शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत-नेरळ-कल्याण राज्यमार्ग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:17 IST

कल्याण रस्त्याने नेरळ येथे येत असताना शेलू गावाच्या हद्दीत झालेल्या प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील मातीचा भराव वाहून गेला होता.

नेरळ : कर्जत-नेरळ-कल्याण या राज्यमार्ग रस्त्यावर ठाणे जिल्हा हद्दीपासून दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले होते. त्या रस्त्यावरील शेलूनजीक असलेल्या रस्त्याचा मातीचा भराव वाहून गेला आहे. दरम्यान, रात्री त्या ठिकाणी वाहनचालकांना वाहने चालविताना समजून येत नसल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

कल्याण रस्त्याने नेरळ येथे येत असताना शेलू गावाच्या हद्दीत झालेल्या प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील मातीचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर तब्बल दोन दिवस म्हणजे ४८ तास मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याच परिसरातून कल्याण रस्ता नेरळ येथे येत असून रस्त्याचा मातीचा भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. त्याबाबत शेलू येथील पोलीस पाटील मनोज पाटील यांनी नेरळ पोलीस ठाणे आणि कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी त्या भागात वाहनचालकांना रस्त्याच्या वाहून गेलेल्या भागाची माहिती होत नाही.

त्यात त्या ठिकाणी असलेले वळण लक्षात घेता नेरळकडील वाहने ही थेट रस्त्याखाली जाऊन शेतात कोसळू शकतात. अशी स्थिती निर्माण झाली असून त्याबाबत गेल्या २० दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही काम त्या भागात केले नाही. पोलीस पाटील असलेले स्थानिक कार्यकर्ते मनोज पाटील यांनी त्या भागात सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या मातीने भरून त्यावर पांढरा रंग लावून त्या सर्व पिशव्या त्या भागातील धोक्याची माहिती देण्यासाठी लावल्या होत्या. मात्र, सततच्या पावसामुळे त्या पिशव्या कोसळल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी पुढे रस्त्याचा भाग वाहून गेला असल्याची माहिती देणारे फलक लावण्याची गरज आहे, तसेच रात्री चकाकणाऱ्या रेडियमची पट्टी त्या ठिकाणी लावून ठेवल्यास वाहनचालकांना त्या भागातील धोक्याची माहिती मिळू शकेल.

वाहने रात्रीच्या वेळी रस्त्याखाली जाऊ शकतात, याची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला असतानाही कोणत्याही प्रकारचे खबरदारीचे उपाय बांधकाम विभाग करीत नसल्याने स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्या ठिकाणी तत्काळ मातीचा भराव करून रस्त्याचे आणखी नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे; पण प्रशासन सुस्त असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

रस्त्यावर किंवा अन्य भागात कोणत्याही प्रकारचे अपघात झाल्यानंतर आम्हाला तरुणांना सोबत घेऊन जावे लागते. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊन धावपळ करावी लागू नये, यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे.- मनोज पाटील,पोलीस पाटील, शेलूआम्हाला शेलू येथील रस्त्याचा नेरळ बाजूकडील रस्ता धोकादायक झाल्याची माहिती आहे, त्यानुसार या रस्त्याचे काम करणाºया ठेकेदाराला त्याबाबत माहिती देण्यात आली असून, तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.- अजयकुमार सर्वगोड,उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग