शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पर्युषण पर्वात जैन धर्मीयांच्या घरावर हातोडा

By admin | Updated: September 1, 2016 03:39 IST

पर्युषण पर्व सुरू असताना सीवूडमधील लक्ष्मी टॉवरमधील जैनधर्मीय नागरिकाच्या घरावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली.

नामदेव मोरे,  नवी मुंबई पर्युषण पर्व सुरू असताना सीवूडमधील लक्ष्मी टॉवरमधील जैनधर्मीय नागरिकाच्या घरावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. याच इमारतीमध्ये महापालिकेचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत तायडे व प्रकाश वाघमारे यांनीही अतिक्रमण केले असून त्यांच्या घरावर कोणतीच कारवाई केलेली नाही. पालिकेच्या पक्षपाती व हुकूमशाही कारभारामुळे शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सीवूड रेल्वे स्टेशनसमोर लक्ष्मी टॉवर इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील दोन घरांमधील विनापरवाना केलेल्या बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. उत्पल मंडल व प्रिया जैन यांच्या घरामध्ये तयार केलेला पोटमाळा हटविण्यात आला. पर्युषण पर्व सुरू असल्यामुळे जैन यांचा व त्यांच्या दोन्ही मुलांचा उपवास सुरू आहे. पर्युषण पर्व हे जैनधर्मीयांसाठी पवित्र पर्व आहे. ३ व ४ सप्टेंबरला घरामध्ये नातेवाईक व इतर ओळखीचे नागरिक धार्मिक समारंभाला येणार आहेत. यामुळे चार दिवस कारवाई करू नये अशी विनंती केल्यानंतरही पालिकेच्या पथकाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. आम्ही कारवाई करणारच, विरोध केल्यास तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा त्यांना देवून कारवाई सुरू केली. आम्ही अतिक्रमण केले नाही. हे घर महापालिकेच्या सहायक आयुक्त संध्या अंबादे यांच्या मालकीचे होते. त्यांनी चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीला विकले व आम्ही त्यांच्याकडून खरेदी केले. घर विकत घेतल्यानंतर आम्ही कोणतेही बांधकाम केले नाही. घराचा रंगही बदललेला नाही. आमचा काहीही दोष नसताना आमच्यावर सण व उत्सवाच्या काळात कारवाई का, अशी विचारणा केल्यानंतरही प्रशासनाने त्यांचे काहीही ऐकले नाही.

जैनधर्मीयांच्या ज्या घरावर कारवाई केली त्याविषयीची तक्रार दोन वर्षांपूर्वीच केली होती. अतिक्रमण विभाग, आयुक्त व तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारामध्येही तक्रार केली होती. पालिकेच्या अधिकारी संध्या अंबादे यांचे घर असल्याचेही तेव्हा तक्रारीत उल्लेख केला होता. परंतु तेव्हा काहीही कारवाई न करणाऱ्या अतिक्रमण विभागाने धार्मिक सण, उत्सवाच्या काळात आकसाने कारवाई केल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. लक्ष्मी टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर यापूर्वी अतिक्रमण विभागात सहायक आयुक्त असलेले प्रकाश वाघमारे व प्रशासन विभागात अनेक वर्षांपासून सहायक आयुक्त असलेल्या चंद्रकांत तायडे रहात आहेत. त्यांनी पहिल्या मजल्यावर अतिक्रमण केले आहे. टेरेसवर पत्रा टाकून त्यांच्या ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनीच अतिक्रमण केलेले असताना व इमारतीमधील अपवाद वगळता सर्वांनीच अतिक्रमण केलेले असताना फक्त दोन घरांवर कारवाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. तायडे, वाघमारेंवर कारवाई कधी? महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वाघमारे लक्ष्मी टॉवरमध्ये १०२ क्रमांकाच्या सदनिकेमध्ये वास्तव्य करत आहेत. त्यांनीही टेरेसवर पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण केले आहे. वाघमारे हे यापूर्वी अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त होते. ही इमारत असलेल्या बेलापूर विभाग कार्यालयाचे ते विभाग अधिकारीही होते. चंद्रकांत तायडे यांच्याकडे यापूर्वी प्रशासन, उद्यान व इतर अनेक विभागांचा कार्यभार होता. ते या टॉवरमधील १०३ नंबरच्या सदनिकेमध्ये वास्तव्य करत आहेत. त्यांनीही अतिक्रमण केले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का, असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत. मुंढे साहेब, हाच का नि:पक्षपातीपणा? महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची निवड झाल्यानंतर शहरात नि:पक्षपातीपणे अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्षात शहरात पक्षपाती कारवाई सुरू झाली आहे. सोसायटीमधील वैयक्तिक भांडण असणारे नागरिक पालिकेकडे आपल्याच शेजाऱ्यांची तक्रार करत असून पालिका कोणताही विचार न करता त्यावर कारवाई करून पैसा व वेळ फुकट घालवत आहे. सीवूडमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांना अभय देवून सामान्य नागरिकाच्या घरांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय याच परिसरामध्ये सार्वजनिक बसस्टॉपवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मार्केटच्या भूखंडावर धार्मिक स्थळाच्या नावाखाली जागा अडविण्यात आली असून सामान्य नागरिकांवर कारवाई होत असल्याने मुंढे साहेब हाच का तुमचा नि:पक्षपातीपणा असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. अंबादेवर कारवाई का नाही?महापालिकेने प्रिया जैन यांच्या घरावर कारवाई केली आहे. परंतु ही सदनिका महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त संध्या अंबादे यांच्या मालकीची होती. सद्यस्थितीमध्ये वीजबिलही त्यांच्याच नावावर आहे. त्यांनी ही सदनिका दोन वर्षांपूर्वी विकली. ज्यांनी विकत घेतली त्यांनीही तक्रारींना कंटाळून ती जैन यांना विकली. जैन यांनी कोणतेही अतिक्रमण केले नसताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. प्रशासन दक्ष असेल तर त्यांनी सदनिका अंबादे यांच्या मालकीची असताना का कारवाई केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.