाते नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये २५ टक्के व रायगड जिल्ह्यामध्ये ३५ टक्के नागरिकांकडे बँक खाते नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये काही सामाजिक संस्थांनी नाका कामगार, बांधकाम मजूर व दगडखाण कामगारांना बचतीचे महत्त्व समजावून बँकेत खाते उघडून दिले होते.केंद्र शासनाने जनधन योजना व इतर योजनांसाठी बँकेत खाते उघडणे बंधनकारक केले आहे. यामुळे अनेकांनी बँकेत पहिल्यांदाच खाते उघडले आहे. परंतु बचत करण्याचा हेतू नसून शासनाकडून सवलती मिळाव्या एवढाच हेतू आहे. कामगारांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन करण्याची सवय लावणेही महत्त्वाचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. सामाजिक संस्थांचे उल्लेखनीय कार्यनवी मुंबई, मुंबई परिसरातील झोपडपट्टी विभागात अन्नपूर्णा महिला मंडळाने मायक्रो फायनान्स संकल्पना यशस्वीपणे राबविली आहे. त्याच धर्तीवर इतरही सामाजिक संस्था काम करीत आहेत.महिला बचत गटांच्या माध्यमातूनही अनेक महिला कामगार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये आर्थिक नियोजनाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये २६,६५,४८१ कुटुंबियांपैकी २३,०५,१३० नागरिकांचे बँकेत खाते आहे. गावाकडे दुष्काळामुळे पिण्यासाठी पाणी नाही व हाताला कामही मिळेना. यामुळे नवी मुंबईत आलो. नाक्यावर उभे राहून मिळेल ते काम करत असून रोज मिळणाऱ्या पगारातून दोन वेळचे जेवण करत आहे. पैसेच नाहीत तर बँकेत खाते कसे उघडणार? - संपत चव्हाण,नाका कामगारबांधकाम मजूर म्हणून पतीसोबत काम करते. रोजच हाताला काम मिळेल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे जगण्यासाठी धडपड करावी लागते. झोपडपट्टीमध्ये भाड्याने घर घेतले आहे. बँकेत खाते काढायला पैसेही नाहीत व लागणारे पुरावेही.- सावित्री शिंदे, बांधकाम मजूर तुर्भे नाका.