शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

प्रदर्शनातून उलगडला आंदोलनाचा इतिहास

By admin | Updated: January 12, 2017 06:18 IST

नेरूळमधील आगरी कोळी महोत्सवामध्ये चरीकोपरचा ऐतिहासिक शेतकरी संप ते भूमिपुत्रांच्या

नवी मुंबई : नेरूळमधील आगरी कोळी महोत्सवामध्ये चरीकोपरचा ऐतिहासिक शेतकरी संप ते भूमिपुत्रांच्या गरजेपोटी घरांपर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो नवी मुंबईकरांना भूमिपुत्रांच्या इतिहासाची ओळख करून देण्यात येत आहे. आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने आयोजित महोत्सवाला रोज ८ ते १० हजार नागरिक उपस्थित राहू लागले आहेत. आगरी कोळीगीते, लावण्या व मराठी लोककलांच्या कार्यक्रमांसह येथील देवी-देवतांचे दर्शन आणि भूमिपुत्रांच्या यशोगाथेचे प्रदर्शन पाहण्यासाठीही नागरिक गर्दी करत आहेत. आगरी कोळी भूमिपुत्रांच्या कर्तृत्वाची माहिती नवी मुंबईसह परिसरातील नागरिकांना करून देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे.या प्रदर्शनामध्ये जगातील सर्वात मोठे शेतकरी आंदोलन म्हणून ओळख असणाऱ्या चरीकोपरच्या संपाची तपशीलवार माहिती दिली आहे. या संपामुळेच देशात कुळ कायदा लागू झाला. चिरनेरचा जंगल सत्याग्रह, जासई दास्तान फाट्यावरील रक्तरंजित आंदोलन याचा तपशील या प्रदर्शनामध्ये देण्यात आला आहे. आगरी समाजाचे पहिले आमदार व शेतकरीनेते नारायण नागू पाटील, लोकनेते दि. बा. पाटील यांच्यासह भूमिपुत्रांच्या आंदोलनास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सहकार्याची माहितीही देण्यात आली आहे. आगरी कोळी हाच मुंबईतील मूळ भूमिपुत्र. कुळ कायदा, साडेबारा टक्के योजना, विमानतळबाधितांचे आंदोलन व इतर सर्व आंदोलनांच्या माध्यमातून भूमिपुत्रांचा स्वाभीमानी बाणा देशाने पाहिला. देशभरातील प्रकल्पबाधितांच्या आंदोलनाची दिशा भूमिपुत्रांनी बदलली असून, देशाच्या विदेश व्यापारापासून मिठाच्या शोधामध्ये भूमिपुत्रांचेच योगदान असल्याची माहिती प्रदर्शनामधून दिली आहे. प्रत्येक भूमिपुत्रांना व शहरातील प्रत्येक नागरिकांना आगरी कोळी समाजाची यशोगाथा माहीत व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याची माहिती आयोजक नामदेव भगत यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)सांस्कृतिक-ऐतिहासिक पार्श्वभूमी आगरी कोळी समाजाला ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. चरीकोपरचा संप ते गरजेपोटी बांधलेल्या घरांपर्यंतचा लढा असा चळवळीचा भव्य इतिहास लाभला आहे. कोळीगीतांच्या तालावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही ठेका धरण्यास भाग पाडले होते. स्वातंत्र्य चळवळीमध्येही भूमिपुत्रांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावात भजन, कीर्तनाचे सूर वर्षभर ऐकायला मिळत असतात. भूमिपुत्रांनी देशाला मिठाची देणगी दिली असून, हा उदात्त इतिहास व समाजाची संघर्षमय यशोगाथा प्रत्येक घरामध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आयोजक नामदेव भगत यांनी दिली.