शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

शासनाला पडला भूमिहीन शेतकऱ्यांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:42 IST

शासनाला १९९४ मध्ये काढलेल्या परिपत्रकाचा विसर : प्रकल्पबाधितांना भूखंड देण्याची मागणी

पनवेल : नवी मुंबई प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना शासनाने १९९४ च्या शासकीय परिपत्रकानुसार ४० चौरस मीटरचे भूखंड देण्याचे आदेश शासनाने पारित केले आहे. मात्र, दोन दशकापेक्षा जास्त कालावधी लोटला, तरी भूमिहिनांना भूखंड मिळाले नाहीत. एकीकडे परराज्यातील लोंढे वाढत असून शहरात अनधिकृत झोपड्या, घरे बांधून शेकडो एकर जागा काबीज केली जात आहे. तर दुसरीकडे भूमिहीन अद्याप शासनाकडून भूखंड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रकरणी शिवसेनेचे तालुका संघटक भरत पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शासनाच्या परिपत्रकाचे स्मरण करून दिले आहे.

नवी मुंबई प्रकल्पबाधित सिडको क्षेत्रातील अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजूर, मिठागर कामगार, १२ बलुतेदार, मच्छीमार, ग्रामकारागीर हे नवी मुंबई प्रकल्पामुळे निराधार झाले. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून करीत आलेले पारंपरिक व्यवसाय यामुळे नष्ट झाले. शासनाने काढलेल्या परिपत्रकाचा शासनालाच विसर पडला आहे. विशेष म्हणजे, सिडको अधिकाºयांना हाताशी धरून काही बिल्डरांनी ४० चौ.कि.मी.चे भूखंड लाटण्याचा प्रकार यापूर्वी नवी मुंबईत झाला आहे. भरत पाटील यांनी सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनाही यासंदर्भात पत्र दिले आहे. सिडकोने त्वरित शासनाच्या परिपत्रकानुसार भूमिहिनांना भूखंड देण्यास सुरुवात करावी. तहसील कार्यालयाच्या मार्फ त अहवाल मागवून हे भूखंडवाटप करण्याची विनंती पाटील यांनी केलीे.