शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात

By admin | Updated: March 25, 2017 01:43 IST

पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे

मयूर तांबडे / पनवेलपनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे, तर काही पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. पनवेलमध्ये खरी लढत शेकाप व भाजपामध्ये होणार असली तरी इतर पक्ष आपापले उमेदवार उभे करून टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहेत, तर मनसेने एकला चलोची भूमिका घेतलेली दिसत आहे.रायगड जिल्ह्यातील पहिल्याच पनवेल महापालिकेची निवडणूक लवकरच होत आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपापल्या पक्षाकडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. साऱ्याच पक्षात इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे उमेदवार निवडताना पक्ष प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातच उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शेकाप व काँग्रेसमध्ये आघाडी झालेली आहे. या आघाडीत राष्ट्रवादीदेखील सामील झाली आहे. पनवेलमध्ये २००४ पासून रामशेठ ठाकूर विरुद्ध विवेक पाटील अशीच लढाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या महापालिकेच्या निवडणुकीत देखील ठाकूर विरु द्ध पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी पनवेल परिसरात सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहचण्याची एकही संधी उमेदवार सोडत नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर, चौकांत, रेल्वे स्थानकात लावण्यात आलेल्या बॅनरबाजीतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात आघाडी झालेली आहे, तर शिवसेना व भाजपा यांच्यात युतीचे घोंगडे भिजत पडले आहे. मनसे स्वबळावर निवडणुका लढवण्यास सज्ज आहे. भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या तर त्याचा फायदा शेकाप आघाडीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेकापला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपा व शिवसेनेची युती व्हावी अशी काहींची इच्छा आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांत चुरस पाहावयास मिळणार आहे. पनवेलमध्ये कोण बाजी मारणार, यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. निवडणुकीत अनेक जण पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र तिकीट न मिळाल्याने नाराज उमेदवारांमुळे पक्षाला बंडखोरीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.