शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

कर्जत-नेरळ-कल्याण राज्यमार्ग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:17 IST

कल्याण रस्त्याने नेरळ येथे येत असताना शेलू गावाच्या हद्दीत झालेल्या प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील मातीचा भराव वाहून गेला होता.

नेरळ : कर्जत-नेरळ-कल्याण या राज्यमार्ग रस्त्यावर ठाणे जिल्हा हद्दीपासून दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले होते. त्या रस्त्यावरील शेलूनजीक असलेल्या रस्त्याचा मातीचा भराव वाहून गेला आहे. दरम्यान, रात्री त्या ठिकाणी वाहनचालकांना वाहने चालविताना समजून येत नसल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

कल्याण रस्त्याने नेरळ येथे येत असताना शेलू गावाच्या हद्दीत झालेल्या प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील मातीचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर तब्बल दोन दिवस म्हणजे ४८ तास मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याच परिसरातून कल्याण रस्ता नेरळ येथे येत असून रस्त्याचा मातीचा भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. त्याबाबत शेलू येथील पोलीस पाटील मनोज पाटील यांनी नेरळ पोलीस ठाणे आणि कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी त्या भागात वाहनचालकांना रस्त्याच्या वाहून गेलेल्या भागाची माहिती होत नाही.

त्यात त्या ठिकाणी असलेले वळण लक्षात घेता नेरळकडील वाहने ही थेट रस्त्याखाली जाऊन शेतात कोसळू शकतात. अशी स्थिती निर्माण झाली असून त्याबाबत गेल्या २० दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही काम त्या भागात केले नाही. पोलीस पाटील असलेले स्थानिक कार्यकर्ते मनोज पाटील यांनी त्या भागात सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या मातीने भरून त्यावर पांढरा रंग लावून त्या सर्व पिशव्या त्या भागातील धोक्याची माहिती देण्यासाठी लावल्या होत्या. मात्र, सततच्या पावसामुळे त्या पिशव्या कोसळल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी पुढे रस्त्याचा भाग वाहून गेला असल्याची माहिती देणारे फलक लावण्याची गरज आहे, तसेच रात्री चकाकणाऱ्या रेडियमची पट्टी त्या ठिकाणी लावून ठेवल्यास वाहनचालकांना त्या भागातील धोक्याची माहिती मिळू शकेल.

वाहने रात्रीच्या वेळी रस्त्याखाली जाऊ शकतात, याची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला असतानाही कोणत्याही प्रकारचे खबरदारीचे उपाय बांधकाम विभाग करीत नसल्याने स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्या ठिकाणी तत्काळ मातीचा भराव करून रस्त्याचे आणखी नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे; पण प्रशासन सुस्त असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

रस्त्यावर किंवा अन्य भागात कोणत्याही प्रकारचे अपघात झाल्यानंतर आम्हाला तरुणांना सोबत घेऊन जावे लागते. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊन धावपळ करावी लागू नये, यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे.- मनोज पाटील,पोलीस पाटील, शेलूआम्हाला शेलू येथील रस्त्याचा नेरळ बाजूकडील रस्ता धोकादायक झाल्याची माहिती आहे, त्यानुसार या रस्त्याचे काम करणाºया ठेकेदाराला त्याबाबत माहिती देण्यात आली असून, तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.- अजयकुमार सर्वगोड,उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग