शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बालमजुरीविरोधी कायद्यातील बदल कितपत योग्य?

By admin | Updated: June 12, 2015 05:48 IST

बालमजुरी रोखण्यासाठी केलेल्या कायद्यांमध्ये केंद्र सरकारने नुकतेच बदल करण्याचे ठरविले आहे. या बदलांनुसार बालमजुरी करायला लावणाऱ्यांना ठोठावल्या

ओंकार करंबेळकर, मुंबई बालमजुरी रोखण्यासाठी केलेल्या कायद्यांमध्ये केंद्र सरकारने नुकतेच बदल करण्याचे ठरविले आहे. या बदलांनुसार बालमजुरी करायला लावणाऱ्यांना ठोठावल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली गेली आहे. त्याचप्रमाणे, धोकादायक कामावर १८ वर्षांखालील मुलांना काम करण्यास सरसकट बंदी घालण्यात आली आहे. हे बदल जरी स्वागतार्ह असले तरी पारंपरिक घरगुती व्यवसायात १४ वर्षांखालील मुलांना काम करण्यास मुभा देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १३ मे रोजी कॅबिनेटने स्वीकारलेल्या या बदलांवरती सध्या विविध अंगांनी चर्चा सुरू आहे.१४ वर्षांखालील मुलांना धोकादायक नसणाऱ्या आणि त्यांच्या शिक्षणात अडथळा होत नसेल तर कौटुंबिक व्यवसायात मदत करता येणार आहे. त्याचप्रमाणे शाळा सांभाळून चित्रपट, जाहिरात क्षेत्रातही काम करता येणार आहे. या सर्व बदलांवरती तज्ज्ञांद्वारे प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. याआधीही १४ वर्षांखालील मुले अशा व्यवसायांमध्ये, जाहिरात, चित्रपट यांमध्ये काम करत होतीच. पण आता असा का बदल केला गेला, असा प्रश्न विचारला जात आहे. या बदलामुळे त्याला केवळ कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल. कित्येक वेळेस ज्या कामाच्या ठिकाणी छापे टाकले जात तेथील बालकामगार मालकाचे नातलगच असत, कित्येक वेळेस छापे टाकल्यावर मुलांजवळ दप्तरेही सापडली आहेत, अशा मुलांची नोंद जवळच्या शाळांमध्ये असून, त्यांची हजेरीही नोेंदविली जात असते, त्यामुळे अशा बालमजुरीला कायद्याचे संरक्षण प्राप्त होईल अशी भीती व्यक्त होत आहे.