शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तालुक्यात पुलांच्या अपूर्ण कामांमुळे अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:35 IST

पावसाने चांगलाच जोर पकडला असून पनवेल तालुक्यात रविवारी १५८८. ७० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

- वैभव गायकरपनवेल : पावसाने चांगलाच जोर पकडला असून पनवेल तालुक्यात रविवारी १५८८. ७० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फटका ग्रामीण भागाला अधिक बसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलेल्या पुलांची कामे रखडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.अतिवृष्टीमुळे पनवेल तालुक्यातील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यात उमरोली गावातील पुलावरून पाणी गेल्याने गावाचा संपर्क तुटला. जुन्या पुलावरून पाणी गेल्याने यात एक दुचाकी वाहून गेली, यामध्ये दाम्पत्याला जीव गमवावा लागला असून अद्याप पत्नीचा शोध लागलेला नाही.सध्या उमरोलीत नव्या पुलाचे काम सुरू आहे. जुना पूल पाण्याखाली गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणी सूचना फलक व इतर उपाययोजना राबविण्याची गरज आहे. मात्र, तसे न झाल्याने दुर्घटना घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळेच दोघांना जीव गमवावा लागला आहे.सध्याच्या घडीला तालुक्यात मोरबे, महाळुंगी या ठिकाणी मोरीवर पुलाचे काम सुरू आहे, तर केवाळे पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप अवजड वाहनांची वाहतूक या ठिकाणाहून सुरू करण्यात आली नाही. पनवेल तालुक्यातील अतिवृष्टीचा फटका वाहतूक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. सिद्धी करवले येथील पूलही यंदा पाण्याखाली गेल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागले. हा विभाग पनवेल महापालिकेच्या अखत्यारित येतो. देवद गावात जाण्यासाठी गाढी नदीतून पर्यायी मार्ग आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणाहून चारचाकी स्कॉर्पिओ गाडी वाहून जाण्याचा प्रकार घडला. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेने गाडी पाण्यातून बाहेर काढण्यास यश आले.तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रामस्थ धोकादायक शॉर्टकट वापरून प्रवास करतात. मात्र, प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत नसल्याने दुर्घटना घडत असल्याचे समोर येत आहे. यंदा खारघरमध्येही नाला फुटल्याने पांडवकड्याचे पाणी घुसल्याने कोपरा परिसर जलमय झाला होता, यामुळे सायन-पनवेल महामार्गावरही पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सिडकोच्या नियोजनाअभावी नागरिकांना फटका बसला. नाल्यावर सिडकोने उभारलेला तात्पुरत्या स्वरूपाचा पूलच पांडवकड्याच्या पाण्याला अडथळा ठरत आहे. मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी पाण्याचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही कारणास्तव सिडकोला हे काम पूर्ण करता आलेले नाही.पनवेल तालुक्यातील बारापाडा, डोलघर या दोन गावांना नेहमीच अतिवृष्टीचा फटका बसत असतो. सुमारे दोन-दोन दिवस या गावांचा संपर्क तुटतो. याकरिताही तहसील प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची गरज आहे.>प्रशासनामार्फत कोणत्याही सूचना नाहीतपनवेल तालुक्यात सुरू असलेल्या पुलांच्या कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग असो वा सिडको प्रशासन सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. देवद, उमरोली आदीसह ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहेत, त्या ठिकाणी नागरिकांसाठी सूचना देणारे फलक लावणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात दुर्घटना टाळता येतील, असे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.