रोहा : मत्स्य संवर्धन हा व्यवसाय कसा फायदेशीर आहे याविषयी मार्गदर्शन काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था कार्यक्र म समन्वयक डॉ. के.एच.पुजारी यांनी केले. शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळावे व आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले. तसेच शेतीपूरक जोडधंद्यातील गरज पटवून देताना महाराष्ट्र राज्य व रायगड जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनाचा आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच मत्स्यपालनासारख्या जोडधंद्याची कास धरून आपला सर्वांगीण विकास साधणे शक्य असल्याचे सांगितले.डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अधिनस्त कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर गाव तलावातील मत्स्यसंवर्धन या विषयाचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले, यावेळी पुजारी बोलत होते. विशेषज्ञ माधव गीते यांनी आपल्या प्रास्ताविकात गाव तलावातील मत्स्य संवर्धनाचे महत्त्व विषद केले. प्रमुख पाहुणे डॉ. स्वामी यांनी कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचे महत्त्व विषद केले. डॉ. कोळी यांनी माशापासून उपपदार्थ बनविण्याचे तंत्रज्ञान मच्छीमार महिलांनी आत्मसात करून आपले जीवनमान उंचवावे असे नमूद केले. कार्यक्र माच्या पुढील तांत्रिक सत्रामध्ये प्रा. माधव गीते यांनी मत्स्य संवर्धनातील तांत्रिक बारकाव्यांसह मत्स्य संवधर्नाविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये मत्स्यसंवर्धनात वैविध्य आणण्यासाठी नवीन मत्स्य जातींचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे नमूद केले. तसेच मत्स्य संवर्धन हा व्यवसाय कसा फायदेशीर असून शेतीपूरक जोडधंद्याची सद्यस्थितीतील गरज पटवून देतानाच राजन झेमसे यांच्यासारखे शेतकरी इतरांना दिशादर्शक म्हणून ठरू शकतात असे नमूद केले. शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीबरोबरच मत्स्यपालन, कुक्कुटपालन इ. जोडधंद्यांची कास धरून आपला सर्वांगीण विकास साधणे शक्य असल्याचे सांगितले.यानंतर शेतकरी, सरपंच महेंद्र ठाकूर यांनी राबविलेल्या गाव तलावातून घेतलेल्या पाण्याचे आरो प्रणालीद्वारे शुध्दीकरण करून सुरक्षित व आरोग्यदायी पेयजल योजना अत्यंत अल्प दरामध्ये ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. या कार्यक्र मास अलिबाग, रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्र म काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था कार्यक्र म समन्वयक डॉ. के. एच. पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली तर सहयोगी प्राध्यापक डॉ. स्वामी, डॉ. कोळी, डॉ. रेळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
शेतकऱ्यांनी मत्स्यव्यवसायाकडे वळावे
By admin | Updated: September 1, 2016 03:17 IST