शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील 900 कोटींचे रस्ते सरकारने रोखले

By admin | Updated: November 27, 2014 22:47 IST

खड्डय़ांपासून ठाणोकरांची कायमस्वरूपी मुक्तता व्हावी, या उद्देशाने ठाणो महापालिकेने शहरातील 1क्4.794 किमीच्या 395 रस्त्यांची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला होता.

अजित मांडके - ठाणो
पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांपासून ठाणोकरांची कायमस्वरूपी मुक्तता व्हावी, या उद्देशाने ठाणो महापालिकेने शहरातील 1क्4.794 किमीच्या 395 रस्त्यांची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. या प्रत्यक्ष कामासाठी सुमारे 9क्क् कोटींचा निधी खर्च केला जाणार होता. या कामाला मंजूरी मिळावी म्हणून आणि निधी उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाकडे साकडे घातले होते. परंतु, महापालिकेत एलबीटी लागू झाल्यापासून पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याने शासनाने रस्त्यांच्या कामाला स्थगिती दिल्याची बाब समोर आली आहे. तिजोरीत पैसा नसताना रस्ते कसे करणार, असा सवालही शासनाने उपस्थित केला आहे.  
खड्डेमुक्त प्रवासासाठी महापालिकेने मागील वर्षी हा जम्बो प्लॅन हाती घेतला होता. या प्लॅनअंतर्गत पुढील तीन  वर्षात शहरातील सर्वच रस्ते चकाचक म्हणजेच खड्डेमुक्त होतील, असा दावा पालिकेने केला होता. यातील अर्धे रस्ते यूटीडब्ल्यूटी (अल्ट्रा थीन व्हाइट टॅपिंग) आणि अर्धे रस्ते काँक्रीट पद्धतीने तयार करण्यात येणार होते. यामध्ये रस्त्यांच्या बांधकामासाठी 939.2क् कोटी आणि देखभाल दुरुस्तीसाठी 31.15 कोटी असा मिळून एकूण 97क्.35 कोटींचा खर्च केला जाणार होता. विशेष म्हणजे या रस्त्यांकामी वरिष्ठ विधी सल्लागार व अनुभवी चार्टर्ड अकाउंटंटच्या नियुक्तीसाठी 56.18 लाखांची तरतूद करण्यात आली होती. माजिवडा-मानपाडा 45 किमी, मुंब्रा 2क् किमी व कळवा 7 किमी याप्रमाणो रस्त्यांमध्ये वाढ झाली आहे.
यूटीडब्ल्यूटी रस्त्यांचे आयुर्मान 1क् ते 2क् वर्षे आणि सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे आयुर्मान साधारणपणो 25 ते 3क् अथवा त्याहूनही 5क् वर्षार्पयत असू शकते, असा दावा पालिकेने केला आहे. त्यानुसार, नऊ प्रभाग समित्यांमधील 1क्4.794 किमीचे 295 रस्ते यूटीडब्ल्यूटी व सिमेंट काँक्रीटच्या साहाय्याने करण्यात येणार होते. शहरातील मोठे रस्ते काँक्रीट आणि छोटे रस्ते यूटीडब्ल्यूटी पद्धतीने केले जाणार आहेत. या रस्त्यांच्या कामांमध्ये ज्या रस्त्यांचा दोषदायित्व कालावधी संपलेला आहे. मे 2क्14 र्पयत संपणार आहे. ज्या रस्त्यांवर सिव्हरेज सिस्टीम झाली आहे, अशा रस्त्यांचादेखील या प्लॅनमध्ये समावेश करण्यात आला होता. निविदा काढून हे काम ठेकेदारांना देण्याचे निश्चित असून रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यापासून पुढे पाच वर्षे त्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तही ठेकेदारानेच करावयाची आहे. वेळ पडल्यास पालिका एमएमआरडीएकडून कर्जाची मागणी करणार होती. परंतु आता या सा:यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
 
4आता एक वर्ष उलटूनही हा जम्बो प्लॅन कागदावरच राहिल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात पालिका अधिका:यांना छेडले असता त्यांनी सुरुवातीला पालिका तिजोरीत पैसा नसल्याने ही कामे होऊ शकत नसल्याचे कारण पुढे केले होते. 
4प्रत्यक्षात शासनानेच पालिकेची कानउघाडणी केल्याची माहिती समोर आली आहे. तिजोरीत पैसा नसताना रस्त्यांचा विकास कसा करणार, असा सवाल शासनाने उपस्थित करून ही कामे रोखली असल्याची माहिती आता पालिका सूत्रंनी दिली आहे. तिजोरीत पैसा नसताना अशा प्रकारची कामे करू नयेत, असेही शासनाने पालिकेला सांगितले आहे. 
4पैसा नसताना हे काम कसे करणार, असा सवाल शासनाने पालिकेला केला आहे. परंतु, त्याचे उत्तर पालिकेला देता आलेले नाही. दरम्यान, आता यावर तोडगा काढण्यासाठी आणि शासनाची मंजूरी मिळविण्यासाठी पालिका स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून रस्त्यांचा हा जम्बो प्लॅन मार्गी लागावा म्हणून पालिकेने शासनाकडे पत्रव्यवहार सुरू केल्याची माहिती सूत्रंनी दिली.