शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदर्शनातून उलगडला आंदोलनाचा इतिहास

By admin | Updated: January 12, 2017 06:18 IST

नेरूळमधील आगरी कोळी महोत्सवामध्ये चरीकोपरचा ऐतिहासिक शेतकरी संप ते भूमिपुत्रांच्या

नवी मुंबई : नेरूळमधील आगरी कोळी महोत्सवामध्ये चरीकोपरचा ऐतिहासिक शेतकरी संप ते भूमिपुत्रांच्या गरजेपोटी घरांपर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो नवी मुंबईकरांना भूमिपुत्रांच्या इतिहासाची ओळख करून देण्यात येत आहे. आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने आयोजित महोत्सवाला रोज ८ ते १० हजार नागरिक उपस्थित राहू लागले आहेत. आगरी कोळीगीते, लावण्या व मराठी लोककलांच्या कार्यक्रमांसह येथील देवी-देवतांचे दर्शन आणि भूमिपुत्रांच्या यशोगाथेचे प्रदर्शन पाहण्यासाठीही नागरिक गर्दी करत आहेत. आगरी कोळी भूमिपुत्रांच्या कर्तृत्वाची माहिती नवी मुंबईसह परिसरातील नागरिकांना करून देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे.या प्रदर्शनामध्ये जगातील सर्वात मोठे शेतकरी आंदोलन म्हणून ओळख असणाऱ्या चरीकोपरच्या संपाची तपशीलवार माहिती दिली आहे. या संपामुळेच देशात कुळ कायदा लागू झाला. चिरनेरचा जंगल सत्याग्रह, जासई दास्तान फाट्यावरील रक्तरंजित आंदोलन याचा तपशील या प्रदर्शनामध्ये देण्यात आला आहे. आगरी समाजाचे पहिले आमदार व शेतकरीनेते नारायण नागू पाटील, लोकनेते दि. बा. पाटील यांच्यासह भूमिपुत्रांच्या आंदोलनास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सहकार्याची माहितीही देण्यात आली आहे. आगरी कोळी हाच मुंबईतील मूळ भूमिपुत्र. कुळ कायदा, साडेबारा टक्के योजना, विमानतळबाधितांचे आंदोलन व इतर सर्व आंदोलनांच्या माध्यमातून भूमिपुत्रांचा स्वाभीमानी बाणा देशाने पाहिला. देशभरातील प्रकल्पबाधितांच्या आंदोलनाची दिशा भूमिपुत्रांनी बदलली असून, देशाच्या विदेश व्यापारापासून मिठाच्या शोधामध्ये भूमिपुत्रांचेच योगदान असल्याची माहिती प्रदर्शनामधून दिली आहे. प्रत्येक भूमिपुत्रांना व शहरातील प्रत्येक नागरिकांना आगरी कोळी समाजाची यशोगाथा माहीत व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याची माहिती आयोजक नामदेव भगत यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)सांस्कृतिक-ऐतिहासिक पार्श्वभूमी आगरी कोळी समाजाला ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. चरीकोपरचा संप ते गरजेपोटी बांधलेल्या घरांपर्यंतचा लढा असा चळवळीचा भव्य इतिहास लाभला आहे. कोळीगीतांच्या तालावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही ठेका धरण्यास भाग पाडले होते. स्वातंत्र्य चळवळीमध्येही भूमिपुत्रांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावात भजन, कीर्तनाचे सूर वर्षभर ऐकायला मिळत असतात. भूमिपुत्रांनी देशाला मिठाची देणगी दिली असून, हा उदात्त इतिहास व समाजाची संघर्षमय यशोगाथा प्रत्येक घरामध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आयोजक नामदेव भगत यांनी दिली.