शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

पनवेल तालुक्यात पुलांच्या अपूर्ण कामांमुळे अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:35 IST

पावसाने चांगलाच जोर पकडला असून पनवेल तालुक्यात रविवारी १५८८. ७० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

- वैभव गायकरपनवेल : पावसाने चांगलाच जोर पकडला असून पनवेल तालुक्यात रविवारी १५८८. ७० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फटका ग्रामीण भागाला अधिक बसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलेल्या पुलांची कामे रखडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.अतिवृष्टीमुळे पनवेल तालुक्यातील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यात उमरोली गावातील पुलावरून पाणी गेल्याने गावाचा संपर्क तुटला. जुन्या पुलावरून पाणी गेल्याने यात एक दुचाकी वाहून गेली, यामध्ये दाम्पत्याला जीव गमवावा लागला असून अद्याप पत्नीचा शोध लागलेला नाही.सध्या उमरोलीत नव्या पुलाचे काम सुरू आहे. जुना पूल पाण्याखाली गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणी सूचना फलक व इतर उपाययोजना राबविण्याची गरज आहे. मात्र, तसे न झाल्याने दुर्घटना घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळेच दोघांना जीव गमवावा लागला आहे.सध्याच्या घडीला तालुक्यात मोरबे, महाळुंगी या ठिकाणी मोरीवर पुलाचे काम सुरू आहे, तर केवाळे पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप अवजड वाहनांची वाहतूक या ठिकाणाहून सुरू करण्यात आली नाही. पनवेल तालुक्यातील अतिवृष्टीचा फटका वाहतूक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. सिद्धी करवले येथील पूलही यंदा पाण्याखाली गेल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागले. हा विभाग पनवेल महापालिकेच्या अखत्यारित येतो. देवद गावात जाण्यासाठी गाढी नदीतून पर्यायी मार्ग आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणाहून चारचाकी स्कॉर्पिओ गाडी वाहून जाण्याचा प्रकार घडला. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेने गाडी पाण्यातून बाहेर काढण्यास यश आले.तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रामस्थ धोकादायक शॉर्टकट वापरून प्रवास करतात. मात्र, प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत नसल्याने दुर्घटना घडत असल्याचे समोर येत आहे. यंदा खारघरमध्येही नाला फुटल्याने पांडवकड्याचे पाणी घुसल्याने कोपरा परिसर जलमय झाला होता, यामुळे सायन-पनवेल महामार्गावरही पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सिडकोच्या नियोजनाअभावी नागरिकांना फटका बसला. नाल्यावर सिडकोने उभारलेला तात्पुरत्या स्वरूपाचा पूलच पांडवकड्याच्या पाण्याला अडथळा ठरत आहे. मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी पाण्याचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही कारणास्तव सिडकोला हे काम पूर्ण करता आलेले नाही.पनवेल तालुक्यातील बारापाडा, डोलघर या दोन गावांना नेहमीच अतिवृष्टीचा फटका बसत असतो. सुमारे दोन-दोन दिवस या गावांचा संपर्क तुटतो. याकरिताही तहसील प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची गरज आहे.>प्रशासनामार्फत कोणत्याही सूचना नाहीतपनवेल तालुक्यात सुरू असलेल्या पुलांच्या कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग असो वा सिडको प्रशासन सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. देवद, उमरोली आदीसह ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहेत, त्या ठिकाणी नागरिकांसाठी सूचना देणारे फलक लावणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात दुर्घटना टाळता येतील, असे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.