शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

बालमजुरीविरोधी कायद्यातील बदल कितपत योग्य?

By admin | Updated: June 12, 2015 05:48 IST

बालमजुरी रोखण्यासाठी केलेल्या कायद्यांमध्ये केंद्र सरकारने नुकतेच बदल करण्याचे ठरविले आहे. या बदलांनुसार बालमजुरी करायला लावणाऱ्यांना ठोठावल्या

ओंकार करंबेळकर, मुंबई बालमजुरी रोखण्यासाठी केलेल्या कायद्यांमध्ये केंद्र सरकारने नुकतेच बदल करण्याचे ठरविले आहे. या बदलांनुसार बालमजुरी करायला लावणाऱ्यांना ठोठावल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली गेली आहे. त्याचप्रमाणे, धोकादायक कामावर १८ वर्षांखालील मुलांना काम करण्यास सरसकट बंदी घालण्यात आली आहे. हे बदल जरी स्वागतार्ह असले तरी पारंपरिक घरगुती व्यवसायात १४ वर्षांखालील मुलांना काम करण्यास मुभा देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १३ मे रोजी कॅबिनेटने स्वीकारलेल्या या बदलांवरती सध्या विविध अंगांनी चर्चा सुरू आहे.१४ वर्षांखालील मुलांना धोकादायक नसणाऱ्या आणि त्यांच्या शिक्षणात अडथळा होत नसेल तर कौटुंबिक व्यवसायात मदत करता येणार आहे. त्याचप्रमाणे शाळा सांभाळून चित्रपट, जाहिरात क्षेत्रातही काम करता येणार आहे. या सर्व बदलांवरती तज्ज्ञांद्वारे प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. याआधीही १४ वर्षांखालील मुले अशा व्यवसायांमध्ये, जाहिरात, चित्रपट यांमध्ये काम करत होतीच. पण आता असा का बदल केला गेला, असा प्रश्न विचारला जात आहे. या बदलामुळे त्याला केवळ कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल. कित्येक वेळेस ज्या कामाच्या ठिकाणी छापे टाकले जात तेथील बालकामगार मालकाचे नातलगच असत, कित्येक वेळेस छापे टाकल्यावर मुलांजवळ दप्तरेही सापडली आहेत, अशा मुलांची नोंद जवळच्या शाळांमध्ये असून, त्यांची हजेरीही नोेंदविली जात असते, त्यामुळे अशा बालमजुरीला कायद्याचे संरक्षण प्राप्त होईल अशी भीती व्यक्त होत आहे.