शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

बाप्पाच्या दर्शनातून विमानतळबाधितांशी संवाद

By admin | Updated: September 11, 2016 02:30 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. परंतु काही मुद्यावरून प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम असल्याने सिडकोने त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद सुरू केला आहे

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. परंतु काही मुद्यावरून प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम असल्याने सिडकोने त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद सुरू केला आहे. व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी बाप्पाच्या दर्शनाचे निमित्त साधत प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद सुरू केला आहे.विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी पनवेल तालुक्यातील दहा गावे स्थलांतरित करावी लागणार आहेत. त्यामुळे या गावांतील साडेतीन हजार कुटुंबे निर्वासित होणार आहेत. त्यांचे वहाळ आणि वडघर येथे पुनर्वसन केले जाणार आहे. बाधित होणाऱ्या या ग्रामस्थांना त्यांच्या मूळ बांधकाम क्षेत्राच्या तीन पट क्षेत्राचा भूखंड देण्यात येणार आहे. त्याची सोडत प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. पुढील सहा-सात महिन्यांत स्थलांतरित होणाऱ्या या बांधकामधारकांना प्रत्यक्ष भूखंडांचा ताबा देण्यात येणार आहे. तत्पूर्वी संबंधितांनी भाडेतत्त्वावर स्वत:च्या निवासाची व्यवस्था करावी, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. स्थलांतरित होणाऱ्या ग्रामस्थांना १८ महिन्यांचे घरभाडे दिले जाणार आहे. परंतु शेवटची मागणी पूर्ण होइूपर्यंत स्थलांतर न करण्याची भूमिका काही प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. गावांचे स्थलांतर झाल्याशिवाय विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू करता येणार नाही. यापार्श्वभूमीवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी आता प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद सुरू केला आहे. श्रीगणेशाची स्थापणा झाल्यानंतर मंगळवारपासून गगराणी यांनी स्थालांतर होणाऱ्या गावांचा दौरा सुरू केला आहे. एक गाव, एक गणपतीची परंपरा जोपासणाऱ्या कोपरा येथील गावाला भेट देवून त्यांनी तेथील ग्रामस्थांशी मुक्त संवाद साधला. त्यानंतर चिंचपाडा व गणेशपुरी गावातील घरगुती व सार्वजनिक गणेशात्सवाला भेटी देवून बाप्पांचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी ग्रामस्थ व त्यांच्या नेत्यांशी चर्चा केली. स्थालांतरला विरोध करण्यामागची त्यांची नक्की भूमिका काय ते समजून घेतली. शेवटची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत स्थलांतर करणार नाही, ही प्रकल्पग्रस्तांची मागणी अगदी अव्यवहार्य आहे. ही बाब विमानतळ प्रकल्पाला बाधक असल्याने प्रकल्पग्रस्तांनी कोठे तरी थांबण्याची गरज आहे. विमानतळ प्रकल्पाच्या हितासाठी प्रकल्पग्रस्तांनी दोन पावले टाकल्यास सिडको चार पावले पुढे टाकेल, असे आवाहन गगराणी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)