शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: January 14, 2017 06:49 IST

देशाच्या सद्यस्थितीचा आरसा म्हणजे त्या देशाच्या समाज व्यवस्थेमधील स्त्रियांचे स्थान आहे. दुर्देवाने फुले, आंबेडकर,

अलिबाग : देशाच्या सद्यस्थितीचा आरसा म्हणजे त्या देशाच्या समाज व्यवस्थेमधील स्त्रियांचे स्थान आहे. दुर्देवाने फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या नावाने पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात व त्यात रायगड जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. या अत्याचारांपासून मुक्ती मिळवण्याकरीता स्त्री निर्भयतेचे दर्शन घडविणारा पतंगोत्सव असल्याचे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी केले. नई उमंग बेटी के संग, बेटी जिंदाबाद अभियान शुभारंभ प्रसंगी महिला अत्याचार विरोधी मंचाच्या प्रवर्तकांना मार्गदर्शन करण्याकरीता पेण मध्ये आयोजित मेळाव्यात पाटील बोलत होत्या. नई उमंग बेटी के संग, बेटी जिंदाबाद या अभियानाची सांगता संक्रातीच्या दिवशी महिला व मुली पतंग उडवून करणार आहे. उपेक्षित महिलांचा गुढीपाडवा चित्रपट महोत्सव, सावित्रीचा जागर हे अभियान म्हणजे पतंगाच्या दोरीपासून तिरंग्याच्या दोरीपर्यंत महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्याचे असल्याचे प्रतिपादन वैशाली पाटील यांनी केले.कुप्रसिध्द निर्भया बलात्कार प्रकरणानंतर महिलांना मोकळा श्वास घेण्याच्या उददेशाने या महिला अत्याचार विरोधी मंचाची स्थापना करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या स्त्रि-पुरूषांच्या एकत्रितपणे सुरू केलेल्या चळवळीने विविध उपक्रम राबविले आहेत. यामध्ये अंकुर ट्रस्ट या संस्थ्ोच्या सहायाने माहितीपट महोत्सवाचे नुकतेच आयोजन केल्याची माहिती निशरीन भारमल यांनी यावेळी दिली. पेण न. पा. हददीत कन्या शाळा, उर्दू शाळा तरणखोप, पी,एन.पी. आशाकिरण कॉन्वेंट स्कूल पानेड , आई डे केअर संस्था यांच्या सहयोगाने शासकिय आदिवासी मुलींचे वसतिगृह पेण या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात स्त्री पुरु ष समानता, पर्यावरण व स्त्रिया, लिंगभेद , दुसरी निर्भया का अशा सारख्या विषयांवरील माहितीपट दाखवून चर्चा करण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)