शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

पनवेलला तलाव व्हिजनचा विसर

By admin | Updated: March 13, 2016 03:44 IST

पनवेलला तलावांची नैसर्गिक देणगी लाभली आहे. या तलावांनी शहरवासीयांची अनेक वर्षे तहान भागविल्याची नोंद १८८१ मधील सरकारी कागदपत्रांमध्येही आढळते.

नामदेव मोरे, नवी मुंबईपनवेलला तलावांची नैसर्गिक देणगी लाभली आहे. या तलावांनी शहरवासीयांची अनेक वर्षे तहान भागविल्याची नोंद १८८१ मधील सरकारी कागदपत्रांमध्येही आढळते. जवळपास १३५ वर्षांची पार्श्वभूमी असणाऱ्या तलावांची सद्य:स्थितीमध्ये दुरवस्था झाली आहे. पालिकेलाही तलाव व्हिजनचा विसर पडला असून, शहराचे वैभव असणाऱ्या जलाशयांना कचराकुंड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाण्याची कोणतीही योजना असली तरी त्यामध्ये वडाळे तलावाची सुधारणा करण्याची तरतूद असलीच पाहिजे. कारण सध्या पाणी हाच खरा साठा (संपत्ती) आहे. नदी व वडाळे तलाव यामध्ये फक्त एक मैलाचे अंतर आहे. त्या भागात पाइप टाकून पाणीपुरवठा करता येईल. हा मजकूर आहे १० नोव्हेंबर १८८४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी व नगरपालिकेचे अध्यक्ष यांच्याकडे दिलेल्या पत्रातील आहे. वडाळे व कृष्णाळे तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याचा उल्लेख १८८१ व ८२ च्या शासकीय अहवालामध्ये आढळतो. १८८४ व ८५ मध्ये तत्कालीन मामलेदारांनी खांदे येथील तलाव उकरून घेतला होता. यासाठी १०० घनफुटास आठ आणे दर दिला असल्याचा उल्लेख आहे. या दोन्हीही उल्लेखांवरून स्पष्ट होते, की १२५ वर्षांपूर्वी शहराचे नेतृत्व करणारे व प्रशासनाचा गाढा हाकणाऱ्यांनी तलावांची स्वच्छता राखण्यासाठी किती दक्षता घेतली होती? परंतु कालांतराने शहर वाढत राहिले. तलावांमधील पाण्याचा वापर पिण्यासाठी होईनासा झाला. कचरा, निर्माल्य टाकण्यासाठी या पाण्याचा वापर सुरू आहे. नगरपालिकेच्या मुख्यालयासमोर लेंडाळे तलाव आहे. तलावाची भिंत एक ठिकाणी कोसळली आहे. पाण्यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचा खच पडला आहे. पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. कचराकुंडीप्रमाणे या जलाशयाचा उपयोग होऊ लागला आहे. या तलावाचे योग्य पद्धतीने देखभाल व दुरुस्ती केली असती तर शहराच्या व या परिसराच्या सौंदर्यात भर पडली असती. नगरपालिका मुख्यालयासमोरील तलावाची दुरवस्था झाली आहेच, त्याचपद्धतीने इतर तलावांची स्थितीही बिकट आहे. पर्यावरण अहवालाप्रमाणे येथील पाणी दूषित झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या वडाळे तलावाचे पाणी पूर्वी पिण्यासाठी वापरले जात होते. त्या तलावाला जलपर्णींचा वेडा पडला आहे. तलाव आहे की पाणी साचलेले डबके, यामधील फरक कळेनासा झाला आहे. विश्राळे तलावाचा वापर कपडे धुण्यासाठी केला जात आहे. नगरपालिकेने तलाव व्हिजन राबवून या जलाशयांची डागडुजी करणे आवश्यक आहे. तलाव सुशोभित केला तर त्यामुळे त्या परिसराचेही महत्त्व वाढेल. शहरवासीयांना हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होऊ शकते. याशिवाय येथील पाण्याचा उद्यान, बांधकाम व इतर कारणांसाठी वापर करता येऊ शकतो. भविष्यात अतिक्रमण होऊन तलावांचे अस्तित्व संपण्यापूर्वीच पालिकेने तलाव व्हिजन राबविण्याची अपेक्षा दक्ष नागरिक व्यक्त करू लागले आहेत. ठोस धोरणाची आवश्यकतातलाव हे पनवेल शहरास लाभलेले नैसर्गिक वरदान आहे. ठाणे व नवी मुंबईप्रमाणे तलाव व्हिजन राबवून त्यांचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. तलावांचे सुशोभीकरण केले तर शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये भर पडू शकते. ठाणे शहरामध्ये तलाव हे विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे. रोज सकाळ, सायंकाळी हजारो नागरिक तलाव परिसराला भेट देण्यासाठी येत असतात. पनवेल नगरपालिकेनेही याच धर्तीवर तलावांचे नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे. नगरपालिकेनेही याविषयी योजना तयार केली असून, लवकरच पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात येणार असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.