शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कर्जत-नेरळ-कल्याण राज्यमार्ग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:17 IST

कल्याण रस्त्याने नेरळ येथे येत असताना शेलू गावाच्या हद्दीत झालेल्या प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील मातीचा भराव वाहून गेला होता.

नेरळ : कर्जत-नेरळ-कल्याण या राज्यमार्ग रस्त्यावर ठाणे जिल्हा हद्दीपासून दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले होते. त्या रस्त्यावरील शेलूनजीक असलेल्या रस्त्याचा मातीचा भराव वाहून गेला आहे. दरम्यान, रात्री त्या ठिकाणी वाहनचालकांना वाहने चालविताना समजून येत नसल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

कल्याण रस्त्याने नेरळ येथे येत असताना शेलू गावाच्या हद्दीत झालेल्या प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील मातीचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर तब्बल दोन दिवस म्हणजे ४८ तास मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याच परिसरातून कल्याण रस्ता नेरळ येथे येत असून रस्त्याचा मातीचा भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. त्याबाबत शेलू येथील पोलीस पाटील मनोज पाटील यांनी नेरळ पोलीस ठाणे आणि कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी त्या भागात वाहनचालकांना रस्त्याच्या वाहून गेलेल्या भागाची माहिती होत नाही.

त्यात त्या ठिकाणी असलेले वळण लक्षात घेता नेरळकडील वाहने ही थेट रस्त्याखाली जाऊन शेतात कोसळू शकतात. अशी स्थिती निर्माण झाली असून त्याबाबत गेल्या २० दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही काम त्या भागात केले नाही. पोलीस पाटील असलेले स्थानिक कार्यकर्ते मनोज पाटील यांनी त्या भागात सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या मातीने भरून त्यावर पांढरा रंग लावून त्या सर्व पिशव्या त्या भागातील धोक्याची माहिती देण्यासाठी लावल्या होत्या. मात्र, सततच्या पावसामुळे त्या पिशव्या कोसळल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी पुढे रस्त्याचा भाग वाहून गेला असल्याची माहिती देणारे फलक लावण्याची गरज आहे, तसेच रात्री चकाकणाऱ्या रेडियमची पट्टी त्या ठिकाणी लावून ठेवल्यास वाहनचालकांना त्या भागातील धोक्याची माहिती मिळू शकेल.

वाहने रात्रीच्या वेळी रस्त्याखाली जाऊ शकतात, याची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला असतानाही कोणत्याही प्रकारचे खबरदारीचे उपाय बांधकाम विभाग करीत नसल्याने स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्या ठिकाणी तत्काळ मातीचा भराव करून रस्त्याचे आणखी नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे; पण प्रशासन सुस्त असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

रस्त्यावर किंवा अन्य भागात कोणत्याही प्रकारचे अपघात झाल्यानंतर आम्हाला तरुणांना सोबत घेऊन जावे लागते. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊन धावपळ करावी लागू नये, यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे.- मनोज पाटील,पोलीस पाटील, शेलूआम्हाला शेलू येथील रस्त्याचा नेरळ बाजूकडील रस्ता धोकादायक झाल्याची माहिती आहे, त्यानुसार या रस्त्याचे काम करणाºया ठेकेदाराला त्याबाबत माहिती देण्यात आली असून, तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.- अजयकुमार सर्वगोड,उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग