शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

माहिती मागवणाऱ्यांची होणार नोंद

By admin | Updated: September 12, 2016 03:26 IST

माहितीचा अधिकार कायद्यामुळे सरकारी विभागात होणाऱ्या भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसला आहे. विविध सार्वजनिक प्राधिकरणाकडून

आविष्कार देसाई,  अलिबागमाहितीचा अधिकार कायद्यामुळे सरकारी विभागात होणाऱ्या भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसला आहे. विविध सार्वजनिक प्राधिकरणाकडून वेगवेगळ््या नमुन्यात माहिती उपलब्ध करुन देण्यात येते मात्र माहिती मागणऱ्या अर्जादारांच्या माहितीची नोंद ठेवण्याची व्यवस्था नव्हती. सरकारच्या निर्णयानुसार आता माहिती मागणाऱ्या अर्जदाराच्या इंतभूत माहितीचे संकलन केले जाणार आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांवर सरकारचे लक्ष राहणार आहे. यामुळे भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्यां अर्जदारांची बदनामी टळणार आहे.माहितीचा अधिकार हा कायदा २००५ साली अस्तित्वात आला. माहितीचा अधिकार पारित करावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुढाकार घेतला होता. महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरु केली. सरकारी योजनांमध्ये मोठ्या संख्येने आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याने सरकारने माहिती अधिकार कायद्याचा अंकुश ठेवला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करण्याच यश आले. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर माहिती अधिकाराचा वचक बसल्याने उलटसुलट प्रकरणांनान चांगलीच खिळ बसली असल्याचे विविध उघड झालेल्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणावरुन सहज लक्षात येते.माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करुन आपापली आर्थिक पोळी भाजणारे महाभागही आहेत. परंतु सरकारी यंत्रणांकडे माहिती अधिकारात माहिती मागणाऱ्या अर्जदाराची ढोबळ माहिती असायची. तसेच कोणत्या अर्जदाराने कोणत्या प्राधिकरणाकडे कोणती माहिती मागितली आहे, अर्जदार हा दारिद्र रेषेखालील आहे का, अर्ज कधी दाखल केला, माहिती नाकरली काय, कोणत्या कलमाच्या खाली नाकारली, प्रथम अपिल झाले आहे का, माहितीचे शुल्क त्याची तारखी यासह अन्य बाबींची नोंदणी माहितीचा अधिकार अर्ज प्राप्त होणाऱ्या संबंधित प्राधिकरणाला ठेवावी लागणार आहे.माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या अधिकाराचा वापर करुन आर्थिक तडजोडी करणाऱ्यांना नोंदी ठेवल्यामुळे आळा बसणार आहे, तसेच अर्जावरच्या कार्यवाहीचा सुस्पष्ट अहवाल सरकारला प्राप्त होणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले. प्राधिकरणाला ठेवावी लागणार माहिती : कोणत्या अर्जदाराने कोणत्या प्राधिकरणाकडे कोणती माहिती मागितली आहे, अर्जदार हा दारिद्र रेषेखालील आहे का, अर्ज कधी दाखल केला, माहिती नाकरली काय, कोणत्या कलमाच्या खाली नाकारली, प्रथम अपिल झाले आहे का, माहितीचे शुल्क त्याची तारखी यासह अन्य बाबींची नोंदणी माहितीचा अधिकार अर्ज प्राप्त होणाऱ्या संबंधित प्राधिकरणाला ठेवावी लागणार आहे.