शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कामोठे खाडी पुलाच्या कठड्यांना तडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:48 IST

पनवेल-सायन महामार्गावरील कामोठे खाडी पुलाच्या संरक्षक कठड्यांना तडे गेले आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावरील कामोठे खाडी पुलाच्या संरक्षक कठड्यांना तडे गेले आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेत उपाययोजना करण्याची मागणी पनवेल-सायन महामार्ग प्रवासी कृती समितीने केली आहे.पनवेल-सायन महामार्गावर कोपरा-कामोठे-कळंबोली दरम्यान खाडी आहे. त्या ठिकाणी पूल बांधण्यात आलेला आहे. महामार्गावर महत्त्वाचा पूल असताना बांधकाम विभागाकडून लक्ष दिले जात नाही. दोन वर्षांपूर्वी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आल्याने आता सुसाट वेगाने वाहने मुंबई-पुणे बाजूकडे धावतात. महत्त्वाचा महामार्ग असल्याने वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामध्ये हलक्याबरोबरच अवजड वाहनांचाही समावेश असतो.महामार्गाचे रुंदीकरण करीत असताना पुलाची दुरुस्ती, डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे संरक्षक कठड्यांची अवस्था बिकट झाली आहे. पूर्वी जे कठडे बांधण्यात आले आहेत ते जीर्ण झाले असून त्याला काही ठिकाणी तडे गेले आहेत.विशेष करून मुंबईहून पुण्याकडे जाणाºया मार्गिकेच्या कठड्यांची अवस्था बिकट झाली आहे. दुर्दैवाने एखाद्या वाहनाने धडक दिल्यास, संरक्षण कठडा खाडीत कोसळतील त्याचबरोबर संबंधित वाहनही खाली जाईल, इतके ते जीर्ण झालेआहेत. एकंदरीतच वाहनांनाअटकाव करण्याची क्षमता त्या कठड्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पनवेल-सायन महामार्ग प्रवासी कृती समितीचे अमोल शितोळे यांनी केली आहे.पुलाच्या जोडावर भेगाकामोठे खाडीवर दोन पुलावरील मार्गिका एकमेकांना जोडण्यात आलेल्या आहेत. हा जोड मजबूत नसल्याने वरच्या भागावर भेगा पडलेल्या आहेत. त्या अनेक दिवसांपासून तशाच आहेत. त्याबाबतही सा.बां. विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.