शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी जेएनपीटी सहकार्य करेल - संजय सेठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 23:29 IST

जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील जेएनपीटी प्रकल्पगस्त शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे;

उरण : जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील जेएनपीटी प्रकल्पगस्त शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे; परंतु जेएनपीटी प्रकल्पगस्त गावांचा विकास न झाल्याने येथील प्रकल्पगस्तांंना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जेएनपीटीबाधित महालन विभागातील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी बंदर प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी यांनी दिली.जेएनपीटी बंदराच्या चेअरमनपदी संजय सेठी यांची नियुक्ती झाल्याने उरण महालन विभाग सरपंच कमेटीचे अध्यक्ष व जसखार गावाचे सरपंच दामूशेठ घरत यांनी जेएनपीटीच्या मालमत्ता टॅक्ससंदर्भात व इतर प्रलंबित प्रश्नासंदर्भात संजय सेठी यांची बुधवारी भेट घेऊन त्यांचे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने स्वागत केले. यावेळी उरण महालन विभागातील जसखार, सोनारी, करळ, नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, जासई, चिर्ले, धुतूम, पागोटे, नवघर आदी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी, प्रकल्पग्रस्तांनी जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी आपल्या पिकत्या शेतजमिनी अल्प किमतीत संपादित करून दिल्या.येथील प्रकल्पगस्त गावांचे योग्य पुनर्वसन, नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन बंदर प्रशासनाकडून देण्यात आले होते. परंतु ४० वर्षांच्या कालावधीनंतरही या प्रकल्पगस्त गावातील रहिवाशांना नागरी सुविधा, नोकरी, थकीत टॅक्ससाठी झगडावे लागत आहे. थकीत असणारा मालमत्ता कर कायद्याच्या तरतुदीनुसार त्या गावांना दिला जाईल असे बोर्ड मिटिंगमध्ये ठरले आहे,तसेच जेएनपीटीबाधित ग्रामपंचायती हद्दीतील विकासकामे यापुढे जेएनपीटीच्या सीआरएस फंडातून करण्यात येणार आहेत आणि जसखार गावच्या चारही बाजूने जात असलेल्या रस्त्यामुळे ज्या घरांचे नुकसान होणार आहे त्या घरांच्या जागेसंदर्भात जेएनपीटीने ग्रामपंचायत जसखारकडून एक निवेदन देण्यात यावे त्या निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी बंदराच्या माध्यमातून पुढाकार घेऊ, असे आश्वासन चेअरमन संजय सेठी यांच्याकडून देण्यात आले.>घरे उठविण्याचा प्रशासनाचा घाटसिंगापूर पोर्टच्या रस्त्याआड येणाºया जसखार गावातील रहिवाशांची अनेक घरे उठविण्याचा घाट प्रशासन घालत असेल तर ते योग्य नाही. उलट त्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच येथील प्रकल्पग्रस्तांचे असणारे इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या वेळी जेएनपीटी बाधित ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महालन विभाग सरपंच कमेटीचे अध्यक्ष दामूशेठ घरत यांनी केली.