शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

डेरवलीत रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: August 31, 2016 03:34 IST

तालुक्यात स्वच्छता अभियान व आपत्ती नियंत्रणावर योग्य व्यवस्थापन होत असताना डेरवलीतील रहिवासी मात्र समस्यांमुळे त्रस्त आहेत.

कळंबोली : तालुक्यात स्वच्छता अभियान व आपत्ती नियंत्रणावर योग्य व्यवस्थापन होत असताना डेरवलीतील रहिवासी मात्र समस्यांमुळे त्रस्त आहेत. याठिकाणी टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या असल्या तरी मूलभूत सुविधांअभावी रहिवासी त्रस्त आहेत. सांडपाण्याबरोेबर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची सोय नसल्याने अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. सर्वत्र दलदल पसरल्याने डासांचा प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. इमारतींच्या आवारात गुडघाभर पाणी साचल्याने येता-जाताना रहिवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत वारंवार तक्र ारी करून संबंधित प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. सिडको वसाहतीत जागा शिल्लक नसल्याने आजूबाजूच्या गावात बांधकाम व्यावसायिकांनी इमारती उभारल्या. मात्र याठिकाणी ना रस्ते, ना सांडपाण्यासाठी व्यवस्था, ना कचरा विल्हेवाटीची व्यवस्था. पावसाळी नाले तर योग्यरीत्या याठिकाणी बांधण्यात आलेलेच नाहीत.उसर्ली- डेरवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीत डेरवली गावात जवळपास पन्नास इमारती उभारण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने आराखडे मंजूर करताना योग्य नियोजन केले नाही. सिध्दिविनायक, सिध्दी, श्रेया, ओमसाईधाम, पद्मावती, सिल्व्हर, गोकूळ, ज्योतीर्लिंग, मानसी यासारख्या एकूण बारा ते तेरा अपार्टमेंटमध्ये राहणारे रहिवासी याठिकाणी घरे घेऊन पश्चाताप करीत आहेत. एकूण ११२६ सदनिका असून साडेचार हजारांच्या आसपास लोकवस्ती आहे. पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता दीर्घकालीन व्यवस्था नाही. बाजूला अरुंद गटारे तयार केली असली तरी मान्सूनपूर्व सफाई झाली नसल्याने पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नाही. काही इमारतीच्या पार्र्किं गमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. इंजीन व सायलेन्सरमध्ये पाणी जावून वाहने बंद पडत असल्याचे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पाणी साचत असल्याने सिलिंडरची गाडी अथवा स्कूल व्हॅन सोसायटीत येत नसल्याचे येथील रहिवासी दिलीप धावत्रे सांगतात. ग्रामपंचायतीकडून प्रति सदनिका १२०० रुपये घरपट्टी आकारली जाते, मात्र तुलनेने काहीच सुविधा पुरविल्या जात नाहीत. रहिवाशांकडून वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. साचलेले पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जात असल्याने साथीचे आजार बळावले आहेत. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे सुमारे चार हजार रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात तहसीलदार दीपक आकडे यांच्याशी संपर्कसाधला असता, हा विषय गटविकास अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत असल्याने तेच याबाबत कार्यवाही करतील, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)