शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या दर्शनातून विमानतळबाधितांशी संवाद

By admin | Updated: September 11, 2016 02:30 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. परंतु काही मुद्यावरून प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम असल्याने सिडकोने त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद सुरू केला आहे

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. परंतु काही मुद्यावरून प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम असल्याने सिडकोने त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद सुरू केला आहे. व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी बाप्पाच्या दर्शनाचे निमित्त साधत प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद सुरू केला आहे.विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी पनवेल तालुक्यातील दहा गावे स्थलांतरित करावी लागणार आहेत. त्यामुळे या गावांतील साडेतीन हजार कुटुंबे निर्वासित होणार आहेत. त्यांचे वहाळ आणि वडघर येथे पुनर्वसन केले जाणार आहे. बाधित होणाऱ्या या ग्रामस्थांना त्यांच्या मूळ बांधकाम क्षेत्राच्या तीन पट क्षेत्राचा भूखंड देण्यात येणार आहे. त्याची सोडत प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. पुढील सहा-सात महिन्यांत स्थलांतरित होणाऱ्या या बांधकामधारकांना प्रत्यक्ष भूखंडांचा ताबा देण्यात येणार आहे. तत्पूर्वी संबंधितांनी भाडेतत्त्वावर स्वत:च्या निवासाची व्यवस्था करावी, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. स्थलांतरित होणाऱ्या ग्रामस्थांना १८ महिन्यांचे घरभाडे दिले जाणार आहे. परंतु शेवटची मागणी पूर्ण होइूपर्यंत स्थलांतर न करण्याची भूमिका काही प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. गावांचे स्थलांतर झाल्याशिवाय विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू करता येणार नाही. यापार्श्वभूमीवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी आता प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद सुरू केला आहे. श्रीगणेशाची स्थापणा झाल्यानंतर मंगळवारपासून गगराणी यांनी स्थालांतर होणाऱ्या गावांचा दौरा सुरू केला आहे. एक गाव, एक गणपतीची परंपरा जोपासणाऱ्या कोपरा येथील गावाला भेट देवून त्यांनी तेथील ग्रामस्थांशी मुक्त संवाद साधला. त्यानंतर चिंचपाडा व गणेशपुरी गावातील घरगुती व सार्वजनिक गणेशात्सवाला भेटी देवून बाप्पांचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी ग्रामस्थ व त्यांच्या नेत्यांशी चर्चा केली. स्थालांतरला विरोध करण्यामागची त्यांची नक्की भूमिका काय ते समजून घेतली. शेवटची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत स्थलांतर करणार नाही, ही प्रकल्पग्रस्तांची मागणी अगदी अव्यवहार्य आहे. ही बाब विमानतळ प्रकल्पाला बाधक असल्याने प्रकल्पग्रस्तांनी कोठे तरी थांबण्याची गरज आहे. विमानतळ प्रकल्पाच्या हितासाठी प्रकल्पग्रस्तांनी दोन पावले टाकल्यास सिडको चार पावले पुढे टाकेल, असे आवाहन गगराणी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)