शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

कामगार रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची हेळसांड

By admin | Updated: August 28, 2016 04:08 IST

राज्य विमा योजनेच्या कामगारांच्या जिवाशी सुरु असलेला खेळ अद्याप थांबलेला नाही. केंद्राच्या योजनेच्या वाशीतील वसाहतीमधील चार इमारती पालिकेने धोकादायक घोषित

नवी मुंबई : राज्य विमा योजनेच्या कामगारांच्या जिवाशी सुरु असलेला खेळ अद्याप थांबलेला नाही. केंद्राच्या योजनेच्या वाशीतील वसाहतीमधील चार इमारती पालिकेने धोकादायक घोषित केलेल्या आहेत. त्यानंतरही तीन धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे पुर्नवसन चौथ्या धोकादायक इमारतीमध्येच केले जात आहे. ज्यामुळे कामगार रूग्णालयाच्या कामगारांवरच मृत्युची टांगती तलवार निर्माण झालेली आहे.वाशीतील राज्य विमा कामगार रुग्णालयाच्या वसाहतीमधील वर्ग एक च्या चार इमारती महापालिकेने धोकादायक घोषीत केलेल्या आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी महापालिकेने या इमारती धोकादायक घोषित करुनही अद्यापही कामगारांचे कुटूंब जीव धोक्यात घालून त्याठिकाणी वास्तव्य करत आहे. कामगार रूग्णालय व्यवस्थापनाने त्यांची पर्यायी सोय करने आवश्यक असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वसाहतीमधील काही इमारतीमधील घरे रिक्त असतानाही ती कामगारांच्या ताब्यात दिली जात नाहीेत. काही दिवसापूर्वी या इमारतींचे पानी बंद करण्यासाठी पालिकेचे पथक गेले असता रुग्नालय व्यवस्थापनाने कामगारांची पर्यायी सोय करण्याकरिता मुदत मागीतली होती. त्यानंतरही कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्या ऐवजी, एका धोकादायक इमारतीमधुन दुसरया धोकादायक इमारतीमध्ये पाठवले जात आहे. शनिवारी यासंबंधीच्या नोटीसा कामगारांना बजावुन तात्काळ रविवारी कामगारांनी सुचवलेल्या ठिकाणी स्थलांतरीत होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. वर्ग एक च्या २ ते ४ क्रमांकाच्या इमारतीमधील कुटूंब १ क्रमांकाच्या इमारतीमध्ये हलवले जात आहेत. मुळात क्रमांक १ च्या इमारतीची देखिल पडझड सुरु असल्यामुळे पालिकेने धोकादायक ठरवलेली आहे. यामुळे त्याठिकाणचे कामगार जिव मुठीत धरुन राहत असतानाच कामगारांच्या इतर कुटूंबांना देखिल मृत्युच्या दाढेत ढकलले जात असल्याचा संताप कामगारांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)वर्ग २ व ३ च्या रिक्त इमारती सुस्थितीमध्ये असल्यामुळे त्याठिकाणी राहण्याची पर्यायी सोय व्हावी अशी कामगारांची मागणी आहे. यापूर्वी देखील कामगारांनी हा पर्याय सुचवला होता. परंतु तत्कालीन अधिकाऱ्यांनी कामगारांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती. अखेर विद्यमान अधिकाऱ्यांनी कामगारांसह पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये वरिष्ठांनी त्यांना उपलब्ध इमारतीमध्ये पर्यायी घरे देण्याचे सूचित केले होते. त्यामुळे कामगार रुग्णालयातील कामगारांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला होता.