शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

चार महिने जीव मुठीत घेऊन जगतात गोकुळनगरवासी

By admin | Updated: January 30, 2015 23:48 IST

एकीकडे झोपडपट्टी तर दुसरीकडे इमारतींचे पसरलेले जाळे, अशी काहीशी परिस्थिती प्रभाग क्र. २४ ची आहे.

अजित मांडके, ठाणे एकीकडे झोपडपट्टी तर दुसरीकडे इमारतींचे पसरलेले जाळे, अशी काहीशी परिस्थिती प्रभाग क्र. २४ ची आहे. परंतु, गोकुळनगरचे रहिवासी मात्र पावसाळ्याचे चार महिने आपला जीव मुठीत धरून जीवन जगत असल्याचे विदारक सत्य या ठिकाणचे आहे. चार महिने येथील एक हजारांहून अधिक रहिवाशांच्या घरांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या की, घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरते. त्यामुळे पावसाळा आला की, पोटात गोळाच येतो, अशी भावना येथील रहिवासी व्यक्त करतात. त्यातही येथील पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर होऊनसुद्धा तो कागदावरच राहिला आहे.प्रभाग क्रमांक २४ हा ६० टक्के झोपडपट्टी तर ४० टक्के इमारतींनी व्यापला आहे. नाल्याच्या अलीकडे झोपडपट्टी तर पलीकडे इमारतींचे इमले अशी काहीशी परिस्थिती या प्रभागाची असून येथील लोकसंख्या २० हजार ७४८ एवढी आहे. येथे गोकुळनगर, रुणवालनगर, आझादनगर, नारोळीपाडी, सिद्धिविनायक टॉवर, गोकुळदासवाडी, फ्लॉवर व्हॅली, शेलारपाडी, पुजाणी इस्टेट, बाटा कम्पाउंड, प्रताप सिनेमा, कोलबाड तलाव, सुमेर कॅसल आदी भागांचा यात समावेश आहे. परंतु, हे भाग जरी महत्त्वाचे असले तरी गोकुळनगर भागात पावसाळा म्हटले की, अंगावर काटा उभा राहतो. पावसाळा सुरू झाला की, येथील नाल्याचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरते. त्यामुळे रात्र-रात्र जागून हे पाणी बाहेर काढावे लागते. नाल्याची वेळेत सफाई होत नाही, याच नाल्यातून ड्रेनेजची वाहिनी टाकल्याने या नाल्याचा प्रवाहदेखील काहीसा बदलला आहे. इमारतींच्या बाजूला असलेली संरक्षक भिंत ही मोठी असून झोपडपट्टी भागाकडे असलेली संरक्षक भिंत छोटी आहे. त्यामुळेदेखील पाण्याचा प्रवाह झोपडपट्टी भागात अधिक येतो. विशेष म्हणजे नाल्यावरील पूलदेखील हलाखीच्या स्थितीत असून तो कधीही पडू शकतो, अशी स्थिती आहे. नाल्याच्या बाजूला एकच कचराकुंडी आहे. परंतु, तीदेखील छोटी असल्याने कचरा नाल्यात साचतो. नाल्याची संरक्षक भिंत तुटली असून ती अद्याप दुरुस्त करण्यात आलेली नाही. नाल्यावरच सार्वजनिक शौचालय आणि घरे उभारली आहेत. भविष्यात येथे हानी झाल्यास त्याची मोठी किंमत येथील रहिवाशांना मोजावी लागणार आहे. विशेष म्हणजे येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी २००७ मध्ये प्रस्ताव मंजूर झाला परंतु, तेव्हापासून हा प्रस्ताव कागदावरच आहे.