शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

कोळी समाजाची उडाली तारांबळ

By admin | Updated: May 23, 2017 02:09 IST

कस्टमच्या जागेवरील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोळी समाजाच्या काही प्रतिनिधींनी सोमवारी केंद्रीय अवजड

आविष्कार देसाई लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कस्टमच्या जागेवरील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोळी समाजाच्या काही प्रतिनिधींनी सोमवारी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची भेट घेऊन उघड्यावर पडणारे संसार वाचविण्याची विनंती केली. केंद्रीय मंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याने अतिक्रमणधारकांची धाकधूक मात्र वाढली आहे.‘दोनशे मच्छीमारांवर बेघर होण्याची वेळ’ या मथळ््याखाली लोकमतमध्ये सोमवार, २२ मे रोजी वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यामुळे अतिक्रण करणारे मच्छीमार खडबडून जागे झाले. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांची पुन्हा एकदा धावपळ सुरू झाली आहे. अशीच धावपळ त्यांची १९९६-९७ साली झाली होती. कोळी समाजाच्या विविध बैठकांना जोर आला आहे.मच्छीमारांनी ज्या जागेवर अतिक्रमण केले आहे ती जागा कस्टम विभागाची असल्याने ती पुन्हा कस्टमच्या ताब्यात मिळावी यासाठी कस्टम विभागाने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी काहीच दिवसांपूर्वी अतिक्रमणधारकांना नोटिसाही बजावल्या आहेत. १५ दिवसांमध्ये जमीन खाली करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. यासाठी कस्टम विभागाने १९९६-९७ साली जिल्हा न्यायालयाने त्यांच्या बाजूने दिलेल्या निकालाचा आधार घेतला आहे.कस्टम विभागाकडून होणारी कारवाई तातडीने थांबावी यासाठी कोळी समाज एकवटला आहे. त्यांनी यातून लवकरच मार्ग काढण्यासाठी थेट केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांची सोमवारी पेण तालुक्यातील वडखळ येथील एका कार्यक्रमात भेट घेतली. नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती त्यांनी गीते यांना दिली. गीते यांनी प्रतिनिधींचे बोलणे ऐकून घेत‘मी यात लक्ष घालतो’ असे सांगितल्याचे परशुराम सारंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. केंद्रीय मंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने कोळी समाजाचे प्रतिनिधी काही अंशी निराश झाले. यातून तातडीने मार्ग निघणे गरजेचे असल्याने कोळी समाजातील लोकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.