शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बालमजुरीविरोधी कायद्यातील बदल कितपत योग्य?

By admin | Updated: June 12, 2015 05:48 IST

बालमजुरी रोखण्यासाठी केलेल्या कायद्यांमध्ये केंद्र सरकारने नुकतेच बदल करण्याचे ठरविले आहे. या बदलांनुसार बालमजुरी करायला लावणाऱ्यांना ठोठावल्या

ओंकार करंबेळकर, मुंबई बालमजुरी रोखण्यासाठी केलेल्या कायद्यांमध्ये केंद्र सरकारने नुकतेच बदल करण्याचे ठरविले आहे. या बदलांनुसार बालमजुरी करायला लावणाऱ्यांना ठोठावल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली गेली आहे. त्याचप्रमाणे, धोकादायक कामावर १८ वर्षांखालील मुलांना काम करण्यास सरसकट बंदी घालण्यात आली आहे. हे बदल जरी स्वागतार्ह असले तरी पारंपरिक घरगुती व्यवसायात १४ वर्षांखालील मुलांना काम करण्यास मुभा देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १३ मे रोजी कॅबिनेटने स्वीकारलेल्या या बदलांवरती सध्या विविध अंगांनी चर्चा सुरू आहे.१४ वर्षांखालील मुलांना धोकादायक नसणाऱ्या आणि त्यांच्या शिक्षणात अडथळा होत नसेल तर कौटुंबिक व्यवसायात मदत करता येणार आहे. त्याचप्रमाणे शाळा सांभाळून चित्रपट, जाहिरात क्षेत्रातही काम करता येणार आहे. या सर्व बदलांवरती तज्ज्ञांद्वारे प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. याआधीही १४ वर्षांखालील मुले अशा व्यवसायांमध्ये, जाहिरात, चित्रपट यांमध्ये काम करत होतीच. पण आता असा का बदल केला गेला, असा प्रश्न विचारला जात आहे. या बदलामुळे त्याला केवळ कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल. कित्येक वेळेस ज्या कामाच्या ठिकाणी छापे टाकले जात तेथील बालकामगार मालकाचे नातलगच असत, कित्येक वेळेस छापे टाकल्यावर मुलांजवळ दप्तरेही सापडली आहेत, अशा मुलांची नोंद जवळच्या शाळांमध्ये असून, त्यांची हजेरीही नोेंदविली जात असते, त्यामुळे अशा बालमजुरीला कायद्याचे संरक्षण प्राप्त होईल अशी भीती व्यक्त होत आहे.