शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पालिकेच्या २९८७ कोटींच्या अर्थसंकल्पास अंतिम मंजुरी

By admin | Updated: March 30, 2017 07:04 IST

पाच दिवस प्रदीर्घ चाललेल्या चर्चेनंतर बुधवारी रात्री उशिरा २९८७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली

प्राची सोनवणे / नवी मुंबई पाच दिवस प्रदीर्घ चाललेल्या चर्चेनंतर बुधवारी रात्री उशिरा २९८७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये स्थायी समितीने ६५ कोटींची कपात केली व सर्वसाधारण सभेने त्यामध्ये ५३ कोटींची वाढ केली आहे. नागरिकांकडून प्रथमच अर्थसंकल्पासाठी सूचना मागविण्यात आल्या होत्या. शहराच्या समतोल विकासासह शाळांच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात आल्याची माहिती महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा २०१६ - १७ चा अर्थसंकल्प अनेक अर्थाने लक्षवेधी ठरला. पालिका आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी तब्बल २९९९ कोटी ४७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये पाणी दरवाढीसह घनकचरा व्यवस्थापन कर वाढविण्याचा निर्णयही घेतला होता. परंतु स्थायी समितीने कोणत्याही प्रकारची करवाढ केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. स्थायी समितीमध्ये तीन दिवस वादळी चर्चा झाल्यानंतर सभापती शिवराम पाटील यांनी आयुक्तांच्या अंदाजपत्रकातील ६५ कोटी रुपये कमी करून २९३४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. नागरिकांवर कोणत्याही प्रकारची करवाढ लादली जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. पालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा आयुक्तांच्या अंदाजातील रक्कम कमी करण्यात आली. स्थायी समितीमध्ये चर्चेदरम्यान आयुक्त मुंढे व सदस्यांमध्ये वादळी चर्चा झाली होती. सर्वसाधारण सभेमध्ये प्रत्येक वर्षी दोन दिवसांमध्ये मंजुरी मिळते, पण यावर्षी तब्बल पाच दिवस सभा आयोजित करावी लागली. यामध्ये पहिल्या दोन दिवस आयुक्तांच्या अतिक्रमण विरोधी धोरणांवर सडकून टीका करण्यात आली. होती. तीन दिवस अर्थसंकल्पावर नगरसेवकांनी त्यांचे म्हणणे सादर केले. अर्थसंकल्पावर सर्वसाधारण सभेत चर्चा सुरू असतानाच आयुक्त मुंढे यांची बदली झाली. यामुळे बुधवारच्या चर्चेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. शिवसेनेचे नामदेव भगत यांनी कविता करून मुंढेंविषयी नाराजी व्यक्त केलीच, शिवाय वर्षभरातील कामकाजावरही नाराजी व्यक्त केली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी अखेर स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये ५३ कोटी रुपयांची वाढ सुचविली व २९८७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली. रात्री जवळपास ८ वाजता अर्थसंकल्प मंजूर झाला. पहिल्या चार दिवसांमध्ये नगरसेवकांची उपस्थिती अत्यंत कमी होती. शेवटच्या दिवशी मात्र सर्वपक्षीय नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौरांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून नागरिकांवर कोणत्याही प्रकारे करवाढ लादलेली नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनाही कामे व सूचना कळविण्याचे आवाहन केले होते. त्यांनी सुचविलेल्या कामांचाही समावेश केला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. वनवास संपलासभागृह नेते जयवंत सुतार यांनी मुंढे यांच्या बदलीवर दहा महिन्यांचा वनवास संपल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. एलबीटी विभागात ३० कोटींची वाढ करावी. कर भरणा करण्यासाठी नागरिकांकरिता दिलासा देणारी योजना असावी. आंबेडकर स्मारकासाठी तरतूद वाढविण्यात यावी. महापौरांनी सुचविलेल्या कामांमध्ये अडीच कोटींची वाढ करावी अशा सूचना सुतार यांनी मांडल्या. गतवर्षीची विकासकामे पूर्ण झालेली नाहीत. नागरिकांची फसवणूक करणारा अर्थसंकल्प आहे. - नामदेव भगत, शिवसेनाभूमिगत केबल टाकणाऱ्यांकडून भुईभाडे आकारण्यात यावे. भूमाफियांना मोक्का लावण्यात यावा. - विनया मढवी, शिवसेनागावठाण विकासासाठी स्वतंत्र हेड हवा. पे अँड पार्कमधील वसुली नियमाप्रमाणे होत नाही. आदिवासी विकासासाठी २० कोटींची तरतूद हवी. - सूरज पाटील, राष्ट्रवादीझोपडपट्टी परिसरातील सुविधांविषयी प्रशासन उदासीन आहे. दिघ्यात ९ प्रभागांसाठी फक्त एक मैदान असल्याची खंत वाटते. - नवीन गवते, राष्ट्रवादी काँगे्रस पालिका शाळांचे आधुनिकीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. खासगी शाळांपेक्षाही चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शहराचा समतोल विकास साधण्यावर भर देण्यात आला असून, सर्वसमावेशक अर्थसंकल्प करण्यात आला आहे. - सुधाकर सोनावणे, महापौरधार्मिक स्थळांना आकारण्यात येणारा कर रद्द करावा. मैदानांना टॅक्स लावू नये. चर्चेदरम्यानच्या सूचना अमलात आणाव्या.- विजय चौगुले, विरोधी पक्षनेते भूमिगत वीजवाहिन्यांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. ते काम व्यवस्थित करण्यात यावे. - भारती कोळी, शिवसेनामहापालिकेचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हवे आहे. त्यासाठी भरीव तरतूद करावी. - द्वारकानाथ भोईर, गटनेते शिवसेनाविकास आराखडा लवकर बनविण्यात यावा. होर्डिंग पॉलिसी मंजूर करावी. - डॉ. जयाजी नाथ, राष्ट्रवादी